शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मत्स्य व्यवसायिकांचे १२ कोटीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:54 IST

जालना जिल्ह्यात पावसाने डोळे वटारल्याने खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. पिकां सोबतच जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायालाही घरघर लागली असून, तलावात पाणीच नसल्याने यंदा चार हजार टन निघणारे मत्स्य उत्पादन ठप्प झाले आहे. यामुळे अंदाजे मत्स्य व्यावसायिकांचे १२ कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

ठळक मुद्देजालना : मत्स्य व्यवसायिकांना शासनाकडून मदतीची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यात पावसाने डोळे वटारल्याने खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. पिकां सोबतच जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायालाही घरघर लागली असून, तलावात पाणीच नसल्याने यंदा चार हजार टन निघणारे मत्स्य उत्पादन ठप्प झाले आहे. यामुळे अंदाजे मत्स्य व्यावसायिकांचे १२ कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.या सदंर्भात अधिक माहिती अशी की, जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय करण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाचे एकूण ६७ लहानमोठे तलाव आहेत. या तलावातील बहुतांश तलावात मत्स्य संवर्धन होईल एवढे पुरेसे पाणी नसल्याने मत्स्य व्यावसायिकांनी आणलेले मत्स्य बीज पाण्यात सोडता आले नाही. विशेष म्हणजे मत्स्य बीज संवर्धनासाठी मत्स्य संवर्धन संस्थांना कोणत्या तलावात मत्स्य बीज सोडायचे आहे त्या तलावांची लिलावाद्वारे खरेदी ही जानेवारी महिन्यातच करावी लागते. यासाठी ६७ लाख रूपये मत्स्य व्यवसायिकांनी गुंतवले आहेत. यात १५७ लाख मत्स्य बोटकूळी टाकता आली असती आणि त्यातून चार हजार मेट्रीक टन उत्पादन निघाले असते. परंतू, या सर्व उत्पादनावर पाणी फेरले आहे.जालना जिल्ह्यात कतला, राहू, मरगळ आदी जातींच्या माशांची पैदास केली जाते. दरम्यान, शासनाने यंदा हा व्यवसाय संकटात सापडल्याने विशेष अनुदान द्यावे अशी मागणी भारसकर यांनी केली असून संस्थेचे भाग भांडवल वाढवून द्यावे, कोरड्या तळ्यांचे तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी त्यांनी लोकमतशी बोलतांना केली.मत्स्यबीज निर्मिती केंद्र बंद पडल्याने अडचण४जालना जिल्ह्यातील गल्हाटी मध्यम प्रकल्पामध्ये पुर्वी मत्स्य व्यवसाय विभागाकडून मत्स्य बीज निर्मिती केंद्र उभारण्यात आले होते. परंतू, त्या तलावात आता पूर्वी प्रमाणे मुबलक पाणीसाठा राहत नसल्याने हे केंद्र २०१३ पासून बंद झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायिकांना जायकवाडी अथवा हैद्राबाद येथील मत्स्यबीज आणावे लागत आहेत.

टॅग्स :Jalanaजालनाfishermanमच्छीमार