शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

मत्स्य व्यवसायिकांचे १२ कोटीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:54 IST

जालना जिल्ह्यात पावसाने डोळे वटारल्याने खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. पिकां सोबतच जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायालाही घरघर लागली असून, तलावात पाणीच नसल्याने यंदा चार हजार टन निघणारे मत्स्य उत्पादन ठप्प झाले आहे. यामुळे अंदाजे मत्स्य व्यावसायिकांचे १२ कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

ठळक मुद्देजालना : मत्स्य व्यवसायिकांना शासनाकडून मदतीची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यात पावसाने डोळे वटारल्याने खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. पिकां सोबतच जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायालाही घरघर लागली असून, तलावात पाणीच नसल्याने यंदा चार हजार टन निघणारे मत्स्य उत्पादन ठप्प झाले आहे. यामुळे अंदाजे मत्स्य व्यावसायिकांचे १२ कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.या सदंर्भात अधिक माहिती अशी की, जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय करण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाचे एकूण ६७ लहानमोठे तलाव आहेत. या तलावातील बहुतांश तलावात मत्स्य संवर्धन होईल एवढे पुरेसे पाणी नसल्याने मत्स्य व्यावसायिकांनी आणलेले मत्स्य बीज पाण्यात सोडता आले नाही. विशेष म्हणजे मत्स्य बीज संवर्धनासाठी मत्स्य संवर्धन संस्थांना कोणत्या तलावात मत्स्य बीज सोडायचे आहे त्या तलावांची लिलावाद्वारे खरेदी ही जानेवारी महिन्यातच करावी लागते. यासाठी ६७ लाख रूपये मत्स्य व्यवसायिकांनी गुंतवले आहेत. यात १५७ लाख मत्स्य बोटकूळी टाकता आली असती आणि त्यातून चार हजार मेट्रीक टन उत्पादन निघाले असते. परंतू, या सर्व उत्पादनावर पाणी फेरले आहे.जालना जिल्ह्यात कतला, राहू, मरगळ आदी जातींच्या माशांची पैदास केली जाते. दरम्यान, शासनाने यंदा हा व्यवसाय संकटात सापडल्याने विशेष अनुदान द्यावे अशी मागणी भारसकर यांनी केली असून संस्थेचे भाग भांडवल वाढवून द्यावे, कोरड्या तळ्यांचे तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी त्यांनी लोकमतशी बोलतांना केली.मत्स्यबीज निर्मिती केंद्र बंद पडल्याने अडचण४जालना जिल्ह्यातील गल्हाटी मध्यम प्रकल्पामध्ये पुर्वी मत्स्य व्यवसाय विभागाकडून मत्स्य बीज निर्मिती केंद्र उभारण्यात आले होते. परंतू, त्या तलावात आता पूर्वी प्रमाणे मुबलक पाणीसाठा राहत नसल्याने हे केंद्र २०१३ पासून बंद झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायिकांना जायकवाडी अथवा हैद्राबाद येथील मत्स्यबीज आणावे लागत आहेत.

टॅग्स :Jalanaजालनाfishermanमच्छीमार