शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

मत्स्य व्यवसायिकांचे १२ कोटीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:54 IST

जालना जिल्ह्यात पावसाने डोळे वटारल्याने खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. पिकां सोबतच जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायालाही घरघर लागली असून, तलावात पाणीच नसल्याने यंदा चार हजार टन निघणारे मत्स्य उत्पादन ठप्प झाले आहे. यामुळे अंदाजे मत्स्य व्यावसायिकांचे १२ कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

ठळक मुद्देजालना : मत्स्य व्यवसायिकांना शासनाकडून मदतीची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यात पावसाने डोळे वटारल्याने खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. पिकां सोबतच जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायालाही घरघर लागली असून, तलावात पाणीच नसल्याने यंदा चार हजार टन निघणारे मत्स्य उत्पादन ठप्प झाले आहे. यामुळे अंदाजे मत्स्य व्यावसायिकांचे १२ कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.या सदंर्भात अधिक माहिती अशी की, जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय करण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाचे एकूण ६७ लहानमोठे तलाव आहेत. या तलावातील बहुतांश तलावात मत्स्य संवर्धन होईल एवढे पुरेसे पाणी नसल्याने मत्स्य व्यावसायिकांनी आणलेले मत्स्य बीज पाण्यात सोडता आले नाही. विशेष म्हणजे मत्स्य बीज संवर्धनासाठी मत्स्य संवर्धन संस्थांना कोणत्या तलावात मत्स्य बीज सोडायचे आहे त्या तलावांची लिलावाद्वारे खरेदी ही जानेवारी महिन्यातच करावी लागते. यासाठी ६७ लाख रूपये मत्स्य व्यवसायिकांनी गुंतवले आहेत. यात १५७ लाख मत्स्य बोटकूळी टाकता आली असती आणि त्यातून चार हजार मेट्रीक टन उत्पादन निघाले असते. परंतू, या सर्व उत्पादनावर पाणी फेरले आहे.जालना जिल्ह्यात कतला, राहू, मरगळ आदी जातींच्या माशांची पैदास केली जाते. दरम्यान, शासनाने यंदा हा व्यवसाय संकटात सापडल्याने विशेष अनुदान द्यावे अशी मागणी भारसकर यांनी केली असून संस्थेचे भाग भांडवल वाढवून द्यावे, कोरड्या तळ्यांचे तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी त्यांनी लोकमतशी बोलतांना केली.मत्स्यबीज निर्मिती केंद्र बंद पडल्याने अडचण४जालना जिल्ह्यातील गल्हाटी मध्यम प्रकल्पामध्ये पुर्वी मत्स्य व्यवसाय विभागाकडून मत्स्य बीज निर्मिती केंद्र उभारण्यात आले होते. परंतू, त्या तलावात आता पूर्वी प्रमाणे मुबलक पाणीसाठा राहत नसल्याने हे केंद्र २०१३ पासून बंद झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायिकांना जायकवाडी अथवा हैद्राबाद येथील मत्स्यबीज आणावे लागत आहेत.

टॅग्स :Jalanaजालनाfishermanमच्छीमार