शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, गौरीकुंडजवळ अपघात; सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
6
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
7
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
8
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
9
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
10
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
11
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
12
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
13
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
14
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
15
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
16
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
17
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
18
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
19
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
20
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा

११ कलमी कार्यक्रम प्रभावीपणे राबवा- लोणीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:26 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेचा ११ कलमी कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून याचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे निर्देश देत कामात हयगय अथवा कुचराई करणाऱ्या अधिकारी, कर्मचा-यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेचा ११ कलमी कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून याचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे निर्देश देत कामात हयगय अथवा कुचराई करणाऱ्या अधिकारी, कर्मचा-यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा राज्याचेपाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला.परतूर येथील पंचायत समिती सभागृहात समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेचा ११ कलमी कार्यक्रमाचा आढावा पालकमंत्री लोणीकर यांनी घेतला. यात पाणंद रस्ते, नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजनेचा आढावा त्यांनी घेतला. बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, उप विभागीय अधिकारी केशव नेटके, ब्रिजेश पाटील, सुदाम प्रधान, मदनलाल शिंगी, पंजाबराव बोराडे, गणेशवराव खवणे, रमेश भापकर, मधुकर खंदारे, पाईकराव, विष्णू फुफाटे, अशोक डोके, किशोर हनवते आदींची उपस्थिती होती.पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेचा ११ कलमी कार्यक्रम राबविण्यात येतो. या ११ कलमी कार्यक्रमाची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्याबाबत यापूर्वीच पदाधिकारी, अधिका-यांच्या कार्यशाळा, बैठका घेण्यात आल्या होत्या. परंतू पाहिजे त्या प्रमाणात या कामामध्ये प्रगती नसल्याची खंत व्यक्त करत हा ११ कलमी कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात यावा. या कामात हयगय अथवा दिरंगाई करणा-या अधिकारी, कर्मचाºयांची हयगय केली जाणार नसून, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.जालना जिल्ह्यात चार हजार ५०० सिंचन विहिरी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते व त्या जूनपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. परंतु हे कामही अत्यंत संथगतीने करण्यात येत आहे. परतूर तालुक्यात दोन हजार २०० विहिरींच्या कामांना जिल्हा परिषदेने स्थगिती दिली होती. ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असून ज्या त्रुटींमुळे ही स्थगीती देण्यात आली होती. त्या त्रुटींची पूर्तता करून येत्या १५ दिवसांच्या आत सिंचन विहिरींची सर्व कामे सुरू करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.नानाजी कृषी देशमुख संजीवनी योजनेत जिल्ह्यातील ३६३ गावांची निवड करण्यात आली असून, या योजनेची कामेही तातडीने सुरु करण्याच्या सुचना देत पालकमंत्री लोणीकर यांनी अहिल्यादेवी सिंचन विहिर, अमृतकुंड शेततळे, भू-संजिवनी, भू-संजीवनी कल्पवृक्ष फळबाग लागवड, निर्मल शौचालय, निर्मल शोषखड्डे, समृद्ध गाव तलाव, अंकुर रोपवाटीका, नंदन वन वृक्ष लागवड, समृद्ध ग्राम योजना या योजनांचा तालुकानिहाय तहसिलदार, गटविकास अधिकारी व उपविभागीय अधिका-यांनी आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

टॅग्स :Babanrao Looneykarबबनराव लोणीकरgovernment schemeसरकारी योजना