शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
4
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
5
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
6
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
7
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
8
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
9
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
10
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
11
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
12
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
13
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
15
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
16
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
17
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
18
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
19
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
20
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

११ टक्के नागरिकांनी घेतले दोन्ही डोस; गरोदर मातांचेही लसीकरण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:33 IST

विजय मुंडे जालना : जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला अद्याप अपेक्षित गती मिळालेली नाही. जिल्ह्यातील केवळ ३३ टक्के नागरिकांनी ...

विजय मुंडे

जालना : जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला अद्याप अपेक्षित गती मिळालेली नाही. जिल्ह्यातील केवळ ३३ टक्के नागरिकांनी पहिला, तर ११ टक्के नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला आहे. विशेषत: या मोहिमेत आता गरोदर मातांचेही लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

जिल्ह्यात आजवर ६१ हजार ६९९ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यातील ११८७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर रुग्णालयातील यशस्वी उपचारांनंतर ६० हजार ४७५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला महत्त्व देण्यात आले आहे. परंतु, जालना जिल्ह्यातील कोरोना लसीकरण मोहीम अद्यापही संथ गतीने सुरू आहे. आजवर पाच लाख ६० हजार २७६ जणांना पहिला, तर एक लाख ९१ हजार २७२ जणांना कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. पहिला डोस ३३ टक्के, तर दुसरा डोस ११ टक्के नागरिकांनी घेतला आहे.

जिल्ह्यातील फ्रंटलाईन वर्करमध्ये सर्वांनी पहिला डोस घेतला आहे, तर केवळ ५२ टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. सर्व फ्रंटलाईन वर्करचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. परंतु, दुसरा डोस घेण्याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केल्याने आजवर केवळ ४६ टक्के जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. १८ ते ४४ वयोगटांतील युवकांनी दुसरा डोस घेण्याकडे जणू पाठच फिरविली आहे. २ लाख ३७ हजार १४८ जणांनी पहिला, तर केवळ ४५ हजार १७५ जणांनी प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला आहे. ४५ ते ६० वर्षे वयोगटातील ३२ टक्के नागरिकांनी पहिला, तर १४ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. ६० वर्षांवरील २४ टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

वेळेत लसीकरण करून घ्यावे..

जिल्ह्यातील गरोदर मातांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जालना येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, अधीक्षक डॉ. आर. एस. पाटील, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, डॉ. सूर्यकांत सोनखेडकर उपस्थित होते.

जिल्ह्यातील गरोदर मातांनी लसीकरण करून घ्यावे, लसीकरणानंतरही मास्कचा वापर करण्यासह इतर प्रशासकीय सूचनांचे पालन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.