शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

१० नवे स्वच्छता निरीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:21 IST

शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या पाहता नव्याने विकास आराखडा तयार आला असून, याअंतर्गत स्वच्छतेसाठी पालिकेच्या दिमतीला कंत्राटी पद्धतीवर दहा स्वच्छता निरीक्षक नेमण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या पाहता नव्याने विकास आराखडा तयार आला असून, याअंतर्गत स्वच्छतेसाठी पालिकेच्या दिमतीला कंत्राटी पद्धतीवर दहा स्वच्छता निरीक्षक नेमण्यात आले आहेत. तर आऊट सोर्सिंगद्वारे १८० कामगार नियुक्त करण्यात येणार आहेत. स्वच्छतेसाठी सध्याच्या तुलनेत तीन पटीने अधिक साहित्य खरेदी केले जाणार आहे. आगामी मार्चपर्यंत स्वच्छ जालना सुंदर जालना ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यात येणार असून, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होत आहेत.जालना शहर घाणीमुळे सर्वत्र पुरते बदनाम झाले आहे. तसेच दरवर्षी पालिका स्वच्छतेसाठी साहित्य खरेदी करते. पण दर्जा नसल्याने दोन ते चार महिन्यांतच साहित्य खराब झाल्याचा पूर्वानुभव आहे.गत २० वर्षांत शहराचा सर्वबाजूंनी विस्तार होत गेला. नवनवीन वसाहती निर्माण झाल्या. शहराची लोकसंख्याही ४ लाखांवर पोहोचली आहे. त्यातुलनेत पालिकेची स्वच्छता विभागाची यंत्रणा तोकडी पडत आहे. पालिकेच्या अनेक सभांमध्ये स्वच्छतेचा पंचनामाही सदस्यांनी केलेला आहे.केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान हाती घेतले असून, यासाठी देशभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरुआहेत. विविध माध्यमांतून स्वच्छतेसंदर्भात जनजागृती केली जात असून, महापालिका, नगर पालिकांसाठी विशेष निधीही दिली जात आहे. याच अंतर्गत जालना पालिकेला १४ कोटी रुपयांचा मिळणार असून, पैकी काही निधी पालिकेला प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले. संपूर्ण शहर व परिसर स्वच्छतेसाठी नव्याने विकास प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अधिकारी, कर्मचाºयांची कंत्राटी पद्धतीवर भरती, स्वच्छतेचे विविध साहित्य या निधीतून खरेदी केले जाणार आहे. याची यादी तयार करण्यात आली असून, लवकरच घंटागाडी, ट्रॅक्टर, टिप्पर, हातगाडे आदी साहित्य लोकसंख्येच्या तुलनेत खरेदी केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. कायमस्वरुपी कर्मचारी नेमून पालिकेवर आर्थिक टाकण्यापेक्षा आऊट सोर्सिंगवर पालिका प्रशासनाचा भर आहे.शहरातील गुरुदत्त लेबर सप्लायर्स या एजन्सीला कामगारांचे कंत्राट देण्यात आले आहे. जवळपास १८० कामगार स्वच्छतेच्या कामांसाठी नेमण्यात येणार आहेत. तर दहा स्वच्छता निरीक्षक कंत्राटी पद्धतीवर नेमले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.