शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

१० नवे स्वच्छता निरीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:21 IST

शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या पाहता नव्याने विकास आराखडा तयार आला असून, याअंतर्गत स्वच्छतेसाठी पालिकेच्या दिमतीला कंत्राटी पद्धतीवर दहा स्वच्छता निरीक्षक नेमण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या पाहता नव्याने विकास आराखडा तयार आला असून, याअंतर्गत स्वच्छतेसाठी पालिकेच्या दिमतीला कंत्राटी पद्धतीवर दहा स्वच्छता निरीक्षक नेमण्यात आले आहेत. तर आऊट सोर्सिंगद्वारे १८० कामगार नियुक्त करण्यात येणार आहेत. स्वच्छतेसाठी सध्याच्या तुलनेत तीन पटीने अधिक साहित्य खरेदी केले जाणार आहे. आगामी मार्चपर्यंत स्वच्छ जालना सुंदर जालना ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यात येणार असून, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होत आहेत.जालना शहर घाणीमुळे सर्वत्र पुरते बदनाम झाले आहे. तसेच दरवर्षी पालिका स्वच्छतेसाठी साहित्य खरेदी करते. पण दर्जा नसल्याने दोन ते चार महिन्यांतच साहित्य खराब झाल्याचा पूर्वानुभव आहे.गत २० वर्षांत शहराचा सर्वबाजूंनी विस्तार होत गेला. नवनवीन वसाहती निर्माण झाल्या. शहराची लोकसंख्याही ४ लाखांवर पोहोचली आहे. त्यातुलनेत पालिकेची स्वच्छता विभागाची यंत्रणा तोकडी पडत आहे. पालिकेच्या अनेक सभांमध्ये स्वच्छतेचा पंचनामाही सदस्यांनी केलेला आहे.केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान हाती घेतले असून, यासाठी देशभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरुआहेत. विविध माध्यमांतून स्वच्छतेसंदर्भात जनजागृती केली जात असून, महापालिका, नगर पालिकांसाठी विशेष निधीही दिली जात आहे. याच अंतर्गत जालना पालिकेला १४ कोटी रुपयांचा मिळणार असून, पैकी काही निधी पालिकेला प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले. संपूर्ण शहर व परिसर स्वच्छतेसाठी नव्याने विकास प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अधिकारी, कर्मचाºयांची कंत्राटी पद्धतीवर भरती, स्वच्छतेचे विविध साहित्य या निधीतून खरेदी केले जाणार आहे. याची यादी तयार करण्यात आली असून, लवकरच घंटागाडी, ट्रॅक्टर, टिप्पर, हातगाडे आदी साहित्य लोकसंख्येच्या तुलनेत खरेदी केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. कायमस्वरुपी कर्मचारी नेमून पालिकेवर आर्थिक टाकण्यापेक्षा आऊट सोर्सिंगवर पालिका प्रशासनाचा भर आहे.शहरातील गुरुदत्त लेबर सप्लायर्स या एजन्सीला कामगारांचे कंत्राट देण्यात आले आहे. जवळपास १८० कामगार स्वच्छतेच्या कामांसाठी नेमण्यात येणार आहेत. तर दहा स्वच्छता निरीक्षक कंत्राटी पद्धतीवर नेमले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.