शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

युनोकडे कागाळी

By admin | Updated: September 26, 2015 03:30 IST

नियंत्रण रेषेवर भिंत बांधण्याची भारताची योजना असल्याची तक्रार पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राकडे (युनो) केली आहे. नियंत्रण रेषेवर भिंत उभारणे युनोच्या ठरावाविरुद्ध असून

संयुक्त राष्ट्र/न्यू यॉर्क : नियंत्रण रेषेवर भिंत बांधण्याची भारताची योजना असल्याची तक्रार पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राकडे (युनो) केली आहे. नियंत्रण रेषेवर भिंत उभारणे युनोच्या ठरावाविरुद्ध असून, असे करून नियंत्रण रेषेलाच आंतरराष्ट्रीय सीमेत रूपांतरित करण्याचा भारताचा प्रयत्न असल्याचा दावाही पाकने केला आहे. दरम्यान, भारताने याला आपण योग्य वेळी उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. पाकच्या या पत्रप्रपंचाने युनोच्या आमसभेदरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांची स्वतंत्र बैठक होण्याची शक्यता धूसर झाली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे पंतप्रधान येथील वाल्डोर्फ एस्टोरिया या एकाच हॉटेलमध्ये मुक्कामास आहेत. पण युनोच्या आमसभेत दोघांचीही तोंडे दोन दिशांना राहण्याची लक्षणे दिसू लागली आहेत.------संयुक्त राष्ट्रातील पाकच्या राजदूत मलीहा लोधी यांनी सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष रशियन राजदूत विताली चुर्किन यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तानदरम्यानच्या १९७ कि.मी. लांबीच्या ताबारेषेवर १० मीटर उंच आणि १३५ फूट रुंद भिंत बांधण्याचे भारताचे मनसुबे असून, पाक त्याबाबत चिंतित आहे. या क्षेत्रात कोणताही भौतिक बदल घडवून आणणारे बांधकाम हे सुरक्षा परिषदेच्या १९४८मधील प्रस्तावाचे उल्लंघन ठरेल, असे पाक मानतो.------1 भिंत बांधण्याबाबतच्या आरोपावर भारताने लगेचच थेट प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, लोधी यांनी ४ आणि ९ सप्टेंबरला पाठविलेल्या या पत्रातील मजकुरातच विरोधाभास असल्याचे म्हटले आहे.2शिवाय पाकिस्तानने सुरक्षा परिषदेला दिलेल्या पत्रांपैकी एक पत्र हिज्बुल मुजाहिदीनचा प्रमुख सईल सलाउद्दीन याच्या वक्तव्यावर आधारलेले असल्याकडे भारताने नेमकेपणाने लक्ष वेधले आहे. हे पत्र सलाउद्दीनच्या वक्तव्यावर आधारलेले आहे.3 दुसरे पत्र ४ सप्टेंबरला लिहिले असून, त्यात द्विपक्षीय चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे. मात्र, बीएसएफ आणि पाक रेंजर्समध्ये आधीच बैठक झालेली आहे. त्यामुळे या पत्राला काहीही अर्थ नाही, याउपर संयुक्त राष्ट्राने काही पाऊल उचललेच, तर भारत योग्यरीत्या उत्तर देईल, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले. -------------पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र आमसभेतील ३० सप्टेंबर रोजी होणाऱ्या त्यांच्या भाषणात काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्यास भारत त्याला प्रत्युत्तर देईल, असेही स्वरूप यांनी स्पष्ट केले. शरीफ यांनी गेल्या वर्षीही युनोच्या आमसभेत काश्मीरचा मुद्दा मांडला होता त्याला पंतप्रधान मोदी यांनी जोरदार विरोध केला होता.