शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

तुमचं वजन वाढतंय, शुगर लेव्हल हाय आहे? कोलेस्टेरॉल आणि ब्लड प्रेशर? - त्यातही गडबड?

By admin | Updated: June 6, 2017 17:51 IST

मग तुमच्या या साऱ्या कटकटींचं मूळ फक्त या एकाच गोष्टीत आहे..

- मयूर पठाडेतुमचं वजन का वाढतंय, तुमची शुगर लेव्हल हाय का होतेय, तुमच्या शरीरातलं कोलेस्टरोॅल का वाढतंय? ब्लड प्रेशरचे प्रॉब्लेम्स तुमची चिंता का वाढवतेय? हृदयविकाराची शक्यता तुमच्यात जास्त का आहे?..कधी विचार केलाय या प्रश्नांचा? गेलात कधी या प्रश्नांच्या मुळाशी? बघा तपासून.. कदाचित या साऱ्या प्रश्नांचं एकच उत्तर असू शकेल, ते म्हणजे तुमच्या आहाराच्या पद्धतीत. बघा, विचारा स्वत:ला, रात्रीचं जेवण तुम्ही उशिरा घेता का?.. तसं असेल तर तुमच्या या साऱ्या प्रश्नांचं उत्तर आणि प्रॉब्लेम एकच आहे.. लेट नाईट इटिंग!यासंदर्भात अलीकडेच एक मोठ्ठा अभ्यास करण्यात आला. अमेरिकेतील पेनसिल्वानिया युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा अभ्यास केला.

 

काय केलं शास्त्रज्ञांनी?त्यासाठी शास्त्रज्ञांनी सरळ दोन गट केले आणि त्यांच्या आहाराचा, त्यांच्या वजनावर, त्यांच्या प्रकृतीवर काय परिणाम होतो याचा बारीक अभ्यास केला.यातल्या पहिल्या गटाला त्यांनी दोन महिने सकाळी आठ ते रात्री सात या वेळांत ठरलेल्या वेळी आहार दिला. त्यात तीन जेवण आणि दोन स्नॅक्सचा समावेश होता. दुसऱ्या गटावरही दोन महिन्यांसाठी त्यांनी हाच प्रयोग केला. त्यांच्या खाण्याच्या वेळा मात्र बदलल्या. या गटाला त्यांनी दुपारी बारा ते रात्री अकरा, या दरम्यान पहिल्या गटाप्रमाणेच, म्हणजे तीन वेळा जेवण आणि दोनदा स्नॅक्स दिले.

 

शास्त्रज्ञांना आढळून आलं, ज्यांनी आपला सगळा आहार रात्री सातच्या आत घेतलेला आहे, त्यांच्या प्रकृतीवर कोणताही नकारात्मक परिणाम आढळून आला नाह. मात्र ज्यांनी रात्री उशिरा जेवण घेतले आहे, त्यांच्या वजनात तर वाढ झालीच, पण इतरही धोक्याचे इशारे त्यांना जाणवले.रात्री उशिरा जेवण करण्याचे तोटे तर स्पष्टपणे या अभ्यासात दिसून आलेच, पण त्याचबरोबर आणखीही एक निरीक्षण संशोधकांनी केलं, ते आपल्या सर्वांसाठीच फार महत्त्वाचं आहे. आपल्या खाण्यावर आणि खाण्याच्या वेळांवर तर आपलं नियंत्रण हवंच, पण तुम्ही जर आपलं रात्रीचं, म्हणजेच शेवटचं जेवण जर लवकरात लवकर अथवा रात्री सात वाजेच्या आत संपवलं, तर त्याचा तुम्हाला फायदाच होईल. आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या त्यातून दूर होतील.

 

‘लवकर निजे, लवकर उठे, त्यास सुखसमृद्धी आरोग्य लाभे’ ही जी आपल्याकडची परंपरागत म्हण आहे, त्यात खूचप तथ्य आहे, हे शास्त्रज्ञांनी पुन्हा एकदा शोधून काढलं आहे.त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि किमान आपलं रात्रीचं जेवण तरी वेळेवर घ्या, जेवणात आणि झोपण्याच्या वेळेत पुरेस अंतर राखा.. आरोग्याच्या तुमच्या साऱ्या कटकटी नक्कीच दूर होतील..