शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

तुमचं वजन वाढतंय, शुगर लेव्हल हाय आहे? कोलेस्टेरॉल आणि ब्लड प्रेशर? - त्यातही गडबड?

By admin | Updated: June 6, 2017 17:51 IST

मग तुमच्या या साऱ्या कटकटींचं मूळ फक्त या एकाच गोष्टीत आहे..

- मयूर पठाडेतुमचं वजन का वाढतंय, तुमची शुगर लेव्हल हाय का होतेय, तुमच्या शरीरातलं कोलेस्टरोॅल का वाढतंय? ब्लड प्रेशरचे प्रॉब्लेम्स तुमची चिंता का वाढवतेय? हृदयविकाराची शक्यता तुमच्यात जास्त का आहे?..कधी विचार केलाय या प्रश्नांचा? गेलात कधी या प्रश्नांच्या मुळाशी? बघा तपासून.. कदाचित या साऱ्या प्रश्नांचं एकच उत्तर असू शकेल, ते म्हणजे तुमच्या आहाराच्या पद्धतीत. बघा, विचारा स्वत:ला, रात्रीचं जेवण तुम्ही उशिरा घेता का?.. तसं असेल तर तुमच्या या साऱ्या प्रश्नांचं उत्तर आणि प्रॉब्लेम एकच आहे.. लेट नाईट इटिंग!यासंदर्भात अलीकडेच एक मोठ्ठा अभ्यास करण्यात आला. अमेरिकेतील पेनसिल्वानिया युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा अभ्यास केला.

 

काय केलं शास्त्रज्ञांनी?त्यासाठी शास्त्रज्ञांनी सरळ दोन गट केले आणि त्यांच्या आहाराचा, त्यांच्या वजनावर, त्यांच्या प्रकृतीवर काय परिणाम होतो याचा बारीक अभ्यास केला.यातल्या पहिल्या गटाला त्यांनी दोन महिने सकाळी आठ ते रात्री सात या वेळांत ठरलेल्या वेळी आहार दिला. त्यात तीन जेवण आणि दोन स्नॅक्सचा समावेश होता. दुसऱ्या गटावरही दोन महिन्यांसाठी त्यांनी हाच प्रयोग केला. त्यांच्या खाण्याच्या वेळा मात्र बदलल्या. या गटाला त्यांनी दुपारी बारा ते रात्री अकरा, या दरम्यान पहिल्या गटाप्रमाणेच, म्हणजे तीन वेळा जेवण आणि दोनदा स्नॅक्स दिले.

 

शास्त्रज्ञांना आढळून आलं, ज्यांनी आपला सगळा आहार रात्री सातच्या आत घेतलेला आहे, त्यांच्या प्रकृतीवर कोणताही नकारात्मक परिणाम आढळून आला नाह. मात्र ज्यांनी रात्री उशिरा जेवण घेतले आहे, त्यांच्या वजनात तर वाढ झालीच, पण इतरही धोक्याचे इशारे त्यांना जाणवले.रात्री उशिरा जेवण करण्याचे तोटे तर स्पष्टपणे या अभ्यासात दिसून आलेच, पण त्याचबरोबर आणखीही एक निरीक्षण संशोधकांनी केलं, ते आपल्या सर्वांसाठीच फार महत्त्वाचं आहे. आपल्या खाण्यावर आणि खाण्याच्या वेळांवर तर आपलं नियंत्रण हवंच, पण तुम्ही जर आपलं रात्रीचं, म्हणजेच शेवटचं जेवण जर लवकरात लवकर अथवा रात्री सात वाजेच्या आत संपवलं, तर त्याचा तुम्हाला फायदाच होईल. आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या त्यातून दूर होतील.

 

‘लवकर निजे, लवकर उठे, त्यास सुखसमृद्धी आरोग्य लाभे’ ही जी आपल्याकडची परंपरागत म्हण आहे, त्यात खूचप तथ्य आहे, हे शास्त्रज्ञांनी पुन्हा एकदा शोधून काढलं आहे.त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि किमान आपलं रात्रीचं जेवण तरी वेळेवर घ्या, जेवणात आणि झोपण्याच्या वेळेत पुरेस अंतर राखा.. आरोग्याच्या तुमच्या साऱ्या कटकटी नक्कीच दूर होतील..