शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; जन्मदात्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
4
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
5
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
6
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
7
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
8
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
9
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
11
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
12
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
13
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
14
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
15
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
16
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
17
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
18
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी: कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
19
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
20
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू

तुमचं वजन वाढतंय, शुगर लेव्हल हाय आहे? कोलेस्टेरॉल आणि ब्लड प्रेशर? - त्यातही गडबड?

By admin | Updated: June 6, 2017 17:51 IST

मग तुमच्या या साऱ्या कटकटींचं मूळ फक्त या एकाच गोष्टीत आहे..

- मयूर पठाडेतुमचं वजन का वाढतंय, तुमची शुगर लेव्हल हाय का होतेय, तुमच्या शरीरातलं कोलेस्टरोॅल का वाढतंय? ब्लड प्रेशरचे प्रॉब्लेम्स तुमची चिंता का वाढवतेय? हृदयविकाराची शक्यता तुमच्यात जास्त का आहे?..कधी विचार केलाय या प्रश्नांचा? गेलात कधी या प्रश्नांच्या मुळाशी? बघा तपासून.. कदाचित या साऱ्या प्रश्नांचं एकच उत्तर असू शकेल, ते म्हणजे तुमच्या आहाराच्या पद्धतीत. बघा, विचारा स्वत:ला, रात्रीचं जेवण तुम्ही उशिरा घेता का?.. तसं असेल तर तुमच्या या साऱ्या प्रश्नांचं उत्तर आणि प्रॉब्लेम एकच आहे.. लेट नाईट इटिंग!यासंदर्भात अलीकडेच एक मोठ्ठा अभ्यास करण्यात आला. अमेरिकेतील पेनसिल्वानिया युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा अभ्यास केला.

 

काय केलं शास्त्रज्ञांनी?त्यासाठी शास्त्रज्ञांनी सरळ दोन गट केले आणि त्यांच्या आहाराचा, त्यांच्या वजनावर, त्यांच्या प्रकृतीवर काय परिणाम होतो याचा बारीक अभ्यास केला.यातल्या पहिल्या गटाला त्यांनी दोन महिने सकाळी आठ ते रात्री सात या वेळांत ठरलेल्या वेळी आहार दिला. त्यात तीन जेवण आणि दोन स्नॅक्सचा समावेश होता. दुसऱ्या गटावरही दोन महिन्यांसाठी त्यांनी हाच प्रयोग केला. त्यांच्या खाण्याच्या वेळा मात्र बदलल्या. या गटाला त्यांनी दुपारी बारा ते रात्री अकरा, या दरम्यान पहिल्या गटाप्रमाणेच, म्हणजे तीन वेळा जेवण आणि दोनदा स्नॅक्स दिले.

 

शास्त्रज्ञांना आढळून आलं, ज्यांनी आपला सगळा आहार रात्री सातच्या आत घेतलेला आहे, त्यांच्या प्रकृतीवर कोणताही नकारात्मक परिणाम आढळून आला नाह. मात्र ज्यांनी रात्री उशिरा जेवण घेतले आहे, त्यांच्या वजनात तर वाढ झालीच, पण इतरही धोक्याचे इशारे त्यांना जाणवले.रात्री उशिरा जेवण करण्याचे तोटे तर स्पष्टपणे या अभ्यासात दिसून आलेच, पण त्याचबरोबर आणखीही एक निरीक्षण संशोधकांनी केलं, ते आपल्या सर्वांसाठीच फार महत्त्वाचं आहे. आपल्या खाण्यावर आणि खाण्याच्या वेळांवर तर आपलं नियंत्रण हवंच, पण तुम्ही जर आपलं रात्रीचं, म्हणजेच शेवटचं जेवण जर लवकरात लवकर अथवा रात्री सात वाजेच्या आत संपवलं, तर त्याचा तुम्हाला फायदाच होईल. आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या त्यातून दूर होतील.

 

‘लवकर निजे, लवकर उठे, त्यास सुखसमृद्धी आरोग्य लाभे’ ही जी आपल्याकडची परंपरागत म्हण आहे, त्यात खूचप तथ्य आहे, हे शास्त्रज्ञांनी पुन्हा एकदा शोधून काढलं आहे.त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि किमान आपलं रात्रीचं जेवण तरी वेळेवर घ्या, जेवणात आणि झोपण्याच्या वेळेत पुरेस अंतर राखा.. आरोग्याच्या तुमच्या साऱ्या कटकटी नक्कीच दूर होतील..