शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

बांगलादेशच्या पंतप्रधान पुन्हा एकदा शेख हसीना होणार? जवळच्या सहकाऱ्याचा मोठा दावा; भारताचे आभार मानले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 16:11 IST

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात बांगलादेशच्या पीएम पदाचा राजीनामा देत शेख हसीना यांनी देश सोडला.

गेल्या वर्षी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे शेख हसीना यांना बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. शेख यांनी देशही सोडला, यानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले. दरम्यान, आता पुन्हा एकदा शेख हसीना बांगलादेशच्या पंतप्रधान होणार असल्याचा दावा त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीने केला आहे. 

चीनच्या सोशल मीडियात धुमाकूळ घालणारी ट्रम्प प्रशासनातील 'ही' सर्वात कमी वयाची अधिकारी कोण?

शेख हसीना यांचे जवळचे सहकारी आणि अमेरिका अवामी लीगचे उपाध्यक्ष डॉ. रब्बी आलम यांनी बुधवारी एक मोठा दावा केला. ते म्हणाले की शेख हसीना लवकरच बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून परत येतील. यासोबतच, शेख हसीना यांना सुरक्षित आश्रय आणि प्रवासाचा मार्ग उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

डॉ. रब्बी आलम यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितले. "शेख हसीना बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून परत येतील. तरुण पिढीने चूक केली आहे, पण ती त्यांची चूक नाही, त्यांना दिशाभूल करण्यात आले आहे, असंही ते म्हणाले. त्यांनी बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून हस्तक्षेपाची मागणी केली. ते म्हणाले, "बांगलादेशवर हल्ला होत आहे आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. राजकीय बंडखोरी ठीक आहे, पण बांगलादेशात असे घडत नाही. ही एक दहशतवादी बंडखोरी आहे."

यावेळी त्यांनी अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनूस यांना पद सोडण्याचे आणि "ते जिथून आले होते तिथे परत जाण्याचे" आवाहन केले. "आम्ही बांगलादेशच्या सल्लागारांना सांगू इच्छितो की त्यांनी पद सोडावे आणि तुम्ही जिथून आला आहात तिथे परत जावे. डॉ. युनूस, तुम्ही बांगलादेशचे नाही आहात. हा बांगलादेशच्या लोकांना संदेश आहे की शेख हसीना परत येत आहेत, त्या पंतप्रधान म्हणून परत येत आहेत, असंही ते म्हणाले.

टॅग्स :Bangladeshबांगलादेश