शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे जाहीर करणार नाही - केंद सरकार

By admin | Updated: October 12, 2016 09:12 IST

भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेले सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे जाहीर न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.12 - भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेले सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे जाहीर न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हे पुरावे जाहीर केल्यास पाकिस्तानचे लष्कर अडचणीत येऊ शकते, मात्र केंद्र सरकारने असे कोणतेही पाऊल न उचलण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या भारताला युद्ध करण्यात रस नाही. मात्र आमच्यावर युद्ध लादल्यास आम्ही लढायला आणि जिंकायलादेखील तयार आहोत, असे अधिका-यांनी स्पष्ट केले आहे. 'उरी' हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर कोणत्याही देशाने आक्षेप नोंदवलेला नाही. उलट या भारताच्या भूमिकेचे बहुतांश देशांनी समर्थनच केले आहे. पाकिस्तानचा जवळचा मित्र मानल्या जाणा-या चीनने देखील या प्रकरणात हस्तक्षेप केला नाही. भारताच्या दृष्टीने हे मोठे यश मानले जात आहे.
  
लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने हा सर्जिकल स्र्टाईक करण्यासाठी वेळही काळजीपूर्व निवडली होती. 
संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या राजनैतिक प्रयत्नांमध्ये कोणतेही अडथळे येऊ नयेत,यासाठी न्यूयॉर्कमध्ये सुरू असलेली संयुक्त राष्ट्रांची आमसभा संपल्यानंतर भारतीय लष्कराकडून सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. तसेच, सर्जिकल स्ट्राईकनंतर भारताने तत्काळ अबुधाबीचे राजपुत्र प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद अल नहयान यांना प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रणही दिले. 
 
राजनैतिक रणनीतीसाठी आम्ही अमेरिकेसह कुठल्याही देशावर अवलंबून नाही. गेल्या काही वर्षांत आम्ही जरी जगातील वेगवेगळ्या सत्तांशी हातमिळवणी केली असली तरीही आम्ही स्वतःचे निर्णय त्यांच्यावर सोपवले आहेत, असा त्याचा अर्थ होत नसल्याचे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले.