शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

दोन भारतीय पत्रकारांना पाक सोडण्याचे आदेश

By admin | Updated: May 15, 2014 04:19 IST

पाकिस्तानमध्ये कार्यरत दोन भारतीय पत्रकारांना तेथील सरकारने कोणतेही कारण न देता देश सोडून जाण्यास सांगितले आहे.

इस्लामाबाद/नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये कार्यरत दोन भारतीय पत्रकारांना तेथील सरकारने कोणतेही कारण न देता देश सोडून जाण्यास सांगितले आहे. ‘पीटीआय’चे स्नेहेश अ‍ॅलेक्स फिलिप आणि ‘द हिंदू’च्या मीना मेनन यांना पाकिस्तान सरकारने एक पत्र पाठवून त्यांच्या व्हिसाची मुदत वाढविण्यात येत नसल्याचे कळविले आहे. हे दोन्ही पत्रकार गेल्या नऊ महिन्यांपासून राजधानी इस्लामाबादेत कार्यरत होते. भारत सरकार पाक सरकारकडे हा मुद्दा उपस्थित करण्याचा विचार करत आहे. पाकिस्तान सरकार किंवा दिल्लीतील त्यांच्या उच्चायुक्तालयाने या घडामोडींची आगाऊ सूचना दिली नव्हती, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. या दोन्ही पत्रकारांना २० मे पर्यंत देशातून जाण्यास सांगण्यात आले आहे. पाकिस्तानकडून यासंदर्भात कोणतेही कारण दिले गेलेले नाही. पाक सरकारच्या या पावलानंतर भारत व पाकिस्तानात परस्परांचे पत्रकार नसण्याची ही पहिलीच वेळ असेल, असे दिल्लीतील सरकारी सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था/ लोकमत न्यूज नेटवर्क)