शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

पाकमध्ये सरकारविरुद्ध आज इन्कलाब मार्च

By admin | Updated: August 14, 2014 01:58 IST

इमरान खान आणि मौलाना ताहीर उल कादरी यांच्या १४ आॅगस्टच्या नियोजित विशाल रॅलीच्या घोषणेनंतर नवाज शरीफ सरकारने संघर्ष टाळण्यासाठी मागच्या दाराने प्रयत्न सुरू केले आहेत

इस्लामाबाद : इमरान खान आणि मौलाना ताहीर उल कादरी यांच्या १४ आॅगस्टच्या नियोजित विशाल रॅलीच्या घोषणेनंतर नवाज शरीफ सरकारने संघर्ष टाळण्यासाठी मागच्या दाराने प्रयत्न सुरू केले आहेत. याचवेळी सरकारने पाकिस्तानला सोमालिया, इराक किंवा लिबिया होऊ देणार नाही, असेही स्पष्ट केले आहे.कॅनडात वास्तव्य करणारे मौलाना कादरी गुरुवारी नवाज शरीफ सरकारला बरखास्त करण्याच्या मागणीसाठी ‘इन्कलाब मार्च’ काढतील. भ्रष्टाचारात बुडालेले शरीफ सरकार गरिबांविरुद्ध धोरणे राबवीत असल्याचा मौलाना कादरी यांचा आरोप आहे. या रॅलीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्रालयाने बैठक घेतली. तीत निदर्शक हिंसाचार करीत असतील तर तो कठोरपणे मोडून काढला जाईल, असा निर्णय झाला.गृहमंत्री चौधरी निसार अली खान यांनी म्हटले आहे की, जे लोक पोलिसांना दुबळे करीत आहेत, आपल्याच लोकांना हुतात्मा करीत आहेत आणि आपल्याच लोकांची डोकी कापत असतील, तर त्यांना इस्लामाबादेत मोकळे सोडले जाणार नाही.’ कोणत्याही हिंसक जमावाला इस्लामाबादेत निदर्शने करण्याची परवानगी दिली गेली, तर काही महिन्यांनी आणखी हिंसक लोक इस्लामाबादेत येऊन सरकारला नियंत्रणात ठेवण्याची धमकी देतील. या गोष्टींना कधीही परवानगी दिली जाऊ शकत नाही, कारण आम्ही पाकिस्तानची अवस्था सोमालिया, इराक किंवा लिबियासारखी होऊ देणार नाही, असेही चौधरी म्हणाले. पाकिस्तान सरकारने याआधीच इस्लामाबादची पूर्ण सुरक्षा तीन महिन्यांसाठी लष्कराच्या हवाली केली आहे. लष्कराचे जवान सरकारी कार्यालये आणि अन्य संवेदनशील ठिकाणांचे रक्षण करतील, शिवाय सरकारने इस्लामाबादेतील अनेक भागांतील मोबाईल किंवा वायरलेस सेवा बेमुदत काळासाठी निलंबित करण्याचे आदेश आधीच दिले आहेत. याच बरोबर नियोजित मार्च रद्द व्हावा यासाठी सरकार इमरान खान यांच्याशी संपर्क साधत आहे. (वृत्तसंस्था)