शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

आठ दिवसांनी तीन जणांची सुखरूप सुटका

By admin | Updated: May 4, 2015 00:32 IST

नेपाळमधील मोठ्या भूकंपानंतर सावरणाऱ्या नागरिकांना पुन्हा पुन्हा बसणारे धक्के निराशेच्या गर्तेत ढकलत आहेत; पण रविवारचा दिवस मात्र या निराशेवर

काठमांडू : नेपाळमधील मोठ्या भूकंपानंतर सावरणाऱ्या नागरिकांना पुन्हा पुन्हा बसणारे धक्के निराशेच्या गर्तेत ढकलत आहेत; पण रविवारचा दिवस मात्र या निराशेवर मात करणारा ठरला. भीषण भूकंप होऊन आठ दिवस उलटल्यानंतर तिघांची ढिगाऱ्याखालून सुखरूप सुटका झाली व जमावासाठी तो आशेचा किरण ठरला. पुन्हा पुन्हा बसणारे धक्के नागरिकांचे मनोबल खच्ची करीत आहेत. रविवारची सकाळही अशीच होती, दिवसाची सुरुवात ४.३ मॅग्निट्यूडच्या भूकंपाने झाली. घबराटीची नवी लहर फिरली. पाऊस व थंडीचे हवामान, त्यातच खुल्या जागेत तंबू उभारून उपाशीपोटी राहणारे नागरिक कमालीचे भयभीत आहेत. २५ एप्रिलच्या भूकंपाने मरणारांची संख्या आता ७ हजारांची सीमा ओलांडून गेली असून, मृतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल, अशी भीती व्यक्त होत आहे. जखमींची संख्या १४,२२७ आहे. अर्थमंत्री रामशरण महात यांनी मृतांची संख्या बरीच वाढेल, अशी भीती व्यक्त केली. ते बाकू येथे अशियान विकास बँकेच्या बैठकीत बोलत होते.मदत पथकाने तीन जणांची ढिगाऱ्याखालून सुखरूप सुटका केली. यात दोन पुरुष आणि एक महिला आहे. यातील फंचू गले हे १०५ वर्षांचे आहेत. डोंगराळ भागातील सायुली खेड्यातून या तिघांची सुटका केली. मोठी विमाने उतरण्यास बंदीभूकंपग्रस्त नेपाळने लाखो लोकांसाठी मदत घेऊन येणाऱ्या मोठ्या विमानांना काठमांडू येथील विमानतळावर उतरण्यास बंदी घातली आहे. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पाच दशके जुन्या धावपट्टीला तीनहून अधिक तडे गेल्याने नेपाळी अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. अर्थात १९६ टनाहून अधिक वजन असलेल्या विमानांना त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्यास परवानगी असणार नाही. गेल्या २५ एप्रिल रोजी आलेल्या भूकंपानंतर १५० चार्टर्डसह ३०० हून अधिक विमानांद्वारे मदत साहित्य येथील विमानतळावर आले. बुधवारी विमानतळावर ४४७ उड्डाणे झाली. (वृत्तसंस्था)