शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
3
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
4
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
5
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
6
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
7
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
8
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
9
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
10
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
11
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
12
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
13
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
14
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
17
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
18
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
19
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
20
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

आठ दिवसांनी तीन जणांची सुखरूप सुटका

By admin | Updated: May 4, 2015 00:32 IST

नेपाळमधील मोठ्या भूकंपानंतर सावरणाऱ्या नागरिकांना पुन्हा पुन्हा बसणारे धक्के निराशेच्या गर्तेत ढकलत आहेत; पण रविवारचा दिवस मात्र या निराशेवर

काठमांडू : नेपाळमधील मोठ्या भूकंपानंतर सावरणाऱ्या नागरिकांना पुन्हा पुन्हा बसणारे धक्के निराशेच्या गर्तेत ढकलत आहेत; पण रविवारचा दिवस मात्र या निराशेवर मात करणारा ठरला. भीषण भूकंप होऊन आठ दिवस उलटल्यानंतर तिघांची ढिगाऱ्याखालून सुखरूप सुटका झाली व जमावासाठी तो आशेचा किरण ठरला. पुन्हा पुन्हा बसणारे धक्के नागरिकांचे मनोबल खच्ची करीत आहेत. रविवारची सकाळही अशीच होती, दिवसाची सुरुवात ४.३ मॅग्निट्यूडच्या भूकंपाने झाली. घबराटीची नवी लहर फिरली. पाऊस व थंडीचे हवामान, त्यातच खुल्या जागेत तंबू उभारून उपाशीपोटी राहणारे नागरिक कमालीचे भयभीत आहेत. २५ एप्रिलच्या भूकंपाने मरणारांची संख्या आता ७ हजारांची सीमा ओलांडून गेली असून, मृतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल, अशी भीती व्यक्त होत आहे. जखमींची संख्या १४,२२७ आहे. अर्थमंत्री रामशरण महात यांनी मृतांची संख्या बरीच वाढेल, अशी भीती व्यक्त केली. ते बाकू येथे अशियान विकास बँकेच्या बैठकीत बोलत होते.मदत पथकाने तीन जणांची ढिगाऱ्याखालून सुखरूप सुटका केली. यात दोन पुरुष आणि एक महिला आहे. यातील फंचू गले हे १०५ वर्षांचे आहेत. डोंगराळ भागातील सायुली खेड्यातून या तिघांची सुटका केली. मोठी विमाने उतरण्यास बंदीभूकंपग्रस्त नेपाळने लाखो लोकांसाठी मदत घेऊन येणाऱ्या मोठ्या विमानांना काठमांडू येथील विमानतळावर उतरण्यास बंदी घातली आहे. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पाच दशके जुन्या धावपट्टीला तीनहून अधिक तडे गेल्याने नेपाळी अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. अर्थात १९६ टनाहून अधिक वजन असलेल्या विमानांना त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्यास परवानगी असणार नाही. गेल्या २५ एप्रिल रोजी आलेल्या भूकंपानंतर १५० चार्टर्डसह ३०० हून अधिक विमानांद्वारे मदत साहित्य येथील विमानतळावर आले. बुधवारी विमानतळावर ४४७ उड्डाणे झाली. (वृत्तसंस्था)