शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसांनी तीन जणांची सुखरूप सुटका

By admin | Updated: May 4, 2015 00:32 IST

नेपाळमधील मोठ्या भूकंपानंतर सावरणाऱ्या नागरिकांना पुन्हा पुन्हा बसणारे धक्के निराशेच्या गर्तेत ढकलत आहेत; पण रविवारचा दिवस मात्र या निराशेवर

काठमांडू : नेपाळमधील मोठ्या भूकंपानंतर सावरणाऱ्या नागरिकांना पुन्हा पुन्हा बसणारे धक्के निराशेच्या गर्तेत ढकलत आहेत; पण रविवारचा दिवस मात्र या निराशेवर मात करणारा ठरला. भीषण भूकंप होऊन आठ दिवस उलटल्यानंतर तिघांची ढिगाऱ्याखालून सुखरूप सुटका झाली व जमावासाठी तो आशेचा किरण ठरला. पुन्हा पुन्हा बसणारे धक्के नागरिकांचे मनोबल खच्ची करीत आहेत. रविवारची सकाळही अशीच होती, दिवसाची सुरुवात ४.३ मॅग्निट्यूडच्या भूकंपाने झाली. घबराटीची नवी लहर फिरली. पाऊस व थंडीचे हवामान, त्यातच खुल्या जागेत तंबू उभारून उपाशीपोटी राहणारे नागरिक कमालीचे भयभीत आहेत. २५ एप्रिलच्या भूकंपाने मरणारांची संख्या आता ७ हजारांची सीमा ओलांडून गेली असून, मृतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल, अशी भीती व्यक्त होत आहे. जखमींची संख्या १४,२२७ आहे. अर्थमंत्री रामशरण महात यांनी मृतांची संख्या बरीच वाढेल, अशी भीती व्यक्त केली. ते बाकू येथे अशियान विकास बँकेच्या बैठकीत बोलत होते.मदत पथकाने तीन जणांची ढिगाऱ्याखालून सुखरूप सुटका केली. यात दोन पुरुष आणि एक महिला आहे. यातील फंचू गले हे १०५ वर्षांचे आहेत. डोंगराळ भागातील सायुली खेड्यातून या तिघांची सुटका केली. मोठी विमाने उतरण्यास बंदीभूकंपग्रस्त नेपाळने लाखो लोकांसाठी मदत घेऊन येणाऱ्या मोठ्या विमानांना काठमांडू येथील विमानतळावर उतरण्यास बंदी घातली आहे. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पाच दशके जुन्या धावपट्टीला तीनहून अधिक तडे गेल्याने नेपाळी अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. अर्थात १९६ टनाहून अधिक वजन असलेल्या विमानांना त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्यास परवानगी असणार नाही. गेल्या २५ एप्रिल रोजी आलेल्या भूकंपानंतर १५० चार्टर्डसह ३०० हून अधिक विमानांद्वारे मदत साहित्य येथील विमानतळावर आले. बुधवारी विमानतळावर ४४७ उड्डाणे झाली. (वृत्तसंस्था)