शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

पाकमध्ये तिघांना अटक

By admin | Updated: April 16, 2017 04:48 IST

कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर पाकिस्तानने आता पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) पोलिसांनी भारताची गुप्तहेर यंत्रणा रिसर्च अ‍ॅण्ड

इस्लामाबाद : कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर पाकिस्तानने आता पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) पोलिसांनी भारताची गुप्तहेर यंत्रणा रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस विंगच्या (आरएडब्ल्यू) तीन संशयित एजंट्सना अटक केल्याचा दावा केला आहे.हे तिघे पाकिस्तानविरोधी कारवाया करीत होते, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. अब्बासपूरमधील पोलीस ठाण्याबाहेर गेल्या सप्टेंबरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात या तिघांचा समावेश होता, असा दावा तेथील पोलिसांनी केला आहे. मात्र ते तिघेही पाकव्याप्त काश्मीरचेच नागरिक असल्याचे सांगण्यात येते. चेहेरे झाकलेल्या या तीन संशयितांना रावळपिंडीमध्ये प्रसारमाध्यमांसमोर आणण्यात आले, असे वृत्त ‘डॉन’ने दिले. हे तिघे पाकव्याप्त काश्मीरमधील अब्बासपूर येथील तरोती खेड्याचे रहिवासी आहेत. पूंछचे उप पोलीस अधीक्षक साजीद इम्रान यांनी सांगितले की, या तिघांची नावे मोहम्मद खलील, इम्तियाझ आणि रशिद अशी आहेत. खलील याने नोव्हेंबर २०१४मध्ये रॉच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती, असा दावा केला. या कामासाठी खलील याला पाच लाख रुपये दिले गेले होते. या तिघांपैकी खलील हा गेल्या दोन वर्षांत अनेकदा पाकिस्तानात आला होता. त्याला हेरगिरीसाठी ५ लाख रुपये देण्यात आले होते आणि त्याच्या सांगण्यावरून इम्तियाझ आणि रशिद हेरगिरी करीत होते, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. (वृत्तसंस्था)