शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

वैमानिकाने दिला होता धोक्याचा संदेश?

By admin | Updated: February 6, 2015 02:25 IST

तैवानमध्ये घडलेल्या विमान अपघातात मरण पावलेल्यांची संख्या ३१ वर पोहोचली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कारण अजूनही १२ जण बेपत्ता आहेत.

तैपेई : तैवानमध्ये घडलेल्या विमान अपघातात मरण पावलेल्यांची संख्या ३१ वर पोहोचली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कारण अजूनही १२ जण बेपत्ता आहेत. ही दुर्घटना कशी घडली, याबाबत तैवानचे नागरी उड्डयन प्रशासन आणि ट्रान्सएशिया एअरवेजने काहीही ठोस सांगण्यास नकार दिला असला तरी वैमानिकाने विमान ९० अंशांनी कलंडण्याआधी विमान संकटात असल्याचा संदेश दिला होता (मे डे) असे नागरी उड्डयन प्रशासनाच्या अधिकाऱ्याने सांगितले; परंतु त्यांनी दुर्घटनेमागील संभाव्य कारणांबाबत बोलणे टाळले.ट्रान्स एशियाचे विमान (जीई-२३५-एटीआर ७२-६००) उड्डाणानंतर १० मिनिटांनी हवेत हेलकावे घेत पुलावर धडकत नदीत (किलंग) कोसळले. या विमानात चालक पथक आणि ५८ प्रवासी होते. बेपत्ता सर्व प्रवासी चिनी पर्यटक आहेत. हे विमान किनमेनकडे जात होते. (वृत्तसंस्था)पुलावर धडकण्याआधी या विमानाचा एक पंखा पुलावरून जाणाऱ्या एका टॅक्सीला धडकला होता. हे विमान कोसळत असताना पुलावरून जाणाऱ्या एका टॅक्सीवरील डॅशबोर्ड कॅमेऱ्याने हा अंतिम क्षण टिपला आहे.विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाल्याचे तैवानच्या नागरी उड्डयन प्रशासनाने सांगितले. तथापि, नदीतील दलदलीमुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. अग्निशमन दलाचे पाणबुडे नदीच्या तळाशी जाऊन मृतदेह शोधत आहेत.३१ चिनी प्रवाशांचे नातेवाईक विशेष विमानाने तैवानला पोहोचत आहेत. १५ प्रवाशांना वाचविण्यात आले आहे. यात एका कुटुंबातील तिघांचा समावेश असून यात एका बालकाचाही समावेश आहे. एटीआर-७२-६०० हे विमान दर्जेदार कंपनीचे असून वैमानिकालाही ४,९०० तास उड्डाणाचा अनुभव होता, असे नागरी उड्डयन प्रशासनाने सांगितले.आवाज ऐकल्यानंतर आसने बदलली...हे विमान उड्डाण घेण्यापूर्वीच तैवानी दाम्पत्य आपल्या दोन वर्षांच्या बाळासह डाव्या बाजूकडील आसन बदलत उजव्या बाजूकडील आसनावर स्थानापन्न झाल्याने ते बचावले, असे वृत्त युनायटेड डेलीने दिले आहे. विमानाच्या पंख्यातून येणाऱ्या आवाजामुळे अस्वस्थ वाटू लागल्याने आम्ही जागा बदलली, असे लिन यांनी सांगितल्याचे या वृत्तात म्हटले आहे. नंतर विमान कलंडत नदीत कोसळले. लिनने जागा सोडत आपल्या पत्नीला ओढून वर काढले. आपले बाळ पाण्यात पडल्याचे लिनला दिसले. पाण्यात बुडाल्याने बाळाचा चेहरा आणि ओठ काळे-निळे पडले होते. प्रसंगावधान राखून बाळाच्या छातीवर दाब देऊन (सीपीआर तंत्र) बाळाच्या हृदयाची गती सुरू करण्यात लिन यशस्वी ठरला.हवाई प्रवास धोकादायक होत आहे का?.....गेल्या वर्षी एअर मलेशियाचे विमान भर आकाशातून गायब होणे आणि त्यानंतर एअर एशिया विमानाच्या भीषण दुर्घटनेमुळे हवाई प्रवास धोकादायक तर होत नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. विमान दुर्घटनेच्या दृष्टीने मागचे वर्ष अत्यंत दु:खदायी ठरले.गेल्या वर्षी २१ विमान दुर्घटना घडल्या. विमान दुर्घटनांची ही संख्या कमी आहे. पन्नास वर्षांपूर्वी आजच्या तुलनेत पाच टक्के विमानांची उड्डाणे होत होती; परंतु दुर्घटनेचे प्रमाण चौपट होते. एअरलाईन रेटिंग डॉट कॉमच्या माहितीनुसार मागच्या वर्षी जगभर विमानसेवा देणाऱ्या व्यावसायिक कंपन्यांच्या विमानांनी २ कोटी ७० लाख उड्डाणे केली. यातून ३.३ अब्ज प्रवाशांनी हवाई सफर केली. (वृत्तसंस्था)