शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

वैमानिकाने दिला होता धोक्याचा संदेश?

By admin | Updated: February 6, 2015 02:25 IST

तैवानमध्ये घडलेल्या विमान अपघातात मरण पावलेल्यांची संख्या ३१ वर पोहोचली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कारण अजूनही १२ जण बेपत्ता आहेत.

तैपेई : तैवानमध्ये घडलेल्या विमान अपघातात मरण पावलेल्यांची संख्या ३१ वर पोहोचली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कारण अजूनही १२ जण बेपत्ता आहेत. ही दुर्घटना कशी घडली, याबाबत तैवानचे नागरी उड्डयन प्रशासन आणि ट्रान्सएशिया एअरवेजने काहीही ठोस सांगण्यास नकार दिला असला तरी वैमानिकाने विमान ९० अंशांनी कलंडण्याआधी विमान संकटात असल्याचा संदेश दिला होता (मे डे) असे नागरी उड्डयन प्रशासनाच्या अधिकाऱ्याने सांगितले; परंतु त्यांनी दुर्घटनेमागील संभाव्य कारणांबाबत बोलणे टाळले.ट्रान्स एशियाचे विमान (जीई-२३५-एटीआर ७२-६००) उड्डाणानंतर १० मिनिटांनी हवेत हेलकावे घेत पुलावर धडकत नदीत (किलंग) कोसळले. या विमानात चालक पथक आणि ५८ प्रवासी होते. बेपत्ता सर्व प्रवासी चिनी पर्यटक आहेत. हे विमान किनमेनकडे जात होते. (वृत्तसंस्था)पुलावर धडकण्याआधी या विमानाचा एक पंखा पुलावरून जाणाऱ्या एका टॅक्सीला धडकला होता. हे विमान कोसळत असताना पुलावरून जाणाऱ्या एका टॅक्सीवरील डॅशबोर्ड कॅमेऱ्याने हा अंतिम क्षण टिपला आहे.विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाल्याचे तैवानच्या नागरी उड्डयन प्रशासनाने सांगितले. तथापि, नदीतील दलदलीमुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. अग्निशमन दलाचे पाणबुडे नदीच्या तळाशी जाऊन मृतदेह शोधत आहेत.३१ चिनी प्रवाशांचे नातेवाईक विशेष विमानाने तैवानला पोहोचत आहेत. १५ प्रवाशांना वाचविण्यात आले आहे. यात एका कुटुंबातील तिघांचा समावेश असून यात एका बालकाचाही समावेश आहे. एटीआर-७२-६०० हे विमान दर्जेदार कंपनीचे असून वैमानिकालाही ४,९०० तास उड्डाणाचा अनुभव होता, असे नागरी उड्डयन प्रशासनाने सांगितले.आवाज ऐकल्यानंतर आसने बदलली...हे विमान उड्डाण घेण्यापूर्वीच तैवानी दाम्पत्य आपल्या दोन वर्षांच्या बाळासह डाव्या बाजूकडील आसन बदलत उजव्या बाजूकडील आसनावर स्थानापन्न झाल्याने ते बचावले, असे वृत्त युनायटेड डेलीने दिले आहे. विमानाच्या पंख्यातून येणाऱ्या आवाजामुळे अस्वस्थ वाटू लागल्याने आम्ही जागा बदलली, असे लिन यांनी सांगितल्याचे या वृत्तात म्हटले आहे. नंतर विमान कलंडत नदीत कोसळले. लिनने जागा सोडत आपल्या पत्नीला ओढून वर काढले. आपले बाळ पाण्यात पडल्याचे लिनला दिसले. पाण्यात बुडाल्याने बाळाचा चेहरा आणि ओठ काळे-निळे पडले होते. प्रसंगावधान राखून बाळाच्या छातीवर दाब देऊन (सीपीआर तंत्र) बाळाच्या हृदयाची गती सुरू करण्यात लिन यशस्वी ठरला.हवाई प्रवास धोकादायक होत आहे का?.....गेल्या वर्षी एअर मलेशियाचे विमान भर आकाशातून गायब होणे आणि त्यानंतर एअर एशिया विमानाच्या भीषण दुर्घटनेमुळे हवाई प्रवास धोकादायक तर होत नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. विमान दुर्घटनेच्या दृष्टीने मागचे वर्ष अत्यंत दु:खदायी ठरले.गेल्या वर्षी २१ विमान दुर्घटना घडल्या. विमान दुर्घटनांची ही संख्या कमी आहे. पन्नास वर्षांपूर्वी आजच्या तुलनेत पाच टक्के विमानांची उड्डाणे होत होती; परंतु दुर्घटनेचे प्रमाण चौपट होते. एअरलाईन रेटिंग डॉट कॉमच्या माहितीनुसार मागच्या वर्षी जगभर विमानसेवा देणाऱ्या व्यावसायिक कंपन्यांच्या विमानांनी २ कोटी ७० लाख उड्डाणे केली. यातून ३.३ अब्ज प्रवाशांनी हवाई सफर केली. (वृत्तसंस्था)