शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
5
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
6
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
8
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
9
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
10
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
11
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
12
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
13
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
14
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
15
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
16
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
17
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
18
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
19
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
20
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा

जगभर विनाश होईल, आर्थिक मंदी येईल...; बाबा वेंगाची भयानक भाकितं, जगाचा अंतही सांगून टाकला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 10:59 IST

Baba Vanga Predictions : २०२५ सह पुढच्या काही वर्षांबद्दल बाबा वेंगा यांनी अनेक भयानक भाकिते केली आहेत. यात त्यांनी जगाचा अंत केव्हा होईल, याची देखील भविष्यवाणी केली आहे.

बाबा वेंगा यांनी केलेली भाकितं आजवर अनेकदा खरी ठरल्याचे सिद्ध झाले आहे. ९/११ चा दहशतवादी हल्ला, ब्रेक्झिट किंवा त्सुनामीचा विनाश, सोव्हिएत युनियनचे पतन, चेरनोबिल दुर्घटना आणि अगदी बराक ओबामा राष्ट्रपती होण्याची त्यांची भविष्यवाणी खरी ठरली. आता जग २०२५ मध्ये वावरत आहे. २०२५ सह पुढच्या काही वर्षांबद्दल बाबा वेंगा यांनी अनेक भयानक भाकिते केली आहेत. यात त्यांनी जगाचा अंत केव्हा होईल, याची देखील भविष्यवाणी केली आहे.

२०२५ सालासाठी बाबा वेंगा यांची भविष्यवाणीबाबा वेंगा यांनी २०२५ सालासाठी भाकीत केले आहे की, हे वर्ष आर्थिकदृष्ट्या अस्थिर असू शकते, राजकीय तणाव वाढेल, व्यापाराबाबत मोठ्या देशांमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण होईल, ज्यामुळे अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. बिघडत्या आर्थिक परिस्थितीमुळे अनेक देशांना मंदीचा सामना करावा लागू शकतो, असेही त्यांनी म्हटले होते. यासोबतच, बाबा वेंगाच्या भाकितात असाही दावा केला आहे की, मानवतेचं पतन २०२५मध्ये सुरू होईल आणि ५०७९ पर्यंत जगाचा अंत होईल.

भाकितं ठरली खरी!बाबा वेंगाच्या सर्व भाकितांपैकी आतापर्यंत भूकंपाची भाकिते पूर्णपणे खरी होती. २८ मार्च रोजी म्यानमार आणि थायलंडच्या काही भागात ७.७ तीव्रतेचा भूकंप झाला आणि त्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला. 

२०२५ च्या सुरुवातीला चीन आणि अमेरिका यांच्यातील टॅरिफ वॉर तीव्र झाला. अमेरिकेने चिनी उत्पादनांवर १४५ टक्क्यांपर्यंत कर लादले. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या या निर्णयाबाबत शेअर बाजारात अनिश्चितता सुरूच आहे. त्याच वेळी, पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संघर्षावरून बाबा वेंगा यांचे २०२५ साठीचे भाकीत खरे ठरल्याचे स्पष्ट संकेत मिळले आहेत. 

बाबा वेंगा यांनी आणखी काय भाकितं केली?> २०२५ मध्ये युरोपमधील संघर्षामुळे खंडातील लोकांचे जीवन उद्ध्वस्त होईल.> २०२८ मध्ये, मानव ऊर्जा स्रोत म्हणून शुक्र ग्रहाचा शोध घेण्यास सुरुवात करतील.> २०३३ मध्ये, जगभरात समुद्राची पातळी वाढेल.> २०७६ मध्ये साम्यवाद जगभरातील देशांमध्ये पसरेल.> २१३० मध्ये, मानव परग्रही लोकांशी संपर्क साधू शकतात.> २१७० मध्ये भीषण दुष्काळ पडेल, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान होईल.> ३००५ पृथ्वी मंगळावरील संस्कृतीशी युद्ध करते.> ३७९७ मध्ये पृथ्वी रिकामी करावी लागेल कारण ती राहण्यायोग्य राहणार नाही.> तर, ५०७९ मध्ये या जगाचा अंत होईल.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय