शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

जगभर विनाश होईल, आर्थिक मंदी येईल...; बाबा वेंगाची भयानक भाकितं, जगाचा अंतही सांगून टाकला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 10:59 IST

Baba Vanga Predictions : २०२५ सह पुढच्या काही वर्षांबद्दल बाबा वेंगा यांनी अनेक भयानक भाकिते केली आहेत. यात त्यांनी जगाचा अंत केव्हा होईल, याची देखील भविष्यवाणी केली आहे.

बाबा वेंगा यांनी केलेली भाकितं आजवर अनेकदा खरी ठरल्याचे सिद्ध झाले आहे. ९/११ चा दहशतवादी हल्ला, ब्रेक्झिट किंवा त्सुनामीचा विनाश, सोव्हिएत युनियनचे पतन, चेरनोबिल दुर्घटना आणि अगदी बराक ओबामा राष्ट्रपती होण्याची त्यांची भविष्यवाणी खरी ठरली. आता जग २०२५ मध्ये वावरत आहे. २०२५ सह पुढच्या काही वर्षांबद्दल बाबा वेंगा यांनी अनेक भयानक भाकिते केली आहेत. यात त्यांनी जगाचा अंत केव्हा होईल, याची देखील भविष्यवाणी केली आहे.

२०२५ सालासाठी बाबा वेंगा यांची भविष्यवाणीबाबा वेंगा यांनी २०२५ सालासाठी भाकीत केले आहे की, हे वर्ष आर्थिकदृष्ट्या अस्थिर असू शकते, राजकीय तणाव वाढेल, व्यापाराबाबत मोठ्या देशांमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण होईल, ज्यामुळे अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. बिघडत्या आर्थिक परिस्थितीमुळे अनेक देशांना मंदीचा सामना करावा लागू शकतो, असेही त्यांनी म्हटले होते. यासोबतच, बाबा वेंगाच्या भाकितात असाही दावा केला आहे की, मानवतेचं पतन २०२५मध्ये सुरू होईल आणि ५०७९ पर्यंत जगाचा अंत होईल.

भाकितं ठरली खरी!बाबा वेंगाच्या सर्व भाकितांपैकी आतापर्यंत भूकंपाची भाकिते पूर्णपणे खरी होती. २८ मार्च रोजी म्यानमार आणि थायलंडच्या काही भागात ७.७ तीव्रतेचा भूकंप झाला आणि त्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला. 

२०२५ च्या सुरुवातीला चीन आणि अमेरिका यांच्यातील टॅरिफ वॉर तीव्र झाला. अमेरिकेने चिनी उत्पादनांवर १४५ टक्क्यांपर्यंत कर लादले. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या या निर्णयाबाबत शेअर बाजारात अनिश्चितता सुरूच आहे. त्याच वेळी, पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संघर्षावरून बाबा वेंगा यांचे २०२५ साठीचे भाकीत खरे ठरल्याचे स्पष्ट संकेत मिळले आहेत. 

बाबा वेंगा यांनी आणखी काय भाकितं केली?> २०२५ मध्ये युरोपमधील संघर्षामुळे खंडातील लोकांचे जीवन उद्ध्वस्त होईल.> २०२८ मध्ये, मानव ऊर्जा स्रोत म्हणून शुक्र ग्रहाचा शोध घेण्यास सुरुवात करतील.> २०३३ मध्ये, जगभरात समुद्राची पातळी वाढेल.> २०७६ मध्ये साम्यवाद जगभरातील देशांमध्ये पसरेल.> २१३० मध्ये, मानव परग्रही लोकांशी संपर्क साधू शकतात.> २१७० मध्ये भीषण दुष्काळ पडेल, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान होईल.> ३००५ पृथ्वी मंगळावरील संस्कृतीशी युद्ध करते.> ३७९७ मध्ये पृथ्वी रिकामी करावी लागेल कारण ती राहण्यायोग्य राहणार नाही.> तर, ५०७९ मध्ये या जगाचा अंत होईल.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय