शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कर्जमाफीसाठी लागेल मोठी रक्कम

By admin | Updated: April 26, 2017 00:48 IST

भारतातील अनेक राज्यांनी अलीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी केली आहे. त्याबाबत देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार

वॉशिंग्टन : भारतातील अनेक राज्यांनी अलीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी केली आहे. त्याबाबत देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी सांगितले की, देशभरात अशा प्रकारे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यास सकळ देशांतर्गत उत्पन्नाच्या २ टक्के रक्कम त्यासाठी लागेल. गेल्या आठवड्यात येथील पीटर्सन इन्स्टिट्यूटमध्ये एक परिसंवाद झाला. या कार्यक्रमात बोलताना सुब्रमण्यम यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आम्ही अलीकडच्या काळातील कर्जमाफीच्या घोषणा पाहिल्या आहेत. कर्जमाफीचा विस्तार केल्यास त्यावरील खर्च वाढेल. संपूर्ण देशात कर्जमाफी लागू करायची झाल्यास सकल देशांतर्गत उत्पन्नाच्या २ टक्के खर्च लागेल. याचाच अर्थ सरकारचे तेवढे नुकसान होईल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांना ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याची घोषणा नुकतीच केली आहे. या निर्णयास सुब्रमण्यम यांनी विरोध केला आहे. त्यांनी म्हटले की, या निर्णयामुळे कर्जमाफीचे लोण सगळीकडे पसरण्याचा धोका आहे. तसे झाल्यास माझ्या दृष्टीने हे मोठे आव्हान ठरेल. अशा कारवायांमुळे सरकारी खजिना मजबूत करण्याच्या प्रयत्नांना मोठे आव्हान मिळू शकते. केंद्र सरकारच्या यशाला राज्य सरकारे निष्प्रभ करू शकतात.सुब्रमण्यम म्हणाले की, खाजगी क्षेत्रातील कर्ज कसे माफ करता येईल, या मुद्द्याशी सरकार सध्या झुंजत आहे; पण सार्वजनिक क्षेत्रातील करदात्यांचा पैसा असा खाजगी क्षेत्रातील कर्जमाफीसाठी कसा काय वापरला जाऊ शकतो?