शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

दहशतवादी तळांमुळे आमचे आयुष्य नरक बनलंय, PoKमधील स्थानिकांचा संताप

By admin | Updated: October 6, 2016 14:25 IST

पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी दहशतावाद्यांविरोधात आंदोलन पुकारले आहे. 'दहशतवाद बंद करा, दहशतवाद मुर्दाबाद', अशी घोषणाबाजी करत स्थानिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुझफ्फराबाद, दि.6 - पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी दहशतावाद्यांविरोधात आंदोलन पुकारले आहे. 'दहशतवाद बंद करा, दहशतवाद मुर्दाबाद', अशी घोषणाबाजी करत स्थानिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. मुझफ्फराबाद, कोटली, मीरपूर, गिलगिट, दायमर आणि नीलम खोऱ्यातील नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांमुळे आमचे आयुष्य नरक बनले आहे. सततच्या होणा-या दहशतवादी कारवायांमुळे येथील लोकांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे, असा संताप व्यक्त करत दहशतवादी तळांमुळे राहते ठिकाण उद्ध्वस्त झाल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. 
 
पाकिस्तानच्या ISI या गुप्तचर संस्थेद्वारे दहशतवाद्यांना रसद पुरवली जाते,असा आरोप देखील यावेळी स्थानिकांनी केला आहे. जर प्रशासनाकडून दहशतवाद्यांविरोधात ठाम भूमिका मांडण्यात आली नाही, तर आम्ही याविरोधात योग्य ती कृती अमलात आणू, असा इशारा येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिला आहे.  गेल्या अनेक वर्षांपासून पाकव्याप्त काश्मीरमधील जनता दहशतवाद्यांचे तळ हटवण्याची मागणी करत आहेत, मात्र याकडे वारंवार दुर्लक्ष केल जात असल्याचे आरोप स्थानिकांनी केला आहे.