शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
3
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
4
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
5
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
6
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
7
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
8
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
9
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
10
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
11
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
12
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
13
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
14
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
15
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
16
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
17
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
18
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
19
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
20
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम

युरोपप्रमाणे भारतातही दहशतवादी हल्ले करा, अल-कायदाचं मुस्लिमांना आवाहन

By admin | Updated: July 4, 2016 11:17 IST

ढाकामध्ये दहशतवादी हल्ला झाल्याच्या एका दिवसानंतर अल-कायदा या दहशतवादी संघटनेने भारतीय मुस्लिमांना देशात युरोपप्रमाणे एकट्याने हल्ला (Lone-Wolf) करण्याचं आवाहन केलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 04 - ढाकामध्ये दहशतवादी हल्ला झाल्याच्या एका दिवसानंतर अल-कायदा या दहशतवादी संघटनेने भारतीय मुस्लिमांना देशात युरोपप्रमाणे एकट्याने हल्ला (Lone-Wolf) करण्याचं आवाहन केलं आहे. विशेष म्हणजे युरोपात हल्ले करणा-यांनी इसीसपासून प्रभावित होऊन एकट्याने दहशतवादी हल्ले घडवून आणले आहे. इसीस भारतामध्येही अशा प्रकारचे हल्ले करण्यासाठी लोकांना भडकवत आहे. 
 
'भारतातील मुस्लिमांना आता पुढे आलं पाहिजे, युरोपप्रमाणे भारतातही प्रशासन आणि पोलीस अधिका-यांची हत्या केली पाहिजे', असं भडकाऊ वक्तव्य अल-कायदाचा भारतीय उपखंडातील प्रमुख असीम उमर याने केलं आहे. अल-कायदा गेली 2 वर्ष भारतामध्ये दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी भारतीयांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहे. पण अजूनपर्यंत त्यांना हवं तसं यश मिळालेलं नाही. 
 
 
अमेरिकेने नुकतंच भारतीय उपखंडातील अल-कायदा संघटनेला परदेशी दहशतवाद्यांच्या यादीत टाकलं असून, असीम उमरचा समावेश जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत केला आहे. अल-कायदा आणि इसीस भारतात हल्ले करण्यासाठी भारतीयांना भरती करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या पार्श्वभुमीवर गुप्तचर यंत्रणाही सज्ज झाली आहे. 
 
(ढाका दहशतवादी हल्ल्यात भारतीय तरुणीचा मृत्यू)
 
अल-कायदा एकटे हल्ले करण्यासाठी ओळखली जात नाही. मात्र भारतीय उपखंडात इसीसची वाढती लोकप्रियता पाहता अल-कायदा या पर्यायाचा विचार करत असल्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. भारतीय उपखंडातील अल-कायदा आणि इसीसमधील शत्रुत्व जगजाहीर आहे. दोन्ही दहशतवादी संघटना उपखंडात मुख्यत: भारत आणि बांगलादेशमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानधील दहशतवादी संघटनांनी याठिकाणी आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं. 
 
'अल-कायदा आणि इसीस एकट्याने हल्ला करण्यावर भर देत आहेत. कारण मुख्यत: भारतात त्यांनी हवं तसं जाळ पसरता आलेलं नाही. एकट्याने हल्ला केल्यास त्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवणं कठीण होऊन जातं. ज्याप्रमाणे ओरलांडो हल्ल्यात अमेरिकी अधिका-यांनी ओमर मतीनबद्दल काहीच ठावठिकाणा लागला नव्हता. भारतीय जर अशाप्रकारच्या हल्ल्यांकडे आकर्षित झाले तर यामुळे खुप मोठा धोका निर्माण होऊ शकतो', असं मत गुप्तचर खात्यातील अधिका-यांनी व्यक्त केलं आहे.