शहरं
Join us  
Trending Stories
1
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
2
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
3
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटमधील 'डॉन'चा विक्रम मोडला
4
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
5
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
6
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
7
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
8
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
9
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
10
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
11
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
12
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
13
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
14
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
15
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
16
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
17
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
18
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
19
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
20
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?

पाकसोबतच्या चर्चेत दहशतवादाचा मुद्दा

By admin | Updated: March 4, 2015 00:11 IST

भारत आणि पाकिस्तानने सात महिन्यांच्या खंडानंतर चर्चा सुरू करताना बुधवारी परस्परांच्या चिंता आणि हितांबाबत विचारांची देवाण-घेवाण केली.

इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तानने सात महिन्यांच्या खंडानंतर चर्चा सुरू करताना बुधवारी परस्परांच्या चिंता आणि हितांबाबत विचारांची देवाण-घेवाण केली. परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पाक समपदस्थांबरोबरच्या बैठकीत मुंबई हल्ल्यासह दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. सार्क (दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना) दौऱ्यादरम्यान सकाळी येथे पोहोचलेले जयशंकर यांनी एजाज चौधरी यांच्याशी चर्चा केली. भारत शेजारी देशांसोबत सहकार्याचे संबंध निर्माण करू इच्छितो तसेच त्याला सार्ककडून मोठ्या आशा असल्याचे जयशंकर यांनी चौधरींना सांगितले. ‘माझ्या दौऱ्याने आमच्या द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चेची संधी उपलब्ध करून दिली आहे. आम्ही एकमेकांच्या चिंता व हितांबाबत मनमोकळेपणे चर्चा केली. आम्ही संयुक्त आधार शोधून मतभेद कमी करण्यासाठी एकत्र काम करण्यावर सहमत झालो, असे जयशंकर यांनी सांगितले. चौधरींसोबतच्या चर्चेनंतर ते बोलत होते. (वृत्तसंस्था)