शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादाचा हत्यारासारखा वापर होतोय

By admin | Updated: November 17, 2015 02:48 IST

काही देश दहशतवादाचा वापर सरकारी नीतीसारखा करत आहेत. दहशतवादाला धर्मापासून दूर करण्यावर भर देतानाच राजकीय नफा-तोटा बाजूला ठेवून दहशतवादाविरुद्ध

अंताल्या (तुर्कस्तान) : काही देश दहशतवादाचा वापर सरकारी नीतीसारखा करत आहेत. दहशतवादाला धर्मापासून दूर करण्यावर भर देतानाच राजकीय नफा-तोटा बाजूला ठेवून दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाईचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे पुनरुच्चार केला. जी-२० शिखर परिषदेत ‘जागतिक आव्हान : दहशतवाद आणि शरणार्थी संकट’ या विषयावर येथे आयोजित चर्चेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काही देश दहशतवादाचा वापर हत्यारासारखा करत आहेत. दहशतवाद हे आज जगासमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. दहशतवादाची झळ मृत्यूच्या स्वरूपात समाजाच्या सर्वच घटकांना बसत आहे. दहशतवादाचा हा जुना फॉर्म्युला आजही कायम आहे. कारण अनेक देश दहशतवादाचा वापर सरकारी नीतीसारखा करत आहेत. ते म्हणाले की, दहशतवादाविरुद्ध जगाला आता एकत्र आवाज करावा लागेल, ठामपणे उभे राहावे लागेल. त्यासाठी अतिरेकी गट आणि त्यांना समर्थन करणारे देश यांच्यात फरक करायला नको. जे देश दहशतवादी कारवायांसाठी मदत करतात त्यांना खड्यासारखे बाजूला टाकण्याची गरज आहे. तथापि, मानवी मूल्यांवर विश्वास असणाऱ्यांना साथ देण्याची गरज आहे. दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदे आणि एकूणच व्यवस्थेत बदल करण्याची गरज आहे. बहुसंस्कृती असलेल्या देशांना दहशतवादाचा धोका अधिक आहे. कारण अतिरेकी कारवायांसाठी भरती व अतिरेक्यांच्या निशाण्यावरही असेच देश असतात, असेही मोदी म्हणाले. मोदी म्हणाले की, पश्चिम आशिया आणि आफ्रिकेसारख्या देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. निर्वासितांचे संकट हेही मोठे आव्हान असून त्यावर तोडगा काढण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)दहशतवादाचे संकट...अंतलया येथे जी-२० देशांच्या प्रमुखांच्या सुरू असलेल्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगान (उजवीकडे) यांनी सोमवारी भेट घेतली.जागतिक स्तरावर रणनीती हवी :पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दहशतवाद रोखण्यासाठी विना विलंब जागतिक स्तरावर एक व्यापक रणनीती आखण्याची गरज आहे. अतिरेक्यांपर्यंत पोहोचणारी शस्त्रास्त्रे रोखणे, त्यांचे उत्पन्नाचे स्रोत बंद करणे यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.