शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

दहशतवादाचा हत्यारासारखा वापर होतोय

By admin | Updated: November 17, 2015 02:48 IST

काही देश दहशतवादाचा वापर सरकारी नीतीसारखा करत आहेत. दहशतवादाला धर्मापासून दूर करण्यावर भर देतानाच राजकीय नफा-तोटा बाजूला ठेवून दहशतवादाविरुद्ध

अंताल्या (तुर्कस्तान) : काही देश दहशतवादाचा वापर सरकारी नीतीसारखा करत आहेत. दहशतवादाला धर्मापासून दूर करण्यावर भर देतानाच राजकीय नफा-तोटा बाजूला ठेवून दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाईचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे पुनरुच्चार केला. जी-२० शिखर परिषदेत ‘जागतिक आव्हान : दहशतवाद आणि शरणार्थी संकट’ या विषयावर येथे आयोजित चर्चेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काही देश दहशतवादाचा वापर हत्यारासारखा करत आहेत. दहशतवाद हे आज जगासमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. दहशतवादाची झळ मृत्यूच्या स्वरूपात समाजाच्या सर्वच घटकांना बसत आहे. दहशतवादाचा हा जुना फॉर्म्युला आजही कायम आहे. कारण अनेक देश दहशतवादाचा वापर सरकारी नीतीसारखा करत आहेत. ते म्हणाले की, दहशतवादाविरुद्ध जगाला आता एकत्र आवाज करावा लागेल, ठामपणे उभे राहावे लागेल. त्यासाठी अतिरेकी गट आणि त्यांना समर्थन करणारे देश यांच्यात फरक करायला नको. जे देश दहशतवादी कारवायांसाठी मदत करतात त्यांना खड्यासारखे बाजूला टाकण्याची गरज आहे. तथापि, मानवी मूल्यांवर विश्वास असणाऱ्यांना साथ देण्याची गरज आहे. दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदे आणि एकूणच व्यवस्थेत बदल करण्याची गरज आहे. बहुसंस्कृती असलेल्या देशांना दहशतवादाचा धोका अधिक आहे. कारण अतिरेकी कारवायांसाठी भरती व अतिरेक्यांच्या निशाण्यावरही असेच देश असतात, असेही मोदी म्हणाले. मोदी म्हणाले की, पश्चिम आशिया आणि आफ्रिकेसारख्या देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. निर्वासितांचे संकट हेही मोठे आव्हान असून त्यावर तोडगा काढण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)दहशतवादाचे संकट...अंतलया येथे जी-२० देशांच्या प्रमुखांच्या सुरू असलेल्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगान (उजवीकडे) यांनी सोमवारी भेट घेतली.जागतिक स्तरावर रणनीती हवी :पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दहशतवाद रोखण्यासाठी विना विलंब जागतिक स्तरावर एक व्यापक रणनीती आखण्याची गरज आहे. अतिरेक्यांपर्यंत पोहोचणारी शस्त्रास्त्रे रोखणे, त्यांचे उत्पन्नाचे स्रोत बंद करणे यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.