शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

चिनी भातशेतीला दहा हजार वर्षांचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2017 00:31 IST

जगात भात खाणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे त्याचे पीकही मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. आज जगात तांदूळ दुसऱ्या क्रमांकाचे

जगात भात खाणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे त्याचे पीकही मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. आज जगात तांदूळ दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक क्षेत्रफळावर घेतले जाणारे पीक आहे. जगात भारत तांदळाचे पीक घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. अनेक मोठ्या राज्यांत तांदळाचे मोठ्या प्रमाणावर पीक घेतले जाते. विशेष म्हणजे पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशा, आसाम व पंजाब राज्यांना तांदळाचे पीक घेणारे राज्य समजले जाते.दक्षिण भारतात तांदूळ हे मोठ्या संख्येतील लोकांचे मुख्य अन्न आहे. त्याच्या पिकाबद्दल लोकांमध्ये अनेक मतमतांतरे आहेत; परंतु नुकतेच चीनचे लू होउयुआन यांनी आपल्या संशोधनात मोठा खुलासा केला आहे. लू होउयुआन इन्स्टिट्यूट आॅफ जिओलॉजी अँड जिओफिजिक्समध्ये संशोधन करतात. त्यांच्या संशोधनात एक बाब स्पष्ट झाली की, जेव्हा युग परिवर्तन घडत होते. पृथ्वी जेव्हा जुने युग म्हणजे प्लाइस्टसीनमधून नवे युग म्हणजे हेलोसीनमध्ये परिवर्तीत होत होते त्यावेळी परिस्थिती खूप गंभीर होती. पर्यावरणीय व भौगोलिक परिवर्तन वेगाने घडत होते.अशा त्या काळात दहा हजार वर्षे आधी हेलोसीनमध्ये नव्या वनस्पतीही विकसित झाल्या होत्या. त्यात तांदळाचीही उत्पत्ती झाली. या दरम्यान चीनने आपले देशांतर्गत उत्पादन सगळ्यात आधी सुरू केले. त्याने मोठ्या प्रमाणावर त्याची शेती सुरू केली होती. नुकतेच त्यांचे हे संशोधन नॅशनल अकॅडमी आॅफ सायन्सेसचे यूएस प्रोसिडिंग्जमध्ये प्रसिद्ध झाले. चीनच्या झिंझियांग प्रांतचे चिनी विज्ञान अकॅडमीमध्ये अवशेष आणि पुरातत्व संस्थान, भौगोलिक विज्ञान संस्थान आणि नैसर्गिक संसाधन अनुसंधान संस्थानमध्ये या विषयात बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. त्यावर तांदळाची शेती सगळ्यात आधी कुठे सुरू झाली, यावर भर आहे.