शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

दहशतवाद्यांसाठी आमचा बळी का घेताय, पाकिस्तानी नागरिकांचा संतप्त प्रश्न

By admin | Updated: October 15, 2016 11:11 IST

अफगाणिस्तान सीमेजवळ असणा-या वजीरिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांविरोधात अभियान सुरू केले आहे. मात्र या कारवाईचा फटका तेथील हजारो पश्तून नागरिकांना बसत आहे

ऑनलाइन लोकमत

काबुल, दि. 15 - अफगाणिस्तान सीमेजवळ असणा-या वजीरिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांविरोधात अभियान सुरू केले आहे. मात्र या कारवाईचा फटका तेथील हजारो पश्तून नागरिकांना बसत आहे, कित्येकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे तर हजारोंच्या संख्येने लोकं बेघर झाली आहेत. स्वतःच्या जीव वाचवण्यासाठी हा नागरिकांनी अफगाणिस्तानमधील खोश्त येथे स्थलांतर केले आहे. आम्हा पश्तून नागरिकांना संपवण्याचा पाकिस्तानचा डाव आहे, असा आरोप पश्तून पीडितांनी केला आहे.
पाकिस्तानी सैन्य आणि वायुसेनेकडून होणा-या हल्ल्यांमुळे हजारो पाकिस्तानी नागरिकांना पश्तून सोडणे भाग पडले आहे. वारंवार होणा-या हल्ल्यांमुळे येथे राहणे कठीण झाले आहे, घर- संसार-संपत्ती सारे काही उद्ध्वस्त झाले आहे. आम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी पाकिस्तान कुठली तरी कारणे नेहमीच शोधत आहे, तसंच गेल्या 40 वर्षांपासून पाकिस्तान आपल्यावर युद्ध थोपवत आल्याचा आरोपही पश्तून नागरिकांनी केला आहे. 
 
 
यामुळे, वजीरिस्तानमध्ये राहणारे असे अनेक पाकिस्तानी नागरिक आपल्याच सैन्याकडून होणा-या हल्ल्यांना बळी पडत आहेत. 'कोणतीही पूर्व कल्पना न देता पाकिस्तानचे सरकार अचानक हल्ले करतं, आम्हाला काय करायचे आहे?, कुठे जायचे आहे?, याबाबत कोणतीही सूचना न देता आम्हाला लक्ष्य केले जाते, असा आरोपही पश्तून नागरिकांनी केला आहे. 
पाकिस्तान लष्कराने केलेल्या हल्ल्यात अख्खीच्या -अख्खी गावे उद्ध्वस्त झाली आहेत. तालिबानविरोधात ही कारवाई सुरू असल्याचे सैन्याकडून सांगण्यात येत आहे.
 
मात्र, 'कथित दहशतवादी कुठे लपले आहेत, कुठल्या ठिकाणाहून दहशतवादी कारवायांचे कट-कारस्थान रचत आहेत, याची माहिती सैन्याला आहे. ते सर्व दहशतवादी इस्लामाबाद आणि कराचीमध्ये लपले आहेत. वजीरिस्तानमध्ये आम्ही दहशतवाद्यांना कधीही आश्रय दिला नाही. कधीही दहशतवादी कारवायांचे समर्थन केले नाही. पाकिस्तान कधी अमेरिकेसोबत तर कधी स्वतःच्या शेजा-यांसोबत युद्ध पुकारत आला आहे', अशा शब्दांत पश्तून नागरिकांनी पाकिस्तानी सैन्याकडून होणा-या हल्ल्यांचा तीव्र निषेध करत त्यांच्यावर अनेक आरोपही केले आहेत.