शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या स्थितीचा फायदा घ्या

By admin | Updated: May 17, 2015 01:29 IST

चीनमधील २२ अग्रणी कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी (सीईओ) संवाद साधून चिनी गुंतवणूकदारांना भारतातील बदललेल्या स्थितीचा फायदा घेण्याचे आवाहन केले.

चिनी गुंतवणूकदारांना आवाहन : भारत-चीन कंपन्यांत २२ अब्ज डॉलरचे २६ करारशांघाय : तीन दिवसांचा दौरा आटोपून मंगोलियाकडे रवाना होण्यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय येथे चीनमधील २२ अग्रणी कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी (सीईओ) संवाद साधून चिनी गुंतवणूकदारांना भारतातील बदललेल्या स्थितीचा फायदा घेण्याचे आवाहन केले. एवढेच नाहीतर यावेळी भारत आणि चिनी कंपन्यांदरम्यान २२ अब्ज डॉलरचे २६ करारही झाले. फुदान विद्यापीठातील महात्मा गांधी अध्यासनाचे उद्घाटन करून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. भारतीय समुदायापुढे बोलताना त्यांनी माझ्या हातून देशाचे नुकसान करणारी चूक घडू नये, यासाठी आर्शीवादही मागितले.इंडिया-चायना बिझनेस फोरमच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अलिबाबा ग्रुपचे चेअरमन जॅक मा यांच्यासह चीनमधील २२ अग्रणी कंपन्यांचे सीईओ उपस्थित होते. पारदर्शकता, प्रतिसादात्मकता आणि स्थिर नियमावलीसह भारतातील व्यावसायिकदृष्ट्या वातावरणात बदल होत आहे. याचा चिनी गुंतवणूकदारांनी जरूर फायदा घेऊन ‘मेक इन इंडिया’साठी गुंतवणुकीचे आवाहन केले. तत्पूर्वी, मोदी यांनी चीनमधील २२ अग्रणी कंपन्यांच्या प्रमुखांशी चर्चा केली. यात अलिबाबा ग्रुप, चायना लाईट अँड पॉवर, शियाओमी, हुवेई आणि त्रिना सोलरच्या सीईओंचा समावेश होता. यावेळी भारतातील अदानी समूह आणि भारती एअरटेल लिमेटडने चिनी कंपन्यांसोबत तीन करार केले. यावेळी नवीनीकरण ऊर्जा, विद्युत पायाभूत क्षेत्र, पोलाद आणि लघु-मध्यम उद्योगांसह २२ अब्ज डॉलरचे २६ करार करण्यात आले.च्अथक काम करणे गुन्हा असेल, तर मी हा गुन्हा करीत राहीन, अशा स्पष्ट शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी विदेश दौऱ्यावरून विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. गेल्या वर्षभरातील सरकारच्या कामगिरीचा प्रत्येकाला गर्व वाटत असल्याचे सांगितले. आज जग भारताकडे वेगळ्या नजरेने पाहत आहे, हे सरकारच्या कामगिरीमुळे घडल्याचे सांगत चीनमधील भारतीय समुदायाला भारताच्या विकासात भागीदार होण्याचे आवाहन केले.च्चीनच्या तीन दिवसांच्या दौऱ्याच्या शेवटी त्यांनी शांघाय येथे भारतीय समुदायाला मार्गदर्शन केले. अमेरिकेतील मेडीसन स्क्वेयर येथे आयोजित कार्यक्रमाप्रमाणे शांघाय येथील मोदी यांच्या स्वागत समारंभाला चीनमधील ५ हजारांहून अधिक भारतीय उपस्थित होते.फुदान विद्यापीठात गांधीवादी अध्यासनाचा शुभारंभच्गरिबी दूर करून अवघ्या जगाच्या कल्याणासाठी भारत आणि चीन प्रगतीचे नवीन शिखर गाठू शकतात, असा आशावाद व्यक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत -चीन दरम्यानच्या सहकार्यपूर्ण संबंधाचे महत्त्व अधोरेखित केले.च्फुदान विद्यापीठातील गांधीवादी आणि भारतीय अध्यासनाच्या उद्घाटनानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना भारत-चीनदरम्यानचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध परस्पर हितासोबत मानवता आणि जगाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याचे स्पष्ट केले.