शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तैवान सरकारने मागितली मूळ निवासींची माफी

By admin | Updated: August 2, 2016 04:45 IST

तैवान सरकारने सोमवारी येथील मूळ निवासी असलेल्या १६ जमातींच्या लोकांची जाहीर माफी मागितली.

तैपेई : चीनच्या मुख्य भूमीवरून स्थलांतर करून आलेल्या आणि कालांतराने बहुसंख्य झालेल्या चिनी वंशाच्या शासकांनी गेली ४०० वर्षे केलेल्या घोर अन्यायाबद्दल तैवान सरकारने सोमवारी येथील मूळ निवासी असलेल्या १६ जमातींच्या लोकांची जाहीर माफी मागितली.याच मूळ निवासींच्या वंशाच्या असलेल्या तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी अध्यक्षीय प्रासादात आयोजित केलेल्या एका खास समारंभात या मूळ निवासी जमातींच्या नेत्यांपुढे भावपूर्ण भाषण करून, त्यांना सोसाव्या लागलेल्या अन्याय आणि हालअपेष्टांबद्दल दिलगिरी व्यक्त केली. एवढेच नव्हे तर राष्ट्राध्यक्षांनी सरकारच्या वतीने एक औपचारिक लेखी माफीनामाही सर्वात वयोवृद्ध मूळ निवासी नेत्यापुढे नतमस्तक होत त्याच्याकडे सुपूर्द केला.त्साई या मूळ निवासी वंशाच्या तैवानच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष आहेत. मूळ निवासी आणि स्थलांतरित बहुसंख्य यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी त्यांनी ही पुढाकार घेतला. मूळ निवासींवर झालेल्या अन्यायांची पद्धतशीर नोंद करून त्याचे निराकरण करण्यासाठी सरकारने नेमलेल्या एका विशेष समितीच्याही त्या अध्यक्ष आहेत. समारंभात केलेल्या भाषणात त्साई म्हणाल्या, गेली ४०० वर्षे जो अन्याय व हालअपेष्टा सोसाव्या लागल्या त्याबद्दल सरकारच्या वतीने मी मूळ निवासींची मनापासून माफी मागते. ही माफी हा मूळ निवासींवर झालेला अन्याय दूर करण्याच्या दृष्टीने टाकलेले आणखी एक पाऊल आहे. इतिहासाकडे गांभीर्याने पाहून आपण सत्य समोर आणायला हवे, असेही त्यांनी नमूद केले.मूळ निवासी समुदायांना अधिक स्वायत्तता देण्याचे, त्यांच्या हिरावून घेतलेल्या जमिनी त्यांना परत करणे आणि त्यांच्या भाषा व संस्कृतीचे रक्षण करण्याचे वचनही त्साई यांनी दिले. राष्ट्राध्यक्षांनंतर बोलताना यामी जमातीचे ८० वर्षांचे पुढारी कापेन नगानायेन यांनी सरकारचे आभार मानले व साशंकताही व्यक्त केली. (वृत्तसंस्था)>तैवानच्या एकूण २.३५ कोटी लोकसंख्येत मूळ निवासींची संख्या जेमतेम दोन टक्के आहे.चिनी वंशाच्या स्थलांतरितांच्या लोंढयांमुळे त्यांच्या मूळ भाषा व संस्कृती लयाला गेल्या आहेत.तैवानच्या एकूण क्षेत्रफळापैकी दोन तृतीयांश जमीन मूळ निवासींची असूनही ती हडपून तेथे विकास केला गेला आहे.>मूळ निवासींची जी जमीन मोकळी आहे, ती राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केल्याने तेथे शेती, शिकार व मासेमारी करण्यावरून नेहमी संघर्ष होत असतात.आॅर्किड बेटावरील यामी जमातीच्या जमिनीवर आण्विक कचरा टाकल्याने ती निकामी झाली आहे.नोकरी-धंद्यांमध्ये त्यांचे प्रमाण नगण्य आहे, त्यांच्यात खूप बेरोजगारी आहे व त्यांना दिली जाणारी मजुरी राष्ट्रीय सरासरीहून ४० टक्के कमी आहे.