शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

युनोच्या हवामान परिषदेस पेरूत प्रारंभ

By admin | Updated: December 1, 2014 23:56 IST

संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनो) हवामान परिषदेसाठी सोमवारी भारतासह १९० देशांचे प्रतिनिधी येथे गोळा झाले

लीमा (पेरू) : संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनो) हवामान परिषदेसाठी सोमवारी भारतासह १९० देशांचे प्रतिनिधी येथे गोळा झाले असून जागतिक कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठीच्या नव्या महत्त्वाकांक्षी आणि बंधनकारक करारावर ते वाटाघाटी करणार आहेत. पुढील वर्षी पॅरिसमध्ये स्वीकारण्यात येणाऱ्या या ऐतिहासिक करारावर सर्वसंमती घडवून आणण्याची अखेरची संधी म्हणून या वाटाघाटींकडे पाहिले जाते. कार्बन उत्सर्जन कपातीसाठी गेल्या दोन दशकांपासून वाटाघाटी सुरू आहेत. प्रदूषणांच्या इतर स्रोतांसह कोळसा ज्वलन, तसेच जीवाश्म इंधन वापरण्याच्या घातक परिणामांना आळा घालण्याकरिता युनो आपल्या सदस्य देशांना एकत्रित आणण्याचे अथक प्रयत्न करीत आहे. पेरूच्या राजधानीत १२ दिवस ही परिषद चालणार असून सहभागी प्रतिनिधी २०१५च्या पॅरिस करारासाठी ते कोणते योगदान देणार आहेत याची योजना मांडतील. भारताचे पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर हे भारताच्या १७ सदस्यीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करीत आहेत. हे शिष्टमंडळ लिमात पॅरिसमध्ये होणाऱ्या अंतिम करारातील तरतुदींवर वाटाघाटी करणार आहे. हा करार २०२० मध्ये अमलात आणावयाचा आहे. (वृत्तसंस्था)