शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
4
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
5
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
6
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
7
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
8
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
9
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
10
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
12
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
13
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
14
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
15
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
16
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
17
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
18
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
19
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
20
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले

श्रीलंका 'त्या' पाच मच्छिमारांना सोडणार

By admin | Updated: November 12, 2014 12:42 IST

श्रीलंकेत अंमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील पाचही मच्छिमारांना श्रीलंका सरकारने सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १२ - श्रीलंकेत अंमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील पाचही मच्छिमारांना श्रीलंका सरकारने सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांच्यातील चर्चेनंतर श्रीलंका सरकारने हा निर्णय घेतला असून येत्या दोन - तीन दिवसांमध्ये श्रीलंका बिनशर्त या मच्छिमारांना तुरुंगातून मुक्त करेल असे समजते.
कोलंबो हायकोर्टाने तामिळनाडूतील पाच व श्रीलंकेतील तीन अशा आठ मच्छिमारांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांच्यामध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर श्रीलंकेतील माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री प्रभा गणेशन यांनी श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तांशी चर्चा केल्याचे वृत्त आहे. 'श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या पाचही मच्छिमारांना माफ करण्यास तयार असून लवकरच त्यांची सुटका केली जाईल' असे आश्वासन गणेशन यांनी भारतीय उच्चायुक्तांना दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. 
भारताने श्रीलंकेतील सुप्रीम कोर्टात मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात दाखल केलेली याचिका मागे घ्यावी अन्यथा मच्छिमारांच्या सुटकेसाठी आणखी काही महिन्याचा विलंब होईल अशी सूचनाही गणेशन यांनी उच्चायुक्तांना केली आहे. 
 
काय आहे हे प्रकरण ?
२०११ मध्ये श्रीलंकेतील नौदलाने पाच भारतीय आणि श्रीलंकेतील तीन मच्छिमारांना अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी अटक केली होती. त्यांच्याकडे हिरोईन हे अंमली पदार्थ आढळले होते असा दावा नौदलाने केला होता. कोलंबोतील उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात या आठही जणांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती.  मात्र कोलंबोतील या निर्णयाचे पडसाद थेट तामिळनाडूतील रामेश्वरम येथे दिसले. या मच्छिमारांच्या नातेवाईकांनी या निर्णयाविरोधात जोरदार विरोध प्रदर्शन केले. अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्या मच्छिरांना कायदेशीर मदत उपलब्ध करुन देत त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले. श्रींलकेतील भारतीय दुतावासाने मच्छिमारांच्या सुटकेसाठी तेथील सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली व यासाठी श्रीलंकेतील ख्यातनाम वकिलाची नेमणूकही केली आहे.