शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

श्रीलंका 'त्या' पाच मच्छिमारांना सोडणार

By admin | Updated: November 12, 2014 12:42 IST

श्रीलंकेत अंमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील पाचही मच्छिमारांना श्रीलंका सरकारने सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १२ - श्रीलंकेत अंमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील पाचही मच्छिमारांना श्रीलंका सरकारने सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांच्यातील चर्चेनंतर श्रीलंका सरकारने हा निर्णय घेतला असून येत्या दोन - तीन दिवसांमध्ये श्रीलंका बिनशर्त या मच्छिमारांना तुरुंगातून मुक्त करेल असे समजते.
कोलंबो हायकोर्टाने तामिळनाडूतील पाच व श्रीलंकेतील तीन अशा आठ मच्छिमारांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांच्यामध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर श्रीलंकेतील माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री प्रभा गणेशन यांनी श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तांशी चर्चा केल्याचे वृत्त आहे. 'श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या पाचही मच्छिमारांना माफ करण्यास तयार असून लवकरच त्यांची सुटका केली जाईल' असे आश्वासन गणेशन यांनी भारतीय उच्चायुक्तांना दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. 
भारताने श्रीलंकेतील सुप्रीम कोर्टात मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात दाखल केलेली याचिका मागे घ्यावी अन्यथा मच्छिमारांच्या सुटकेसाठी आणखी काही महिन्याचा विलंब होईल अशी सूचनाही गणेशन यांनी उच्चायुक्तांना केली आहे. 
 
काय आहे हे प्रकरण ?
२०११ मध्ये श्रीलंकेतील नौदलाने पाच भारतीय आणि श्रीलंकेतील तीन मच्छिमारांना अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी अटक केली होती. त्यांच्याकडे हिरोईन हे अंमली पदार्थ आढळले होते असा दावा नौदलाने केला होता. कोलंबोतील उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात या आठही जणांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती.  मात्र कोलंबोतील या निर्णयाचे पडसाद थेट तामिळनाडूतील रामेश्वरम येथे दिसले. या मच्छिमारांच्या नातेवाईकांनी या निर्णयाविरोधात जोरदार विरोध प्रदर्शन केले. अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्या मच्छिरांना कायदेशीर मदत उपलब्ध करुन देत त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले. श्रींलकेतील भारतीय दुतावासाने मच्छिमारांच्या सुटकेसाठी तेथील सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली व यासाठी श्रीलंकेतील ख्यातनाम वकिलाची नेमणूकही केली आहे.