शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या कथित वंशजांनी सांगितला अर्ध्या मुझफ्फरनगरवर दावा

By admin | Updated: July 17, 2015 13:58 IST

सुमारे ६७४ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांच्या वंशजांनी मालकी सांगितली असून या मालमत्तेमध्ये रेल्वे स्टेशन

ऑनलाइन लोकमत
मीरत (उत्तर प्रदेश), दि. १७ - मुझफ्फरनगर या शहरामधील सुमारे ६७४ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांच्या वंशजांनी मालकी सांगितली असून या मालमत्तेमध्ये रेल्वे स्टेशन, न्यायाधीशांचे निवासस्थान, शाळा यासह अनेक महत्त्वाच्या सरकारी वास्तू आहेत. फाळणीनंतर लियाकत अली खान पाकिस्तानला निघून गेले परंतु त्यांची इथे अफाट संपत्ती होती आणि ती आम्हाला मिळायला हवी असा दावा त्यांचे वंशज म्हणवणा-या जमशेद अली, खुर्शीद अली, मुमताझ बेगम आणि इम्तियाझ बेगम अशा चौघांनी आम्ही लियाकत अलींचे वंशज असून त्यांची मालमत्ता आम्हाला मिळावी अशी मागणी महसूल विभागाकडे केली. ही मालमत्ता त्यांना दिली तर जवळपास अर्ध्या मुझफ्फरनगरवर पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांच्या कथित वंशजांचा ताबा निर्माण होईल.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने या संदर्भातले सगळे दस्तावेज काढत या चौघांचा दावा फेटाळला आहे. तसेच हा सगळा प्रकार म्हणजे एक फसवणूक असल्याचा शेरा जिल्हा प्रशासनाने मारला आणि याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. या कथित वंशजांच्या सांगण्यानुसार लियाकत अली पाकिस्तानला गेल्यानंतर त्यांची मालमत्ता त्यांच्या चुलत भावाकडे उमर दराझ अलीकडे हस्तांतरीत झाली आणि हे चार जण त्यांचेच वंशज आहेत. संबंधित मालमत्तेवर सरकारी इमारती असून ही जागा सरकारच्याच मालकिची असल्याचे मुझफ्फरनगरचे जिल्हा न्यायाधीश निखिल शुक्ला यांनी स्पष्ट केले आहे. या मालमत्तेच्या कथित हस्तांतरणाबाबतचे कुठलेही पुरावे व कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे शुक्ला यांनी म्हटले आहे. तर या कथित वंशजांच्या सांगण्यानुसार या संदर्भातले सगळे पुरावे त्यांच्याकडे आहेत.
विशेष म्हणजे फाळणीनंतर भारतातून पाकिस्तानला गेलेल्यांची मालमत्ता सरकारजमा होणे यासंदर्भात संदिग्धता असून १९६५ च्या भारत पाक युद्धानंतर प्रथमच एनिमी प्रॉपर्टी अॅक्ट अमलात आला. त्यानुसार अशा स्थलांतरीतांची मालमत्ता सरकारजमा करण्यात आली. जुलै २०१० मध्ये अशी सरकारच्या ताब्यातील मालमत्ता सरकारला विकता येणार नाही असा अध्यादेशही काढण्यात आला, परंतु दुर्दैवाने या अध्यादेशाचे विधेयकात रुपांतर झाले नाही आणि सहा महिन्यांच्या मुदतीनंतर अध्यादेश संपुष्टात आला. या संदर्भातली काही प्रकरणे न्यायप्रविष्ट असली तरी तज्ज्ञांच्या मते शत्रूराष्ट्रात गेलेल्यांच्या मालमत्तेचे काय करायचे हा अधिकार सर्वस्वी सरकारचा आहे. त्यामुळे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अलींच्या कथित वंशजांच्या दाव्याचे काय होते आणि न्यायालय आणि सरकार काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.