शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

भारतामध्ये ‘शून्या’चा वापर तिस-या शतकापासून, नवे संशोधन, हस्तलिखित अपेक्षेहून अधिक प्राचीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 13:18 IST

अंकगणिताला पूर्णत्व देणारे ‘शून्य’ ही भारताने दिलेली देणगी आहे. भारतात ‘शून्या’चा वापर मानले गेले त्याहून सुमारे पाचशे वर्षे आधी म्हणजे तिस-या किंवा चौथ्या इसवी शतकात झाला असावा, असे संशोधनावरून स्पष्ट झाले आहे.

लंडन: अंकगणिताला पूर्णत्व देणारे ‘शून्य’ ही भारताने दिलेली देणगी आहे. भारतात ‘शून्या’चा वापर मानले गेले त्याहून सुमारे पाचशे वर्षे आधी म्हणजे तिस-या किंवा चौथ्या इसवी शतकात झाला असावा, असे संशोधनावरून स्पष्ट झाले आहे.सत्तर भूर्जपत्रांवर लिहिलेले ‘भाखशाली हस्तलिखित’ हा ‘शून्या’चा वापर दर्शविणारा सर्वात प्राचीन पुरावा मानला जातो. पेशावरजवळच्या भाखशाली गावातील शेतात खोदमाक करताना सन १८८१ मध्ये हे हस्तलिखित मिळाले म्हणून ते ‘भाखशाली हस्तलिखित’ म्हणून ओळखले जाते. आॅक्सफर्ड विद्यापीठाच्या बॉडलेनियन ग्रंथालयात ते जतन करून ठेवले गेले आहे.गणित या विषयावर लिहिलेल्या या हस्तलिखितात शेकडो ठिकाणी ‘शून्या’चा वापर केलेला आहे. हे हस्तलिखित भारतामध्ये सापडलेले ‘शून्या’संबंधीचे सर्वात प्राचीन हस्तलिखित आहे. ते कोणत्या काळातील आहे, हा वर्षांपासूनचा संशोधनाचा विषय आहे. लिखाणाची शैली आणि त्यातील गणितविषयक आशय यांचा अभ्यास करून हयाशी तकाओ या जपानी विद्वानाने या हस्तलिखिताचा काळ आठव्या आणि १२ व्या शतकादरम्यानचा असावा, असा अंदाज वर्तविला होता.बॉडलेनियन ग्रंथालयाने गुरुवारी असे जाहीर केले की, त्यांनी ‘भाखशाली हस्तलिखिता’चा काळ निश्चित करण्यासाठी ‘रेडिओ कार्बन डेटिंग’ या खात्रीशीर तंत्राचा प्रथमच वापर केला व त्यावरून हे हस्तलिखित आधी मानले गेले त्याहून किमान ५०० वर्षे जुने आसावे असे त्यातून निष्पन्न झाले. म्हणजेच त्याचा काळ इ.स. तिसºया ते चौथ्या शतकातील येतो. हे हस्तलिखित एकाच वेळी नव्हे तर निरनिराळ््या काळात केलेल्या लिखाणाचे संकलन असावे.प्राचीन भारतीय विव्दानांनी ‘शून्या’चा एक स्वतंत्र अंक म्हणून सर्वप्रथम वापर सुरु केला व शून्याला त्याच्या स्थानानुसार निरनिराळे मूल्य दिले गेल्याने अंकगणित व आधुनिक काळात डिजिटल व्यवहार सुलभ झाले हे सर्वमान्य आहे. प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये शून्य ‘टिंबा’च्या स्वरूपात किंवा पोकळ वर्तुळाकार लिहिलेले आढळते. ग्वाल्हेर येथील एका मंदिरावरील कोरीवकामात वापरलेले ‘टिंब’रूपी शून्य ही आजवरची शून्याची सर्वातप्राचीन नोंद मानली जात होती. नव्या संशोधनानुसार ‘भाखशाली हस्तलिखित’ हे आता त्याहूनही प्राचीन ठरले आहे.हस्तलिखिताची वैशिष्ट्येएक स्थानांक म्हणून शून्याचा वापर मायन आणि बॅबिलियॉन यासारख्या प्राचीन संस्कतीमध्येही केला गेल्याचे पुरावे आहेत. परंतु ‘भाखशाली हस्तलिखित’ दोन बाबतीत वैशिष्ठ्यपूर्ण आहे. आज आपण सर्रासपणे जसे पोकळ वर्तुळाकार शून्य लिहितो तशा शून्याचे लेखन यात सर्वप्रथम झाल्याचे दिसते.दुसरे म्हणजे शून्याचा स्वतंत्र अंक म्हणून वापर करणे व शून्याचा उपयोग करून शतपटीने वा हजारपटीने मोठ्या संख्यांचे सहजी लिखाण करणे भारतीयांनी सर्वप्रथम सुरु केले हे यावरून सिद्ध होते.प्राचीन भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणिती ब्रह्मगुप्त याने सन ६२८ मध्ये लिहिलेल्या ‘ब्रह्मस्फुटसिद्धांत’ या ग्रंथात अशा वर्तुळाकार शून्याचा वापर केल्याचे दिसते.70 भूर्जपत्रांवर लिहिलेले ‘भाखशाली हस्तलिखित’ हा ‘शून्या’चा वापर दर्शविणारा सर्वात प्राचीन पुरावा मानला जातो.आधुनिक जगाचा पाया ज्या ‘शून्या’वर रचला गेला त्याच्या संकल्पनेचे बिज भारतीय गणितींनी तिसºया शतकातच रोवले होते, असे आपण आज म्हणू शकतो. भारतीय गणिती पांडित्याच हा पुरावा आहे. - मार्कस द््यू सॉतॉय, गणित प्राध्यापक, आॅक्सफर्ड विद्यापीठलंडनमध्ये ४ आॅक्टोबर पासून सुरु होणाºया ‘इल्युमिनेटिंग इंडिया: ५००० इयर्स आॅफ सायन्स’ या प्रदर्शनात हे हस्तलिखित प्रदर्शितकेले जाणार आहे.

टॅग्स :Indiaभारत