शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

दहशतवादाच्या समर्थकांना वेगळे पाडा

By admin | Updated: August 5, 2016 04:18 IST

दहशतवादी गटांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे उदात्तीकरण थांबवा

इस्लामाबाद : दहशतवादी गटांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे उदात्तीकरण थांबवा, अशा स्पष्ट शब्दांत भारताने गुरुवारी पाकिस्तानला समज देताना दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांवर कठोर कारवाई करून त्यांना वेगळे पाडले पाहिजे, असे आवाहन केले. भारत- पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर काहीही हातचे न राखता गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दहशतवादाचा केवळ निषेध पुरेसा नाही. चांगला आणि वाईट दहशतवाद असा काही नसतो, असे स्पष्ट केले. राजनाथ सिंह यांनी येथे भरलेल्या सातव्या सार्क देशांच्या अंतर्गत मंत्र्यांच्या परिषदेत दहशतवाद हा या विभागाला सतत फार मोठे आव्हान असल्याचे सांगितले.हिंदी भाषेत केलेल्या भाषणात राजनाथ सिंह म्हणाले की,‘‘केवळ दहशतवादी किंवा दहशतवाद्यांच्या संघटना यांच्याविरुद्धच कठोर कारवाई व्हायला हवी असे नाही तर दहशतवादाला ज्या व्यक्ती, संघटना आणि देश पाठिंबा देतात त्यांच्यावरही ती झाली पाहिजे.’’ कोणत्याही देशाकडून दहशतवादाचे उदात्तीकरण करणे आणि त्याला आश्रय दिला जाणार नाही याची खात्री असली पाहिजे, अशा शब्दांत सिंह यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे कान टोचले. काश्मीरमध्ये ८ जुलै रोजी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हान वनी मारला गेला त्याचे वर्णन शरीफ यांनी ‘हुतात्मा’ या शब्दांत केले होते. एका देशाचा दहशतवादी हा दुसऱ्या देशाचा हुतात्मा किंवा स्वातंत्र्यसैनिक असू शकत नाही. मी संपूर्ण मानवजातीसाठी म्हणतो की दहशतवाद्यांना हुतात्मा म्हणू नका. जे दहशतवाद्यांना पाठिंबा देतात त्यांना वेगळे पाडा, असेही राजनाथ सिंह म्हणाले. (वृत्तसंस्था)>हस्तांदोलनही नाहीराजनाथसिंह आणि पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री चौधरी निसार अली खान यांची समोरासमोर भेट झाली तेव्हाही तणावाचे संबंध लपून राहिले नव्हते. राजनाथ सिंह यांनी सभागृहात जायच्या आधी खान यांच्या हाताला केवळ स्पर्श केला. ते हस्तांदोलन अजिबात नव्हते. भारतीय माध्यमांच्या प्रतिनिधींना हा क्षण वा परिषदेचे वार्तांकन करू देण्यास पाक अधिकाऱ्यांनी बंदी घातली. बैठकीनंतर खान यांनी भोजन आयोजित केले होते परंतु ते स्वत:च तेथून निघून गेले व राजनाथ सिंह यांनीही हे भोजन टाळले.काश्मीरमध्ये उघड दहशतवादकाश्मीरमध्ये जो हिंसाचार सुरू आहे तो म्हणजे ‘उघड दहशतवाद’ असल्याची टीका पाकचे अंतर्गत सुरक्षामंत्री चौधरी निसार अली खान यांनी या परिषदेत केली. या रितीने पाकिस्तानने सार्क परिषदेत काश्मीरचा प्रश्न उपस्थित केलाच. काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलांकडून होत असलेला बळाचा वापर हा खान यांनी दहशतवाद असल्याचे सांगितले. स्वातंत्र्यासाठी लढणे आणि दहशतवाद यात फरक असल्याचेही ते म्हणाले. राजनाथ सिंह यांनी भाषणात पाकिस्तानला जोरदारपणे फटकारल्यानंतर खान यांनी आपले लिखित भाषणातील मुद्दे बाजूस सारून त्यांना रोखठोक प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केला.