शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

दहशतवादाच्या समर्थकांना वेगळे पाडा

By admin | Updated: August 5, 2016 04:18 IST

दहशतवादी गटांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे उदात्तीकरण थांबवा

इस्लामाबाद : दहशतवादी गटांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे उदात्तीकरण थांबवा, अशा स्पष्ट शब्दांत भारताने गुरुवारी पाकिस्तानला समज देताना दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांवर कठोर कारवाई करून त्यांना वेगळे पाडले पाहिजे, असे आवाहन केले. भारत- पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर काहीही हातचे न राखता गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दहशतवादाचा केवळ निषेध पुरेसा नाही. चांगला आणि वाईट दहशतवाद असा काही नसतो, असे स्पष्ट केले. राजनाथ सिंह यांनी येथे भरलेल्या सातव्या सार्क देशांच्या अंतर्गत मंत्र्यांच्या परिषदेत दहशतवाद हा या विभागाला सतत फार मोठे आव्हान असल्याचे सांगितले.हिंदी भाषेत केलेल्या भाषणात राजनाथ सिंह म्हणाले की,‘‘केवळ दहशतवादी किंवा दहशतवाद्यांच्या संघटना यांच्याविरुद्धच कठोर कारवाई व्हायला हवी असे नाही तर दहशतवादाला ज्या व्यक्ती, संघटना आणि देश पाठिंबा देतात त्यांच्यावरही ती झाली पाहिजे.’’ कोणत्याही देशाकडून दहशतवादाचे उदात्तीकरण करणे आणि त्याला आश्रय दिला जाणार नाही याची खात्री असली पाहिजे, अशा शब्दांत सिंह यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे कान टोचले. काश्मीरमध्ये ८ जुलै रोजी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हान वनी मारला गेला त्याचे वर्णन शरीफ यांनी ‘हुतात्मा’ या शब्दांत केले होते. एका देशाचा दहशतवादी हा दुसऱ्या देशाचा हुतात्मा किंवा स्वातंत्र्यसैनिक असू शकत नाही. मी संपूर्ण मानवजातीसाठी म्हणतो की दहशतवाद्यांना हुतात्मा म्हणू नका. जे दहशतवाद्यांना पाठिंबा देतात त्यांना वेगळे पाडा, असेही राजनाथ सिंह म्हणाले. (वृत्तसंस्था)>हस्तांदोलनही नाहीराजनाथसिंह आणि पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री चौधरी निसार अली खान यांची समोरासमोर भेट झाली तेव्हाही तणावाचे संबंध लपून राहिले नव्हते. राजनाथ सिंह यांनी सभागृहात जायच्या आधी खान यांच्या हाताला केवळ स्पर्श केला. ते हस्तांदोलन अजिबात नव्हते. भारतीय माध्यमांच्या प्रतिनिधींना हा क्षण वा परिषदेचे वार्तांकन करू देण्यास पाक अधिकाऱ्यांनी बंदी घातली. बैठकीनंतर खान यांनी भोजन आयोजित केले होते परंतु ते स्वत:च तेथून निघून गेले व राजनाथ सिंह यांनीही हे भोजन टाळले.काश्मीरमध्ये उघड दहशतवादकाश्मीरमध्ये जो हिंसाचार सुरू आहे तो म्हणजे ‘उघड दहशतवाद’ असल्याची टीका पाकचे अंतर्गत सुरक्षामंत्री चौधरी निसार अली खान यांनी या परिषदेत केली. या रितीने पाकिस्तानने सार्क परिषदेत काश्मीरचा प्रश्न उपस्थित केलाच. काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलांकडून होत असलेला बळाचा वापर हा खान यांनी दहशतवाद असल्याचे सांगितले. स्वातंत्र्यासाठी लढणे आणि दहशतवाद यात फरक असल्याचेही ते म्हणाले. राजनाथ सिंह यांनी भाषणात पाकिस्तानला जोरदारपणे फटकारल्यानंतर खान यांनी आपले लिखित भाषणातील मुद्दे बाजूस सारून त्यांना रोखठोक प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केला.