शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

जिवावर उठलेला "सेल्फी"

By admin | Updated: June 30, 2017 15:19 IST

सेल्फी काढल्यावर लगेचच सोशल मीडियावर अपलोड करणे. त्यानंतर त्याला मिळणारे लाईक्स आणि कमेंट्स याची तर चटकच लागली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - सेल्फी म्हणजे आता प्रत्येकाच्या आयुष्याचा दैनंदिन भाग बनला आहे. आता सेल्फी काढणं चांगलं की वाईट याबद्दल कुणी ठाम असं सांगू शकत नाही. पण ही सेल्फी धोकादायक ठरु शकते एवढं मात्र नक्की. सेल्फी किती जीवघेणी आहे हे सांगण्यासाठी कोणा तज्ञाची, ज्योतिषाची गरज नाही. गुगलवर नुसतं सर्च जरी केलंत तरी सेल्फीमुळे किती जणांना आपला जीव गमवावा लागला याची माहिती तुम्हाला मिळेल. मुंबईत गुरुवारी मरिन ड्राईव्हवर आपल्या मित्रांसोबत गेलेल्या तरुणीचा सेल्फी काढण्याच्या नादात समुद्रात बुडून मृत्यू झाला, आणि पुन्हा एकदा जीवघेण्यास सेल्फीचा मुद्दा चर्चेत आला. 
 
प्रीती पिसे (17) नावाची तरुणी आपल्या मित्रांसोबत तारापोरवाला मत्स्यालयासमोर समुद्राच्या कडेला बसला होती. यावेळी सेल्फी काढत असतान जोरात आलेली लाट तिला ओढून आत घेऊन गेली. तिच्या मित्राने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. तोपर्यत प्रीतीचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी तिचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेमुळे सेल्फी काढणं खरचं इतकं गरजेचं आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सेल्फी काढताना आपल्या जीवाची काळजी न घेणं किती धोकादायक असू शकतं हे अशा घटनांमधून सिद्ध होत असतानाही लोक मात्र जागृत होताना दिसत नाहीत. 
 
सेल्फी काढल्यावर त्याला लगेचच सोशल मीडियावर अपलोड करणे. त्यानंतर त्याला मिळणारे लाईक्स आणि कमेंट्स याची तर चटकच लागली आहे. सेल्फीच्या या शर्यतीत अनेकांनी आपला जीव गमावला आहे. जगभरातील अशाच काही खतरनाक 15 सेल्फी आपण पाहूयात....या सेल्फींमध्ये काहीजण एका उंच इमारतीवर, तर काहीजण जंगली प्राण्यासमोर उभे आहेत. काढलेला प्रत्येक सेल्फी धोकादायक आहे हे पाहिल्यावर कळेल.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
सेल्फीमुळे सर्वात जास्त मृत्यू भारतात -
सेल्फी काढण्याच्या नादात होणा-या मृत्यूमुळे भारत पहिल्या क्रमांकावर आहे. 2016 पर्यंतच्या आकडेवारीनुसार दोन वर्षात जगभरात एकूण 127 जणांनी आपला जीव गमावला होता. यामधील 76 मृत्यू भारतातील होते. अनेकांचा मृत्यू सेल्फी काढत असताना ट्रेनने धडक दिल्याने तसंच उंचावरुन खाली पडून झाला होता
 
जनजागृतीसाठी सॅमसंगने गडकरींच्या मदतीने घेतला पुढाकार 
सेल्फीमुळे होणारे अपघात, मृत्यू रोखण्यासाठी सॅमसंगने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाशी हातमिळवणी केली आहे. मोबाईलचा गैरवापर रोखावा हा यामगचा मुख्य उद्देश आहे. "सेफ इंडिया" नावाने त्यांनी कॅम्पेन सुरु केलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही व्हिडीओच्या माध्यमातून लोकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं.