शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणे, शांती प्रक्रियेत भारताचे सहकार्य नाही

By admin | Updated: August 30, 2015 00:37 IST

भारत आणि पाकिस्तानमध्ये मैत्रीपूर्ण संबंध राहण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत; पण भारताचे सहकार्य मिळत नाही, असा अजब दावा पाकिस्तानचे गृहमंत्री निसार

इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तानमध्ये मैत्रीपूर्ण संबंध राहण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत; पण भारताचे सहकार्य मिळत नाही, असा अजब दावा पाकिस्तानचे गृहमंत्री निसार अली खान यांनी केला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय चर्चा रद्द झाल्यामुळे उभय देशांतील संबंधात दरी निर्माण झालेली असतानाच पाकिस्तानचे गृहमंत्री निसार अली खान यांनी हे वक्तव्य केले आहे, हे विशेष. ते म्हणाले की, काश्मीरमधील नेत्यांसोबत आमच्या संभाव्य चर्चेबाबत भारत सरकारने घेतलेला आक्षेप योग्य नव्हता. तथापि, दोन्ही देशांतील चर्चेदरम्यान काश्मीरच्या मुद्यावर आक्षेप नोंदवत भारताने एक प्रकारे सुरक्षा आणि स्थिरताच अडचणीत आणल्याचा अजब दावाही निसार अली खान यांनी केला आहे.दरम्यान, पाकिस्तानचे गृहमंत्री निसार अली खान यांनी काल ब्रिटनचे विदेश सचिव फिलिप हेमंड यांची लंडनमध्ये भेट घेतली. सद्य परिस्थितीची त्यांना माहिती दिल्याचे सांगून निसार अली खान म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी काश्मीर मुद्दा हा महत्त्वाचा आहे. तथापि, हाच मुद्दा अडथळाही ठरत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने उभयदेशांना चर्चेद्वारे समस्या सोडविण्याचे आवाहन केले आहे. (वृत्तसंस्था)