शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

भारत आणि म्यानमारमधील संबंध नव्या टप्प्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 08:04 IST

भारत आणि म्यानमार या शेजारी देशांचे संबंध गेली अनेक शतके अस्तित्वात आहेत. राजकीय तसेच व्यापारी आणि सांस्कृतिक आदानप्रदान या देशांमध्ये नेहमीच होत राहिले. या दोन्ही देशांचे संबंध 1993 पासून वेगाने वाढत गेले.

मुंबई, दि.5- भारत आणि म्यानमार या शेजारी देशांचे संबंध गेली अनेक शतके अस्तित्वात आहेत. राजकीय तसेच व्यापारी आणि सांस्कृतिक आदानप्रदान या देशांमध्ये नेहमीच होत राहिले. या दोन्ही देशांचे संबंध 1993 पासून वेगाने वाढत गेले. तत्कालिन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव आणि त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी म्यानमारशी संबंध वृद्धिंगत व सुरळीत करण्याचा नेहमीच प्रयत्न केला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या म्यानमार दौऱ्यावर आहेत. आशियातील या दोन देशांचे संबंध नवे पाऊल टाकत आहेत.

भारतामध्ये उगम पावलेला बौद्ध धर्म आशियातील विविध देशांमध्ये पसरत गेला. म्यानमारमध्ये आज 90 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या बौद्धधर्मिय आहेत.  म्यानमारमध्ये भारतीय वंशाचे आणि हिंदू लोकही राहतात. ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीच्या व्यवसायामुळे म्यानमारमध्ये भारतीय लोक नोकरीसाठी स्थायिक झाले होते.1937 पर्यंत म्यानमार म्हणजे तेव्हाचा ब्रह्मदेश ब्रिटिश भारताचा हिस्सा होता. 1948 साली म्यानमार स्वतंत्र झाल्यानंतर भारताने म्यानमारशी मुत्सद्दी पातळीवरचे संबंध प्रस्थापित केले. मात्र लष्करशाहीमुळे दोन्ही देशांचे संबंध एका मर्यादेच्यापुढे जाऊ शकले नाहीत. 1987 साली पंतप्रधान राजीव गांधी यांनी म्यानमारला भेट दिली होती. त्यानंतर दोन्ही देशांच्या संबंधाना वेग आणला तो पी. व्ही. नरसिंहराव यांनी. 

2000 सालच्या आकडेवारीनुसार म्यानमार भारताला 22 कोटी डॉलर्स इतक्या रकमेच्या उत्पादनांची निर्यात करत होता तर भारताकडून 7.5 कोटी डॉलर्स इतक्या रकमेच्या वस्तूंची आयात करत होता. थायलंड, चीन, सिंगापूरनंतर भारत हा म्यानमारसाठी चौथ्या क्रमांकावरचा महत्त्वाचा व्यापार भागीदार आहे. भारताने म्यानमार- थायलंड असा रस्तामार्ग तयार करण्यासाठी हात पुढे केला आहे. तसेच कलादान मल्टिनोडल ट्रान्सपोर्ट प्रकल्पासही सुरुवात झाली आहे. यामध्ये कोलकाता आणि सित्वे ही बंदरे जलमार्गाने जोडली जातील व तेथून लॅशिओ हे मिझोरममधील गाव रस्तेमार्गाने जोडले जाईल. दोन्ही देशांना व्यापारासाठी याचा मोठा उपयोग होईल. 2015 साली म्यानमारमध्ये प्रदीर्घकाळ सुरु असलेल्या लष्करशाहीच्या जागी लोकशाही सरकार सत्तेत आले. त्यामुळे म्यानमारमध्ये स्थिरता येईल अशी भारताची अपेक्षा आहे. तसेच रोहिंग्या स्थलांतरितांचा म्यानमारबाहेर पडणारा लोंढा थांबवून तेथे चाललेले तणावाचे प्रसंग हे सरकार संपुष्टात आणेल अशीही भारताची अपेक्षा आहे. कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे भारतात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या रोहिंग्यांच्या प्रश्नावर विचार सुरु होईल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी