शहरं
Join us  
Trending Stories
1
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
2
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
3
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
4
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
5
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
6
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
7
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
8
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
9
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
10
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
11
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
12
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
13
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
14
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
15
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
16
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
17
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
18
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
19
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
20
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा

पावसाच्या पाण्याने होईल भारतीयांची बचत

By admin | Updated: June 26, 2015 23:41 IST

पावसाचे पाणी भारतीय नागरिकांसाठी एक वरदान आहे. हे पाणी वाचवून भाज्यांच्या रोपांना घातल्यास विजेचे बिल कमी होते, कॅलरीजयुक्त आहार मिळतो,

वॉशिंग्टन : पावसाचे पाणी भारतीय नागरिकांसाठी एक वरदान आहे. हे पाणी वाचवून भाज्यांच्या रोपांना घातल्यास विजेचे बिल कमी होते, कॅलरीजयुक्त आहार मिळतो, एवढेच नाही तर पाऊस भारतीयांसाठी उत्पन्नाचे एक स्रोत बनू शकतो, असा नव्या अभ्यासाचा निष्कर्ष आहे. नासाच्या पर्जन्यविषयक अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. नासाची पर्जन्यविषयक मापन मोहीम व जपानच्या अंतराळ संस्थेच्या वतीने हा अभ्यास करण्यात आला असून, अर्बन वॉटर जर्नलमध्ये तो प्रसिद्ध झाला आहे. १९९७ ते २०१५ यादरम्यान विविध प्रदेश व उपप्रदेशात झालेल्या पावसाच्या पाहणीवर हे निष्कर्ष काढण्यात आले. भारतात सर्व नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणे ही कठीण बाब आहे. हे पाणी छोट्या टाकीत साठवून ठेवल्यास पिण्यासाठी चांगले पाणी मिळू शकते, असे या संशोधनाचे प्रमुख डॅन स्टाऊट यांनी म्हटले आहे. डॅन स्टाऊट हे उटाह विद्यापीठातील सिव्हिल इंजिनिअरिंग खात्याचे सहायक संशोधक असून त्यांच्यासह तीन संशोधकांनी हे संशोधन केले आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंग ही कल्पना नवी नाही; पण अजूनही भारतात तिचा फारसा उपयोग होत नाही. पावसाचे पाणी साठवणे वा रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे हा भारताच्या पाणी समस्येवरील मोठा उपाय आहे. भारतात जमिनीखालील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी पावसाचे पाणी साठवले जाते. त्यामुळे तात्काळ वापरासाठी हे पाणी उपलब्ध होत नाही. याऐवजी भारतीय नागरिकांनी २०० गॅलनच्या टाकीत पावसाचे पाणी साठवले, तर ते त्यांना सहज वापरता येईल. दाट लोकसंख्या असणाऱ्या शहरी भागातही हा प्रयोग यशस्वी होईल. भारतातील वाढत्या शहरांना या पद्धतीने पाणी पुरवणे सहज शक्य होईल. स्टाऊट यांच्या म्हणण्यानुसार भारताच्या बहुतांश भागात पावसाचे पाणी साठविले जात नाही. जिथे ते साठवले जाते, तिथे कड्या कुलुपे लावून बंद ठेवण्यात येते. देशाच्या काही भागात सरासरी पाणी साठवले जाते; पण तेवढे पुरेसे नाही. (वृत्तसंस्था)