शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
3
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
4
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
5
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
6
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
7
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
8
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
9
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
10
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
11
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
12
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
13
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
14
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
15
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
16
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
17
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
18
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
19
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
20
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण

कतार निर्बंधांस विमान संघटनेचा विरोध

By admin | Updated: June 7, 2017 00:10 IST

कतारवर लादलेल्या हवाई वाहतूक निर्बंधांना जागतिक विमान वाहतूक कंपन्यांच्या संघटनेने विरोध केला आहे

कॅनकन : पश्चिम आशियातील काही देशांनी कतारवर लादलेल्या हवाई वाहतूक निर्बंधांना जागतिक विमान वाहतूक कंपन्यांच्या संघटनेने विरोध केला आहे. आम्ही निर्बंधांच्या विरोधात असून कतारसोबतचे हवाई संबंध शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यात यावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे. या निर्बंधामुळे भारतातील दिल्ली वगळता अन्य शहरातून दोहा येथील विमानप्रवास महाग आणि अधिक अंतराचा होणार आहे. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक महासंघाचे (आएटा) सीईओ आणि महासंचालक अ‍ॅलेक्झांडर डे जुनियाक यांनी ही माहिती दिली. सौदी अरेबिया, इजिप्त, संयुक्त अरब आमिरात आणि बहारिन या देशांनी कतारसोबतचे राजनैतिक संबंध तोडले आहेत. त्यासोबतच कतारसोबतची हवाई वाहतूकही बंद करण्यात आली आहे. कतार एअरलाइन्स, एअर इंडिया आणि दोन भारतीय खासगी कंपन्यांची कतार येथे विमानसेवा आहे. निर्बंधांमुळे या कंपन्यांना सौदी अरेबिया व अन्य देशांची हवाई हद्द वापरता येणार नाही. त्यांना लांबचा प्रवास करावा लागेल. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढेल आणि भाडेही वाढेल, असे दिसते.कतारमध्ये साडेसहा लाख भारतीय आहेत. ते तिथे रोजगारासाठी गेले असून, ते नियमितपणे भारतात येत असतात. त्यांनाही या निर्बंधांचा फटका बसेल. तसेच युरोपमध्ये कतारमार्गे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फारच घटेल. अन्य मार्गाने युरोपला जाण्यासाठी ते अर्थातच कतार एअरलाइन्स वगळता अन्य कंपन्यांची तिकिटे काढतील आणि त्याचा आर्थिक फटका कतार एअरलाइन्सला बसेल.जुनाईक यांनी सांगितले की, भारतासह आशिया प्रशांत क्षेत्रातील हवाई वाहतूक गेल्या काही आठवड्यांत स्थिर होती. त्यातच २१ मार्च रोजी अमेरिकेने पश्चित आशिया आणि उत्त्तर अमेरिकेतील देशांना जाणाऱ्या विमानांत वैयक्तिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्यास बंदी घातली होती.>भारतीयांना फटकापश्चिम आशियाई देशांनी कतारवर घातलेल्या हवाई बंदीमुळे विमान प्रवास महागणार आहे. भारतीयांना त्याचा मोठा फटका बसेल. सौदी अरेबिया, इजिप्त, संयुक्त अरब आमिरात आणि बहारिन या देशांची अमेरिका अथवा युरोपला जाणारी विमाने आतापर्यंत दोहा मार्गेच जात होती. तसेच काही विमाने कतारवरून उड्डाण करत होती. दिल्लीहून जाणारी विमाने प्रामुख्याने हा मार्ग स्वीकारीत असत. हा जवळचा मार्ग आहे. आता त्यांना इराणमार्गे जावे लागेल. त्यामुळे आता तिकिटांचा खर्च वाढणार आहे. आधीच परदेशात गेलेल्या भारतीयांना त्याचा फटका बसेल.