शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कतार निर्बंधांस विमान संघटनेचा विरोध

By admin | Updated: June 7, 2017 00:10 IST

कतारवर लादलेल्या हवाई वाहतूक निर्बंधांना जागतिक विमान वाहतूक कंपन्यांच्या संघटनेने विरोध केला आहे

कॅनकन : पश्चिम आशियातील काही देशांनी कतारवर लादलेल्या हवाई वाहतूक निर्बंधांना जागतिक विमान वाहतूक कंपन्यांच्या संघटनेने विरोध केला आहे. आम्ही निर्बंधांच्या विरोधात असून कतारसोबतचे हवाई संबंध शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यात यावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे. या निर्बंधामुळे भारतातील दिल्ली वगळता अन्य शहरातून दोहा येथील विमानप्रवास महाग आणि अधिक अंतराचा होणार आहे. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक महासंघाचे (आएटा) सीईओ आणि महासंचालक अ‍ॅलेक्झांडर डे जुनियाक यांनी ही माहिती दिली. सौदी अरेबिया, इजिप्त, संयुक्त अरब आमिरात आणि बहारिन या देशांनी कतारसोबतचे राजनैतिक संबंध तोडले आहेत. त्यासोबतच कतारसोबतची हवाई वाहतूकही बंद करण्यात आली आहे. कतार एअरलाइन्स, एअर इंडिया आणि दोन भारतीय खासगी कंपन्यांची कतार येथे विमानसेवा आहे. निर्बंधांमुळे या कंपन्यांना सौदी अरेबिया व अन्य देशांची हवाई हद्द वापरता येणार नाही. त्यांना लांबचा प्रवास करावा लागेल. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढेल आणि भाडेही वाढेल, असे दिसते.कतारमध्ये साडेसहा लाख भारतीय आहेत. ते तिथे रोजगारासाठी गेले असून, ते नियमितपणे भारतात येत असतात. त्यांनाही या निर्बंधांचा फटका बसेल. तसेच युरोपमध्ये कतारमार्गे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फारच घटेल. अन्य मार्गाने युरोपला जाण्यासाठी ते अर्थातच कतार एअरलाइन्स वगळता अन्य कंपन्यांची तिकिटे काढतील आणि त्याचा आर्थिक फटका कतार एअरलाइन्सला बसेल.जुनाईक यांनी सांगितले की, भारतासह आशिया प्रशांत क्षेत्रातील हवाई वाहतूक गेल्या काही आठवड्यांत स्थिर होती. त्यातच २१ मार्च रोजी अमेरिकेने पश्चित आशिया आणि उत्त्तर अमेरिकेतील देशांना जाणाऱ्या विमानांत वैयक्तिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्यास बंदी घातली होती.>भारतीयांना फटकापश्चिम आशियाई देशांनी कतारवर घातलेल्या हवाई बंदीमुळे विमान प्रवास महागणार आहे. भारतीयांना त्याचा मोठा फटका बसेल. सौदी अरेबिया, इजिप्त, संयुक्त अरब आमिरात आणि बहारिन या देशांची अमेरिका अथवा युरोपला जाणारी विमाने आतापर्यंत दोहा मार्गेच जात होती. तसेच काही विमाने कतारवरून उड्डाण करत होती. दिल्लीहून जाणारी विमाने प्रामुख्याने हा मार्ग स्वीकारीत असत. हा जवळचा मार्ग आहे. आता त्यांना इराणमार्गे जावे लागेल. त्यामुळे आता तिकिटांचा खर्च वाढणार आहे. आधीच परदेशात गेलेल्या भारतीयांना त्याचा फटका बसेल.