शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

विदेशात काळा पैसा दडवलेल्यांना संरक्षण - मोदी सरकारचं घुमजाव

By admin | Updated: October 17, 2014 14:44 IST

शंभर दिवसांमध्ये विदेशातला काळा पैसा आणू अशा वल्गना करणा-या मोदी सरकारनं संपूर्ण घुमजाव करत विदेशात बँक खाती असलेल्या भारतीयांची नावे उघड करता येणार नाहीत

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १७ - शंभर दिवसांमध्ये विदेशातला काळा पैसा आणू अशा वल्गना करणा-या मोदी सरकारनं संपूर्ण घुमजाव करत विदेशात बँक खाती असलेल्या भारतीयांची नावे उघड करता येणार नाहीत असे सुप्रीम कोर्टामध्ये सांगितले आहे. विशेष म्हणजे हीच भूमिका आधीच्या युपीए सरकारने घेतली होती, त्यावेळी मात्र भाजपाने युपीएवर काळा पैसा बाळगणा-या धेंडांना सरकार पाठिशी घालत असल्याचा आरोप केला होता. याप्रकरणातील याचिकाकर्ते व ज्येष्ठ वकिल राम जेठमलानी यांनी मोदी सरकारही युपीए सरकारप्रमाणेच काळा पैसा विदेशात दडवणा-यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप केला आहे.
भारत सरकारने दुहेरी करआकारणीपासून सुटका मिळावी या उद्देशाने अन्य देशांशी द्विपक्षीय करार केले असल्याने अशा खातेधारकांची नावे उघड करता येत नसल्याचे कारण पुढे केले आहे. याबाबत अशी भूमिका केवळ विदेशात काळा पैसा दडवणारे भ्रष्टाचारीच घेऊ शकतात, लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार नाही असे मत व्यक्त केले आहे. याबाबत केंद्र सरकारची सविस्तर भूमिका २८ ऑक्टोबर रोजी सादर करण्याची संमती कोर्टाने दिली आहे. ज्या विदेशी खातेधारकांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आलेली नाही, त्यांची नावे सरकार उघड करू शकत नाही अशी भूमिका सरकारच्या वतीने अ‍ॅटर्नी जनरल मुकूल रोहतगी यांनी कोर्टात मांडली. लिचेस्टन बँकेतल्या भारतीय खातेधारकांची नावे उघड करण्याबाबत जर्मन सरकारने तीव्र हरकत घेतली असल्याचे रोहतगी म्हणाले. दुहेरी करआकारणी टाळण्याबाबत महत्त्वाचे करार अनेक देशांशी करण्याच्या बेतात केंद्र सरकार असल्याचेही रोहतगी यांनी सांगितले.
जर, कायदेशीर कारवाई करण्यात न आलेल्या व्यक्तिंची नावे उघड केली तर भारतीयांच्या विदेशातल्या काळ्या पैशाची माहिती त्या त्या देशांमधली सरकारे देणार नाहीत अशी भीतीही रोहतगी यांनी व्यक्त केली आहे. 
मात्र, नंतर पत्रकारांशी बोलताना राम जेठमलानी यांनी अर्थमंत्री व अ‍ॅटर्नी जनरल या दोघांच्या भूमिकेबाबत अत्यंत नाराजी व्यक्त करताना यामुळे गुन्हेगार मोकाट सुटतील अशी भीती व्यक्त केली आहे. याबाबत आपण पंतप्रधानांनाही पत्र लिहिले असल्याचे जेठमलानी म्हणाले असून ही आपली शेवटची इच्छा असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.