शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विदेशात काळा पैसा दडवलेल्यांना संरक्षण - मोदी सरकारचं घुमजाव

By admin | Updated: October 17, 2014 14:44 IST

शंभर दिवसांमध्ये विदेशातला काळा पैसा आणू अशा वल्गना करणा-या मोदी सरकारनं संपूर्ण घुमजाव करत विदेशात बँक खाती असलेल्या भारतीयांची नावे उघड करता येणार नाहीत

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १७ - शंभर दिवसांमध्ये विदेशातला काळा पैसा आणू अशा वल्गना करणा-या मोदी सरकारनं संपूर्ण घुमजाव करत विदेशात बँक खाती असलेल्या भारतीयांची नावे उघड करता येणार नाहीत असे सुप्रीम कोर्टामध्ये सांगितले आहे. विशेष म्हणजे हीच भूमिका आधीच्या युपीए सरकारने घेतली होती, त्यावेळी मात्र भाजपाने युपीएवर काळा पैसा बाळगणा-या धेंडांना सरकार पाठिशी घालत असल्याचा आरोप केला होता. याप्रकरणातील याचिकाकर्ते व ज्येष्ठ वकिल राम जेठमलानी यांनी मोदी सरकारही युपीए सरकारप्रमाणेच काळा पैसा विदेशात दडवणा-यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप केला आहे.
भारत सरकारने दुहेरी करआकारणीपासून सुटका मिळावी या उद्देशाने अन्य देशांशी द्विपक्षीय करार केले असल्याने अशा खातेधारकांची नावे उघड करता येत नसल्याचे कारण पुढे केले आहे. याबाबत अशी भूमिका केवळ विदेशात काळा पैसा दडवणारे भ्रष्टाचारीच घेऊ शकतात, लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार नाही असे मत व्यक्त केले आहे. याबाबत केंद्र सरकारची सविस्तर भूमिका २८ ऑक्टोबर रोजी सादर करण्याची संमती कोर्टाने दिली आहे. ज्या विदेशी खातेधारकांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आलेली नाही, त्यांची नावे सरकार उघड करू शकत नाही अशी भूमिका सरकारच्या वतीने अ‍ॅटर्नी जनरल मुकूल रोहतगी यांनी कोर्टात मांडली. लिचेस्टन बँकेतल्या भारतीय खातेधारकांची नावे उघड करण्याबाबत जर्मन सरकारने तीव्र हरकत घेतली असल्याचे रोहतगी म्हणाले. दुहेरी करआकारणी टाळण्याबाबत महत्त्वाचे करार अनेक देशांशी करण्याच्या बेतात केंद्र सरकार असल्याचेही रोहतगी यांनी सांगितले.
जर, कायदेशीर कारवाई करण्यात न आलेल्या व्यक्तिंची नावे उघड केली तर भारतीयांच्या विदेशातल्या काळ्या पैशाची माहिती त्या त्या देशांमधली सरकारे देणार नाहीत अशी भीतीही रोहतगी यांनी व्यक्त केली आहे. 
मात्र, नंतर पत्रकारांशी बोलताना राम जेठमलानी यांनी अर्थमंत्री व अ‍ॅटर्नी जनरल या दोघांच्या भूमिकेबाबत अत्यंत नाराजी व्यक्त करताना यामुळे गुन्हेगार मोकाट सुटतील अशी भीती व्यक्त केली आहे. याबाबत आपण पंतप्रधानांनाही पत्र लिहिले असल्याचे जेठमलानी म्हणाले असून ही आपली शेवटची इच्छा असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.