शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

युद्धासाठी आमचे सैनिक तयार - पाक पंतप्रधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2017 15:53 IST

भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना सोमवारी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर पाक पंतप्रधान नवाज शरिफ यांनी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

ऑनलाइन लोकमतइस्लामाबाद, दि. 11 - भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना सोमवारी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर पाक पंतप्रधान नवाज शरिफ यांनी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. नवाज शरिफ म्हणाले, आमचा देश शांतीपूर्ण आहे. शेजारील देशांशी आम्ही मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. जर आमच्यावर कोणत्याही प्रकारचे संकट आल्यास आमचे सैनिक युद्धासाठी तयार आहेत. नवाज शरिफ पाकमधील नौदलाच्या कार्यक्रमात बोलत होते. पाक सैनिक सर्व प्रकारच्या आडचणीचा सामना करण्यासाठी तत्पर आहे. कोणतेही संकट आल्यास ते माघारी लावू शकतो. पाक नेहमी शेजारील देशाशी शांती आणि मैत्रीद्वारे संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पुढे बोलताना शरिफ म्हणाले, शेजारील देशासोबत आम्ही सतत मैत्रीचा हात पुढे करत असतो. पण शांतीप्रमाणे आम्हाला आमच्या देशाच्या सुरक्षेचाही विचार करवा लागतोय. दहशतावादाविरोधातील सुरु असलेल्या लढाईवर बोलताना ते म्हणाले, दहशतवाद्यांच्या विरोधात कडक कारवाई सुरु आहे त्यामध्ये खुप सुधारणा झालेली आहे. पाकिस्तानमधील इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र असलेल्या द नेशननं पहिल्या पानावर "हेरगिरी करण्यासाठी मृत्यू" ही शिक्षा असल्याचं छापलं आहे. राजकीय आणि संरक्षण विश्लेषक डॉ. हसन अन्सारी यांच्यामते, या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील तणावामध्ये वाढ होणार असून, पाकिस्ताननं या गुन्ह्यासाठी गंभीर शिक्षा दिल्याचंही द नेशननं त्यामध्ये म्हटलं आहे."आउट ऑफ द वे" जाऊन कुलभूषण यांना वाचवू - स्वराजकुलभूषण जाधव भारताचा मुलगा आहे. त्यांनी हेरगिरी केल्याचा पाकिस्तानकडे कोणताही पुरावा नाही. काहीही करुण कुलभूषण यांना सरकार वाचवेल अशी ग्वाही परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिली. कुलभूषण सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा हा सुनियोजित कट आहे. पण आम्ही तो यशस्वी होऊ देणार नाही. काहीही करू, "आउट ऑफ द वे" जाऊन सरकार कुलभूषण यांना वाचवेल अशी भूमिका स्वराज यांनी मांडली.कुलभूषण जाधव यांना न्याय मिळावा यासाठी भारत सर्व प्रयत्न करणार आहे, त्यांच्याकडे भारताचा अधिकृत व्हिसा असताना त्यांच्यावर हेर असल्याचा शिक्का का? कुलभूषण यांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा असून त्यांना न्याय देण्यासाठी जे करावं लागेल ते सर्व केलं जाईल, असा शब्द केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिला.कुलभूषण जाधव यांचा जीव वाचवणं गरजेचं- ओवैसीपाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधव यांचा जीव वाचवणं गरजेचं असल्याचं मत लोकसभेत एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मांडलं आहे. कुलभूषण यांच्या बचावासाठी मोदी सरकारनं स्वतःची सर्व शक्ती पणाला लावण्याची गरज आहे. कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणा, असंही ते म्हणाले आहेत.