शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

लंडनमध्ये पडसाद असहिष्णुतेचे

By admin | Updated: November 14, 2015 03:48 IST

भारतभरातील अभिजनांनी उपस्थित केलेल्या असहिष्णुतेच्या मुद्द्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पिच्छा इंग्लंड वारीतही सोडला नाही.

लंडन : भारतभरातील अभिजनांनी उपस्थित केलेल्या असहिष्णुतेच्या मुद्द्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पिच्छा इंग्लंड वारीतही सोडला नाही. इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून आणि नरेंद्र मोदी यांनी एकत्रित घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोदी यांच्याकडे भारतात वाढीस लागलेल्या असहिष्णू वातावरणाबाबत विचारणा झालीच. अब्जावधींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार, राणीकडचे प्रीतिभोजन, पंतप्रधानांकडचा मुक्काम, भारतीयांसाठीच्या भाषणासाठीची विलक्षण आतुरता, उत्स्फूर्त तिरंगी स्वागत आणि निदर्शनांचे किंचितसे गालबोट अशा अपूर्व माहोलातही ‘असहिष्णुते’ने गाठल्यावर भारतात असहिष्णुतेला थारा नाही आणि भारत ही भगवान बुद्ध आणि गांधीजींची भूमी असल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले. भारत सध्या असहिष्णू देश का होत चालला आहे असे विचारताच मोदी म्हणाले, ‘‘भारत ही गौतम बुद्ध आणि महात्मा गांधीजी यांची भूमी आहे, आणि भारतीय संस्कृती मूलभूत सामाजिक तत्त्वांच्या विरोधातील कोणतीही घटना स्वीकारत नाही. एखाददुसऱ्या घटनेबाबतही भारत असहिष्णुता खपवून घेत नाही. १२५ कोटींच्या देशामध्ये ती घटना महत्त्वपूर्ण असो वा नसो, आमच्यासाठी ती गंभीरच आहे.’’ भारतातील कायदा त्याचे काम चोख बजावत असतो आणि यापुढेही करत राहील. भारत लोकशाहीचे एक जिवंत प्रतीक असून, आमची राज्यघटना प्रत्येक नागरिकाच्या जीविताचे आणि विचारांचे रक्षण करते आणि आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी या भेटीत भारत आणि इंग्लंडमधील विविध कंपन्यांच्या सीईओंच्या गोलमेज परिषदेस संबोधित केले. या परिषदेत भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत आश्वासक आणि सातत्याने प्रगती करीत असल्याचे त्यांनी सांगितले. आर्थिक बाबतीत भारत आणि इंग्लंड एकमेकांसाठीच बनले आहेत. या आर्थिक नात्याचे मार्गदर्शक खासगी कंपन्यांंचे सीईओच आहेत. याबरोबरच भारतीय रेल्वेची स्थानके पीपीपी मॉडेलद्वारे विकसित करण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखविला. कौशल्यविकास हाच माझ्यासाठी महत्त्वाचा मुद्दा असून, सर्व जगाला मनुष्यबळ भारत पुरवू शकेल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. (वत्तसंस्था)