शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

कार्बन उत्सर्जन कमी करण्याची घेतली शपथ

By admin | Updated: December 15, 2014 03:04 IST

गेल्या काही दिवसांपासून हवामान बदलावर येथे चाललेल्या संयुक्त राष्ट्राच्या परिषदेत प्रदीर्घ चर्चेनंतर अंतिम करार करण्यास यश मिळाले असून

लिमा : गेल्या काही दिवसांपासून हवामान बदलावर येथे चाललेल्या संयुक्त राष्ट्राच्या परिषदेत प्रदीर्घ चर्चेनंतर अंतिम करार करण्यास यश मिळाले असून, सदस्य देशांनी कार्बन उत्सर्जनात कपात करण्याची शपथ घेतली आहे. हवामानाबाबत भारताने उपस्थित केलेल्या मुद्यामुळे पुढच्या वर्षी पॅरिस येथे होत असलेल्या हवामान परिषदेत सर्व देशांना बंधनकारक महत्त्वाकांक्षी करार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदलावरील परिषदेचे अध्यक्ष मॅन्युअल पुल्गार-विदाल यांनी करार झाल्याची घोषणा केली. ते पेरूचे पर्यावरणमंत्रीही आहेत. पेरूची राजधानी लिमा येथे गेले दोन आठवडे हवामान बदलावर जोरदार चर्चा सुरू होती.या चर्चेत १९४ देश सहभागी होते. भारताचे पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर या संदर्भात बोलताना म्हणाले की, भारताच्या सर्व मुद्यांचा समावेश अंतिम करारात करण्यात आला आहे. २०१५ साली पॅरिस येथे होत असलेल्या परिषदेत मांडण्यासाठी विचारधारा या बैठकीत मंजूर करण्यात आली आहे. हे अधिवेशन निर्धारित कालावधीपेक्षा दोन दिवस अधिकच चालले. या परिषदेत तयार करण्यात आलेला पहिला मसुदा विकसनशील देशांनी फेटाळला होता. हा मसुदा मंजूर होणे ही पॅरिस येथे होणाऱ्या हवामान परिषदेची पूर्वतयारी आहे. हा करार हवामान बदलासाठी लिमाचे आवाहन या नावाने ओळखला जाणार आहे. २०१५ च्या डिसेंबर महिन्यात पॅरिस येथे हवामान परिषद होईल, त्याआधी महिनाभर या ठरावाचा आढावा घेतला जाईल. परिषदेचे अध्यक्ष पुल्गार-विदाल यांनी काल दिवसभर विविध प्रतिनिधींच्या भेटी घेतल्या. त्यावरून तयार केलेला मसुदा वाटाघाटीत भाग घेणाऱ्या सदस्यांना हा मसुदा वाटण्यात आला व त्याचा अभ्यास करण्यासाठी एक तास देण्यात आला. कार्बन कपातीसाठी येणारा खर्च गरीब व श्रीमंत देशात कसा वाटला जावा या मुद्यामुळे या वाटाघाटी थोड्या अवघड झाल्या. स्थानिक वेळेनुसार दुपारी १.३० वाजता मुख्य बैठक बोलावण्यात आली व त्यात विदाल यांनी मसुदा मंजूर झाल्याची घोषणा केली. (वृत्तसंस्था)