शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

पेशावर: विद्यार्थ्यांवर तालिबानी हल्ला

By admin | Updated: December 16, 2014 00:00 IST

पाकिस्तानमधील पेशावर येथील एका लष्करी शाळेवर ६ ते ७ दहशतवाद्यांनी सकाळी साडे दहाच्या सुमारास हल्ला केला. या हल्ल्यात १६० निष्पाप विद्यार्थी ठार झाले आहेत. पाकिस्तानमध्ये तालिबान्यांनी केलेल्या या हल्याची जगभरातून निंदा करण्यात येत आहे.तालिबान्यांनी पेशावरमधील लष्करी शाळाला टार्गेट केल्याची माहिती मिळताच पाकिस्तानी सैनिकांनी विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी धाव घेतली. शाळेच्या ...

पाकिस्तानमधील पेशावर येथील एका लष्करी शाळेवर ६ ते ७ दहशतवाद्यांनी सकाळी साडे दहाच्या सुमारास हल्ला केला. या हल्ल्यात १६० निष्पाप विद्यार्थी ठार झाले आहेत. पाकिस्तानमध्ये तालिबान्यांनी केलेल्या या हल्याची जगभरातून निंदा करण्यात येत आहे.

तालिबान्यांनी पेशावरमधील लष्करी शाळाला टार्गेट केल्याची माहिती मिळताच पाकिस्तानी सैनिकांनी विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी धाव घेतली. शाळेच्या परिसरात सैनिकांनी तालिबान्यांच्या दिशेने गोळीबार केला.

या हल्ल्याची जबाबदारी "तेहरीक - ए - तालिबान" या दहशतवादी संघटनेने स्वीकारली असून पाकिस्तानी लष्करांकडून होणा-या कारवाईचा बदला म्हणून आम्ही हा हल्ला केल्याचे म्हटले आहे.

दहशतवादी तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्यात जखमी विद्यार्थ्यांवर पेशावरमधील हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.

तालिबान्यांनी ओलिस ठेवलेल्या असंख्य विद्यार्थ्यांची पाकिस्तान सैनिकांनी सुखरुप सुटका केली. विद्यार्थ्यांची सुटका होताच त्यांनी आपल्या घराकडे धाव घेतली.

तालिबान्यांचा मुकाबला करण्यासाठी पाकिस्तानी सैनिकांच्या अतिरिक्त तुकड्या मागविण्यात आल्या. याच सैनिकांनी हल्ला केलेल्या ६-७ दहशतवादी तालिबान्यांचा खात्मा केला.

पेशावरमधील तालिबान्यांनी केलेला हा दहशतवादी हल्ला चिमुकल्या विद्यार्थ्यावर केलेला सर्वात मोठा हल्ला असून चिमुकल्यांचा जीव वाचविण्यासाठी पेशावरमध्ये असंख्य अ‍ॅम्यूलन्स रस्त्यावर धावाताना एकसारख्या दिसून आल्या.

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात धिक्कार केला असून पाकिस्तानमध्ये तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

पाकिस्तानच्या पेशावरमध्ये तालिबान्यांनी केलेल्या हल्याचा तीव्र शब्दांत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धिक्कार केला असून तालिबान्यांनी केलेला हा भ्याड हल्ला असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.

शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेले कैलास सत्यार्थी व मलाला युसूफझाई या दोघांनी या हल्ल्याचा निषेध केला. तालिबानी हल्ल्याची घटना ह्रदय पिळवटून टाकणारी संवेदनाहिन आणि क्रूर असल्याचे मलालाने म्हटले तर पेशावरमधील हल्ला हा मानवतेसाठी काळा दिवस असल्याचे कैलाश सत्यार्थी यांनी म्हटले आहे.

सकाळी साडे दहाच्या सुमारास तालिबानी दहशतवादी व पाकिस्तानी सैनिकांमध्ये सुरू झालेला रक्तपाताचा थरार तब्बल ७ तासानंतर संपला. शेकडो निष्पाप विद्यार्थ्यांचा जीव गेल्यानंतर हा थरार संपला.

शाळेतून परतणारा आपला चिमुकला आता कधीच परतणार नाही...ही वास्तवता स्वीकारण्यास आईची मानसिकताच राहिली नसून आपल्या लाडक्या मुलाच्या शवपेटीकडे पाहून शेकडो आईचा शोक अनावर झाला.