शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

लेबनॉनमध्ये जनक्षोभ!

By admin | Updated: August 30, 2015 23:16 IST

लेबनॉन या मध्यपुर्वेतील देशामधील अशांतता सध्या जगभरामध्ये चर्चेत आहे. पायाभूत सुविधा देण्यास सरकार अपयशी ठरल्यावर जनक्षोभ कसा उसळू शकतो याचा

बैरुत : लेबनॉन या मध्यपुर्वेतील देशामधील अशांतता सध्या जगभरामध्ये चर्चेत आहे. पायाभूत सुविधा देण्यास सरकार अपयशी ठरल्यावर जनक्षोभ कसा उसळू शकतो याचा प्रत्यय राजधानी बैरुतमध्ये येत आहे. सार्वजनिक ठिकाणचा कचरा वेळीच न उचलला गेल्याने चालूू झालेल्या आंदोलनाने आता सरकारविरोधातच निदर्शने करायला सुरुवात केली आहे. आता सरकारचा निषेध करणारी यू स्टिंक ही मोहिमच सुरु झाली आहे.लेबनॉनमधील रस्त्यांवर पडणारा कचरा व्यवस्थित व वेळीच गोळा होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. त्यातच सरकारने या भावनांना गांभिर्याने न घेतल्यामुळे कचऱ्याचे ढीग रस्त्यांवर साठतच गेले व चालणे-फिरणेही मुश्किल होऊन बसले. शेवटी लोकांनीच रस्त्यांवर उतरुन सरकारचा निषेध करण्याची भूमिका घेतली. इतके होऊनही कचऱ्याची समस्या सोडविण्याऐवजी सरकानने निदर्शकांना अश्रूधुर किंवा पाण्याचा वापर करिन पांगविण्याची पद्धती अवलंबिल्यामुळे निदर्शक अधिकच हिंसक झाले आहेत. कचरा पेटतो तेव्हा....कचऱ्याच्या प्रश्नाच्या निमित्ताने सरकार विरोधातील रागाची भावना सध्या बैरुतमध्ये बाहेर पडत आहे. शनिवारी शहिद चौकामध्ये जमून नागरिकांनी सरकारविरोधात निदर्शने केली. कित्येक लोकांनी कचऱ्याचे ढीग सरळ पेटवून दिले. तर अनेकांनी पोलिसांवर दगडफेकही केली. नागरिकांनी यू स्टिंक असे लिहिलेले शर्ट घालून सरकारला गृहमंत्री हटविण्यासाठी ७२ तासांचा अल्टिमेटम दिला. कचरा उचलण्याच्या पद्धतीचे विकेंद्रीकरण करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. कित्येक नागरिकांनी हा संपुर्ण देश म्हणजेच एक कचराकुंडी झाली आहे अशी भावना व्यक्त केली आहे.लेबनॉनचे राष्ट्राध्यक्षपद गेले एक वर्ष रिकामे आहे. खासदारांनी स्वत:ची मुदत २०१७ पर्यंत वाढवून घधेतली आहे. त्यानंतरच नव्या निवडणुका होतील. लेबनॉनलाही सीरियन स्थलांतरितांची झळ बसली आहे. गृहयुद्धाने ग्रासलेला आणि इसिसचा सर्वात जास्त तडाखा बसलेला सीरिया लेबनॉनचा सख्खा शेजारी आहे. त्यामुळे स्थलांतरितांनी सीमा ओलांडून लेबनॉनमध्ये प्रवेश केला आहे. आतापर्यंत ११ लाख सीरियन लेबनॉनमध्ये घुसले आहेत त्याचाही ताण लेबनॉनच्या अर्थव्यवस्था व सार्वजनिक व्यवस्थेवर आलेला आहे. आठवड्याभरापुर्वी या निदर्शनांनी उग्र स्वरुप धारण केल्यानंतर पंतप्रधाव तम्माम सलाम यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला होता आणि आंदोलने अशीच चालू राहिली तर सर्व व्यवस्था कोसळेल असे सूचित केले होते. 1975-1990इतका मोठा काळ यादवी युद्धाचा सामना केल्यानंतर गेल्या २५ वर्षात लेबनॉनची स्थिती फारशी बदलेली नाही. आजही विजेच्या तुटवड्याला बैरुतला सामोरे जावे लागते. त्यामुळेच आंदोलकांनी वीज आणि पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी कचऱ्याच्या निमित्ताने रेटली आहे.