शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

पठाणकोट; पाकमध्ये ‘एफआयआर’ दाखल

By admin | Updated: February 20, 2016 02:51 IST

पठाणकोट दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानी प्रशासनाने प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला. तथापि, त्यात जैश ए मोहंमदचा प्रमुख मौलाना मसूद अझहर याच्या नावाचा उल्लेखच नाही

लाहोर/इस्लामाबाद : पठाणकोट दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानी प्रशासनाने प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला. तथापि, त्यात जैश ए मोहंमदचा प्रमुख मौलाना मसूद अझहर याच्या नावाचा उल्लेखच नाही. मसूद या हल्ल्याचा सूत्रधार असल्याचा भारताचा आरोप आहे. या हल्ल्याबाबत अनेक आठवडे चाललेल्या चौकशीनंतर अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. पंजाब प्रांताच्या गुजरानवाला येथील दहशतवाद प्रतिबंधक विभागाच्या (सीटीडी) केंद्रात गुरुवारी हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यासंदर्भात गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारे पोलीस आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यासाठी ‘एफआयआर’ची आवश्यकता होती, असे सीटीडीच्या अधिकाऱ्याने सांगितले. मसूद अझहर हा हल्ल्याचा सूत्रधार असून त्याचा भाऊ रऊफ आणि इतर पाच जणांनी तो घडवून आणल्याचे भारताचे म्हणणे आहे. पठाणकोट येथील हवाई तळावर दोन जानेवारी रोजी हल्ला झाला होता. चार हल्लेखोरांनी पाकमधूून भारतात येऊन हल्ला केल्याचे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पाकला कळविले होते. (वृत्तसंस्था)त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारेच हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ०६/२०१६ असा या एफआयआरचा क्रमांक असून यात हल्ल्याबाबत अज्ञात लोकांविरुद्ध पाकिस्तान दंड संहितेच्या ३०२, ३२४ आणि १०९ कलमान्वये तसेच दहशतवादविरोधी कायद्याच्या कलम ७ व २१-१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांनी वापरलेल्या टेलिफोन क्रमांकांचाही एफआयआरमध्ये उल्लेख आहे. या हल्ल्यामुळे भारत-पाक परराष्ट्र सचिव चर्चा पुढे ढकलावी लागली होती. तेव्हापासून आतापर्यंत या चर्चेची तारीख ठरू शकलेली नाही. हल्ल्यामागे पाकमधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहंमदचा हात आहे, असे भारताने ठामपणे सांगितल्यानंतर पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी याबाबत चौकशी करण्यासाठी पंजाब सीटीडीचे अतिरिक्त महानिरीक्षक राय ताहिर यांच्या नेतृत्वाखाली सहा सदस्यीय चौकशी पथक स्थापन केले होते. याच पथकाच्या शिफारशीवरून हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एफआयआर दाखल झाल्यानंतर भारताकडून हल्ल्याबाबत आणखी माहिती मागवली जाईल, असे पाकच्या पंजाब प्रांतातील विधिमंत्री राणा सनाउल्ला यांनी शुक्रवारी सांगितले. ते लाहोर येथे पत्रकारांशी बोलत होते. या एफआयआरमधून पाकची दहशतवादाविरुद्धची बांधिलकी प्रदर्शित होते. या हल्ल्यात अझहरचा हात असल्याचे आढळून आले तर निश्चितपणे त्याच्यावरही खटला चालविला जाईल, असेही ते म्हणाले. पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्याच्या तपासासाठी पाकिस्तानने नोंदविलेल्या एफआयआरमध्ये जैश- ए- मोहम्मद ही अतिरेकी संघटना किंवा या संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याचे नाव समाविष्ट न केल्यामुळे भारताने शुक्रवारी आपली नाराजी व्यक्त केली.