शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
7
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
8
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
9
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
10
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
11
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
12
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
13
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
14
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
15
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
16
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
17
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
18
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
19
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
20
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच

पाकिस्तानचे शेपूट वाकडेच

By admin | Updated: August 15, 2016 06:31 IST

‘भारत द्वेश’ हा एककलमी कार्यक्रम राबविणाऱ्या पाकिस्तानने शनिवारी त्यांचा स्वातंत्र्य दिन आनंदात साजरा करण्याऐवजी भारताच्या कुरापती काढण्यातच विकृत धन्यता मानली.

नवी दिल्ली : स्वत:चा विकास आणि कल्याण करण्याऐवजी गेली ७० वर्षे ‘भारत द्वेश’ हा एककलमी कार्यक्रम राबविणाऱ्या पाकिस्तानने शनिवारी त्यांचा स्वातंत्र्य दिन आनंदात साजरा करण्याऐवजी भारताच्या कुरापती काढण्यातच विकृत धन्यता मानली. पंजाबच्या वाघा सीमाचौकीवर पाकिस्तानच्या रेंजर्सनी भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना मिठाई वाटली, तर दुसरीकडे काश्मीर सीमेवर पुंच्छ भागात भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. सुरक्षा दलांच्या कारवाईत बुऱ्हाण वणी मारला गेल्यापासून, ३४ दिवस धुमसत ठेवलेल्या काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी पाकने उघड चिथावणीही दिली. काश्मिरात जनजीवन ठप्प असल्याने, तेथे आपल्या बाजूने जीवनावश्यक वस्तूंची रसद पुरविण्याचा आगीत तेल ओतणारा प्रस्तावही पाकने केला. भारताने पाकिस्तानच्या या प्रत्येक उक्ती आणि कृतीला चोख प्रत्युत्तर देत आता पाकिस्तानच्या ताब्यात असलेले काश्मीर मुक्त करणे हा एकमेव न सुटलेला द्विपक्षीय मुद्दा शिल्लक असल्याचे ठणकावून सांगितले. सकाळी वाघा सीमा चौकीवर मिठाई वाटली जात असताना, तिकडे इस्लामाबादमध्ये झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य कार्यक्रमात पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष मामून हुसैन यांनी काश्मीरचा मुद्दा मुद्दाम उपस्थित केला. काश्मिरी जनतेच्या स्वयंनिर्णयाच्या लढ्यास पाकचे समर्थन कायम राहील व पाकिस्तान काश्मिरींना कधीच विसरणार नाही, असे त्यांनी सांगितले. इकडे नवी दिल्लीत पाकच्या उच्चायुक्तालयामध्ये स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम झाला, तेव्हा पाकचे सैनिक काश्मीर सीमेवर पुंच्छ भागात भारतीय चौक्यांवर गोळीबार व तोफगोळ््यांचा मारा करीत होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)>काश्मीर के नाम आजादी‘इस साल की जश्न-ई-आजादी हम काश्मीर की आजादी के नाम करते है,’ असे चिथावणीखोर विधान पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी त्यांचा राष्ट्रध्वज फडविल्यानंतर केले. काश्मिरी जनतेचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असा दृढ विश्वास आहे. काश्मिरातील सध्याची अशांतता संपायला हवी. कितीही ताकदीचा उपयोग केला, तरी काश्मिरातील जनतेच्या राजकीय आकांक्षांना दडपले जाऊ शकत नाही. काश्मिरी जनतेचा जो ‘वैध संघर्ष’ आहे त्याला दुर्लक्षित करून चालणार नाही, असेही ते म्हणाले. पाकिस्तानच्या ताब्यात असलेला काश्मीरचा भाग मुक्त करून, तो जम्मू-काश्मीरमध्ये आणि भारतीय संघराज्यामध्ये पुन्हा कसा सामील करायचा, एवढाच आमच्या दृष्टीने पाकिस्तानसोबत अनिर्णित राहिलेला मुद्दा आहे. -जितेंद्र सिंग, राज्यमंत्री पंतप्रधान कार्यालय>करता तेवढी निर्यात पुरे झालीआंतरराष्ट्रीय दहशतवाद, सीमापार घुसखोरी, शस्त्रे, अंमली पदार्थ आणि बनावट चलनी नोटा हा पाकिस्तानकडून केली जाणारी प्रमुख निर्यात आहे व भारतासह या क्षेत्रातील इतर देशांनी या निर्या तीची फळे खूप भोगली आहेत. त्यामुळे पाकिस्तानने आम्हाला आणखी काही पुरविण्याचे सौजन्य दाखवू नये, अशी तिखट व तिरसट प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी व्यक्त केली.गेला महिनाभर काश्मीर खोऱ्यातील जनजीवन ठप्प असल्याने तेथील नागरिकांच्या सोईसाठी, सीमेच्या पलीकडून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचा प्रस्ताव करणारे एक टिपण, इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयात राजनैतिक माध्यमातून १२ आॅगस्ट रोजी पाठविण्यात आले. त्यावर विकास स्वरूप यांनी वरील प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानच्या या प्रस्तावाचे फक्त ‘नादानपणाचा’ एवढेच वर्णन करता येईल, असे ते म्हणाले.