शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पाकने काश्मीर मुद्दा युनोत मांडणे हा हस्तक्षेप - भारत

By admin | Updated: October 16, 2015 04:07 IST

पाकिस्तान संयुक्त राष्ट्राच्या (युनो) विविध मंचांवर जम्मू व काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत असल्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना भारताने बुधवारी पाकची ही कृती संदर्भहीन

संयुक्त राष्ट्र : पाकिस्तान संयुक्त राष्ट्राच्या (युनो) विविध मंचांवर जम्मू व काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत असल्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना भारताने बुधवारी पाकची ही कृती संदर्भहीन आणि आपल्या अंतर्गत कारभारात स्पष्ट ढवळाढवळ असल्याचे म्हटले. काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असून पुढेही राहील, असेही भारताने स्पष्टपणे बजावले.संयुक्त राष्ट्रात पाकच्या मुत्सद्याने केलेल्या वक्तव्यांवर प्रत्युत्तर देण्याच्या अधिकाराचा उपयोग करताना संयुक्त राष्ट्रातील भारतीय मिशनचे सचिव अभिषेक सिंह म्हणाले की, पाकने प्रत्युत्तर देण्याच्या अधिकाराचा वापर करण्याऐवजी आत्मपरीक्षण करून तो देश कोणत्या दिशेने जात आहे, हे पाहिले पाहिजे. संयुक्त राष्ट्रातील पाकच्या राजदूत मलीहा लोधी यांनी संयुक्त राष्ट्र आमसभेच्या सत्रात काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. काश्मिरी लोक काश्मीर वादाच्या केंद्रस्थानी असून हा वाद शांततापूर्ण मार्गाने सोडवण्यास त्यांच्याशी विचारविनिमय करणे आवश्यक आहे. चर्चेसाठी काश्मिरींशी विचारविनिमय न करणे ही पूर्वअट मान्य होऊ शकत नाही. यातून काही निष्कर्षही निघणार नाही, असेही त्या म्हणाल्या होत्या. सिंह म्हणाले की, भारताचा निम्मा जम्मू-काश्मीर गिळंकृत करणाऱ्या देशाने अशी विधाने करणे हास्यास्पद आहे. पाकने अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने भारतात अनेक नागरिकांना प्राण गमवावे लागल्याबद्दल सिंह यांनी दु:ख व्यक्त केले.