शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पाकची अण्वस्त्रे भारताचा हल्ला रोखण्यासाठीच

By admin | Updated: October 21, 2015 04:28 IST

भारताकडून होऊ शकणारा संभाव्य अचानक हल्ला रोखण्याच्या डावपेचांचा एक भाग म्हणून आम्ही अण्वस्त्रे विकसित केली आहेत व आमच्या अण्वस्त्रांचा तेवढाच एकमेव उद्देश आहे

वॉशिंग्टन : भारताकडून होऊ शकणारा संभाव्य अचानक हल्ला रोखण्याच्या डावपेचांचा एक भाग म्हणून आम्ही अण्वस्त्रे विकसित केली आहेत व आमच्या अण्वस्त्रांचा तेवढाच एकमेव उद्देश आहे, अशी स्पष्ट कबुली पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाज चौधरी यांनी दिली आहे.पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या बुधवारपासून सुरू झालेल्या अमेरिका दौऱ्याच्या पूर्वसंध्येस वॉशिंग्टनमध्ये पाकिस्तानी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना चौधरी म्हणाले की, आमच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचा उद्देश एकच आहे व तो म्हणजे भारताकडून केले जाणारे आक्रमण होण्याआधीच रोखणे. आमची अण्वस्त्रे युद्ध सुरू करण्यासाठी नाहीत. ती (भारतासोबतचे) शक्तिसंतुलन कायम राखण्यासाठी आहेत.‘डॉन’ दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार चौधरी असेही म्हणाले की, पाकिस्तानने अण्वस्त्रे प्रसारबंदीचे उल्लंघन न करता सामरिक डावपेचांचा एक भाग म्हणून अल्प विस्फोटक क्षमतेची अण्वस्त्रे विकसित केली आहेत. त्यामुळे भारताला पाकिस्तानवर आक्रमण करणे कठीण जाईल.पाकिस्तानला भारताकडून हल्ला होण्याची खरोखरच भीती वाटते व तशी परिस्थिती हाताळण्यासाठी पाकिस्तानची काय योजना आहे, याची कोणाही उच्चपदस्थ पाकिस्तानी अधिकाऱ्याने जाहीरपणे वाच्यता करण्याची ही पहिलीच वेळ आहे.भारताने पाकिस्तानवर अचानक व परिणामकारक आक्रमण करण्याचे ‘कोल्ड स्टार्ट डॉक्ट्रिन’ (शत्रूला प्रतिहल्ल्याची संधीही मिळणार नाही अशा अचानक हल्ल्याची व्यूहरचना) अनुसरून त्यानुसार पावले टाकली आहेत, असा दावाही चौधरी यांनी केला. भारताने अशा कोणत्याही व्यूहरचनेची कधीही अधिकृतपणे कबुली दिलेली नाही. परंतु पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांच्या म्हणण्यानुसार हवाई दलाची मदत घेऊन छोट्या; परंतु अत्यंत चपळ लष्करी तुकड्यांनी शत्रूच्या हद्दीत दूरवर घुसून, प्रतिपक्षाला सावध व्हायला वेळही मिळणार नाही, अशा प्रकारचे अचानक हल्ले करण्याची व्यूहरचना आखली आहे.हेच सूत्र पकडून पाकिसतानच्या परराष्ट्र सचिवांनी पुढे असाही दावा केला की, ‘कोल्ड स्टार्ट डॉक्ट्रिन’नुसार भारताने त्यांच्या लष्करी छावण्या पाकिस्तानच्या सीमेजवळ हलविल्या आहेत. यामुळे पारंपरिक युद्धसामग्रीसह अन्य प्रकारची वाहने व इंधन पुरवठ्याची सोय भारताने सीमेजवळ आणली आहे.अशा प्रकारची व्यूहरचना करून भारताने पाकिस्तानवर आक्रमण करण्यासाठी लागणारा वेळ कमी केला आहे. थोडक्यात, भारताने आपल्याकडून अतिक्रमणासाठी ‘जागा’ तयार करून ठेवली आहे, असा आरोपही चौधरी यांनी केला.जेणेकरून भारताला आमच्याविरुद्ध आक्रमण करण्याची संधी मिळणार नाही. असे करण्याचा पाकिस्तानला नक्कीच हक्क आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. (वृत्तसंस्था)चौधरी : अण्वस्त्र नियंत्रण करार नाहीनवाज शरीफ २२ आॅक्टोबर रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना भेटणार आहेत. पाकिस्तानने आपल्या अण्वस्त्र कार्यक्रमास आवर घातला तर अन्य शांततामय उपयोगांसाठी पाकिस्तानला अणू तंत्रज्ञान पुरविण्यासंबंधीच्या कराराचा अमेरिका आग्रह धरत आहे; परंतु शरीफ यांच्या या दौऱ्यात असा कोणताही करार होणार नाही, असेही चौधरी यांनी स्पष्टपणे सांगितले.अण्वस्त्रांमुळे युद्धाचा पर्याय उरत नाहीचौधरी असेही म्हणाले, आमचे म्हणणे एवढेच आहे की, अण्वस्त्रधारी देश युद्ध (सुरू) करण्यासाठी अशा प्रकारे जागा तयार करीत नसतात. अण्वस्त्रे असल्यावर खरे तर युद्ध करणे हा पर्यायच (शिल्लक) राहत नाही. म्हणूनच भारताने आखलेल्या व्यूहरचनेला उत्तर देण्यासाठी आम्ही, बचावात्मक डावपेचांचा भाग म्हणून अण्वस्त्रे विकसित केली आहेत.