शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून पाकिस्तानात महागाई कमी होत नाही, भारताप्रमाणे नोटाबंदी करा, अर्थतज्ज्ञाचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2023 09:59 IST

पाकिस्तानच्या एका अर्थतज्ज्ञाने देशाची आर्थिक स्थिती सुधारण्याचा सल्ला दिला आहे.

पाकिस्तानमध्ये महागाई शिगेला पोहोचली आहे. देशात गरिबी एवढी आहे की, येथील लोकांवर अन्नासाठी भीक मागण्याची वेळ ओढावली आहे. गरीबीतून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान सरकारने अनेकवेळा आयएमएफकडे हात पुढे केला आहे. तरीही एक-दोनच देश मदतीसाठी पुढे आले आहेत, जे त्यासाठी पुरेसे नाही. 

दरम्यान, पाकिस्तानच्या एका अर्थतज्ज्ञाने देशाची आर्थिक स्थिती सुधारण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी त्यांनी भारताकडून प्रेरणा घेऊन त्याच्या मार्गावर चालण्याचा सल्ला दिला आहे. पाकिस्तानी अर्थतज्ज्ञाने देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी नोटाबंदीचा सल्ला दिला आहे. पण भारताचा मार्ग अवलंबून पाकिस्तान आपली गरिबी कमी करू शकेल का? जाणून घ्या...

बिझनेस टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानचे अर्थतज्ज्ञ अम्मार खान यांनी पाकिस्तानला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी नोटाबंदीचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, देशात 5 हजार रुपयांच्या नोटेवर बंदी घातली पाहिजे. अलीकडेच अम्मार खान यांचा एक पॉडकास्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी 5 हजाराची नोट बंद करण्याचा सल्ला दिला आहे. 

अम्मार खान म्हणाले की, भारताने नोटाबंदीच्या फॉर्म्युलावर चांगले काम केले. त्यामुळे भारताच्या कर संकलनाचे आश्चर्यकारक परिणाम बघायला मिळाले. अशा परिस्थितीत पाकिस्तानने हा मार्ग अवलंबला तर कदाचित काही सुधारणा दिसून येईल. दरम्यान, 2016 मध्ये भारतात 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा रद्द करण्यात आल्या होत्या.

सर्कुलेशन आहेत 8 ट्रिलियन अम्मार खान पुढे सांगतात की, पाकिस्तानमध्ये सुमारे 8 ट्रिलियन रुपये तपासाशिवाय सर्कुलेशनमध्ये आहेत. अशा परिस्थितीत या 5 हजारांच्या नोटांवर बंदी घातली तर हे सर्व सर्कुलेशन येईल. पाकिस्तानमध्ये डिजिटल पेमेंट नाही, त्यामुळे येथे बहुतांश व्यवहार रोखीनेच केले जातात. तसेच, याठिकाणी आयात निर्यातीचे सर्व काम अमेरिकन डॉलरमध्ये केले जाते.

श्रीमंत लोकांकडे असते 'ही' नोटबहुतेक श्रीमंत लोकांकडे 5 हजाराची नोट आहे. अशा स्थितीत नोटाबंदीसारखा निर्णय येथे घेतल्यास सर्वसामान्यांना कोणतीही अडचण येणार नाही. त्यापेक्षा इथल्या बड्या लोकांना याचा त्रास होऊ शकतो आणि विरोधही होऊ शकतो. अम्मार खान म्हणाले की, नोटाबंदीमुळे जे 8 ट्रिलियन रुपये सर्कुलेशनमध्ये नाहीत, ते बँकांना मिळू शकले नाहीत, ते बँकांना परत मिळतील. त्यामुळे येथील परिस्थितीही काही प्रमाणात सुधारण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान