शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वाईट प्रतिमेसाठी स्वतः पाकिस्तानच जबाबदार - मलाला

By admin | Updated: April 15, 2017 17:15 IST

नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईने जागतिक पातळीवर पाकिस्तानची वाईट प्रतिमा होण्यासाठी तेथील स्थानिक नागरिकांनाच जबाबदार ठरवले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईने जागतिक पातळीवर पाकिस्तानची वाईट प्रतिमा होण्यासाठी तेथील स्थानिक नागरिकांनाच जबाबदार ठरवले आहे. ईश्वरनिंदा केली म्हणून पाकिस्तानमध्ये एका विद्यार्थ्याला अमानुष मारहाण करण्यात आली. इतकी बेदमी मारहाण केली यात त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.  या घटनेसंदर्भातच बोलताना मलालानं पाकिस्तानवर ही टीका केली आहे. जगभरात पाकिस्तानचे नाव खराब होण्याला दुसरे कोणी नाही तर स्वतः पाकिस्तानच जबाबदार आहे, असे वक्तव्य तिनं केले आहे.
 
एका व्हिडीओद्वारे मलालाने आपले म्हणणं लोकांपुढे मांडले आहे. "इस्लाम आणि पाकिस्तानला कशाप्रकारे बदनाम केले जात आहे, याची आपण चर्चा करतो. कुणीही आपल्या देशाला व धर्माला बदनाम करत नाही. पाकिस्तानची प्रतिमा खराब होण्यास पाकिस्तानातीलच लोकं जबाबदार आहेत. देशाचं नाव खराब करण्यासाठी आपण समर्थ आहोतच, अशी खोचक टीका मलालाने या व्हिडीओद्वारे केली आहे. 
 
गुरुवारी पत्रकारितेचा अभ्यास करणाऱ्या 23 वर्षांच्या मशाल खान या विद्यार्थ्याला जमावाने मारहाण केली. त्याने ईश्वरनिंदा करणारी एक पोस्ट फेसबुकवर टाकली होती. बेदम मारहाण केल्यानंतर त्याला गोळी घालण्यात आली. हे कृत्य इथंवरच थांबलं नाही तर त्याच्या मृतदेहाचीही विटंबना करण्यात आली होती.
 
या घटनेसंदर्भातच मलालानं पाकिस्तानवर कठोर शब्दांत टीका केली आहे. मशालच्या वडिलांसोबत मलालानं संपर्क साधला. मुलाची हत्या झाल्यानंतरही त्याचे वडील देशात सहिष्णुता व शांतता निर्माण व्हावी,  अशी प्रार्थना करत असल्याचे मलालाने सांगितले. ही गोष्ट केवळ मशालच्या मृत्यूची नाही तर इस्लामच्या संदेशाचीदेखील ही हत्या आहे. आपण आपला धर्म, मूल्ये आणि चांगली वागणूक विसरलो आहोत, असंही मलालानं यावेळी म्हटले आहे.
 
मलाला पुढे असंही म्हणाली, "पाकिस्तानातील लोकांनी इस्लामचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.  कारण इस्लाम धर्म शांती आणि सहिष्णुतेचा संदेश देणार आहे.  प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाला सुरक्षित जगण्याचा अधिकार आहे. जर अशा प्रकारे लोकांची हत्या होऊ लागली  तर येथे कुणीच सुरक्षित राहणार नाही", अशी खंत मलालाने व्यक्त केली आहे.
 
पाकिस्तानातील धोरण निर्मात्यांना आणि राजकीय पक्षांनी अशा घटना पुन्हा होऊ न देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, तेव्हाच मशालच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल, असे मतही मलालानं व्यक्त केले आहे.