शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

वाईट प्रतिमेसाठी स्वतः पाकिस्तानच जबाबदार - मलाला

By admin | Updated: April 15, 2017 17:15 IST

नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईने जागतिक पातळीवर पाकिस्तानची वाईट प्रतिमा होण्यासाठी तेथील स्थानिक नागरिकांनाच जबाबदार ठरवले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईने जागतिक पातळीवर पाकिस्तानची वाईट प्रतिमा होण्यासाठी तेथील स्थानिक नागरिकांनाच जबाबदार ठरवले आहे. ईश्वरनिंदा केली म्हणून पाकिस्तानमध्ये एका विद्यार्थ्याला अमानुष मारहाण करण्यात आली. इतकी बेदमी मारहाण केली यात त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.  या घटनेसंदर्भातच बोलताना मलालानं पाकिस्तानवर ही टीका केली आहे. जगभरात पाकिस्तानचे नाव खराब होण्याला दुसरे कोणी नाही तर स्वतः पाकिस्तानच जबाबदार आहे, असे वक्तव्य तिनं केले आहे.
 
एका व्हिडीओद्वारे मलालाने आपले म्हणणं लोकांपुढे मांडले आहे. "इस्लाम आणि पाकिस्तानला कशाप्रकारे बदनाम केले जात आहे, याची आपण चर्चा करतो. कुणीही आपल्या देशाला व धर्माला बदनाम करत नाही. पाकिस्तानची प्रतिमा खराब होण्यास पाकिस्तानातीलच लोकं जबाबदार आहेत. देशाचं नाव खराब करण्यासाठी आपण समर्थ आहोतच, अशी खोचक टीका मलालाने या व्हिडीओद्वारे केली आहे. 
 
गुरुवारी पत्रकारितेचा अभ्यास करणाऱ्या 23 वर्षांच्या मशाल खान या विद्यार्थ्याला जमावाने मारहाण केली. त्याने ईश्वरनिंदा करणारी एक पोस्ट फेसबुकवर टाकली होती. बेदम मारहाण केल्यानंतर त्याला गोळी घालण्यात आली. हे कृत्य इथंवरच थांबलं नाही तर त्याच्या मृतदेहाचीही विटंबना करण्यात आली होती.
 
या घटनेसंदर्भातच मलालानं पाकिस्तानवर कठोर शब्दांत टीका केली आहे. मशालच्या वडिलांसोबत मलालानं संपर्क साधला. मुलाची हत्या झाल्यानंतरही त्याचे वडील देशात सहिष्णुता व शांतता निर्माण व्हावी,  अशी प्रार्थना करत असल्याचे मलालाने सांगितले. ही गोष्ट केवळ मशालच्या मृत्यूची नाही तर इस्लामच्या संदेशाचीदेखील ही हत्या आहे. आपण आपला धर्म, मूल्ये आणि चांगली वागणूक विसरलो आहोत, असंही मलालानं यावेळी म्हटले आहे.
 
मलाला पुढे असंही म्हणाली, "पाकिस्तानातील लोकांनी इस्लामचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.  कारण इस्लाम धर्म शांती आणि सहिष्णुतेचा संदेश देणार आहे.  प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाला सुरक्षित जगण्याचा अधिकार आहे. जर अशा प्रकारे लोकांची हत्या होऊ लागली  तर येथे कुणीच सुरक्षित राहणार नाही", अशी खंत मलालाने व्यक्त केली आहे.
 
पाकिस्तानातील धोरण निर्मात्यांना आणि राजकीय पक्षांनी अशा घटना पुन्हा होऊ न देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, तेव्हाच मशालच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल, असे मतही मलालानं व्यक्त केले आहे.