शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पाकने १५१ कैद्यांना भारताकडे सोपविले

By admin | Updated: May 27, 2014 05:52 IST

पाकिस्तान सरकारने कारावासात असलेल्या १५१ कैद्यांना सोमवारी वाघा सीमेवर भारतीय अधिकार्‍यांकडे सोपविले.

लाहोर : पाकिस्तान सरकारने कारावासात असलेल्या १५१ कैद्यांना सोमवारी वाघा सीमेवर भारतीय अधिकार्‍यांकडे सोपविले. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ््यात पंतप्रधान नवाझ शरीफ सहभागी होणार आहेत. या अनुषंगाने पाक सरकारने सद्भावनावृद्धीच्या दृष्टीने हे पाऊल उचलले आहे. कराची येथून ५९ आणि हैदराबाद येथून ९२ भारतीय कैद्यांची रविवारी सुटका करण्यात आली. यामध्ये १५० मच्छीमार आणि एका अन्य कैद्याचा समावेश आहे. चुकीने पाकिस्तानच्या सीमेत गेल्याच्या कारणावरून त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले होते. या सर्वांना कराची येथून एका वातानुकूलित बसच्या मदतीने वाघा सीमेवर आणण्यात आले होते. सीमा सुरक्षा दलाकडे त्यांना सोपविण्यात आले. पाकिस्तान रेंजर्सच्या एका अधिकार्‍याने वृत्तसंस्थेला सांगितले की, या सर्वांची कागदपत्रे पाहिल्यानंतर त्यांना भारतीय अधिकार्‍यांकडे सोपविण्यात आले. पाकिस्तानी तुरुंगातून सुटका झालेले मच्छीमार दापू तेज यांनी सांगितले की, ह्यमी मण्यांपासून की चेन तयार करायला शिकलो. बांगड्या, पैंजण आणि हारही मला बनविता येतात. प्रत्येक वस्तूसाठी मला ६० रुपये मिळत होते.’ सात महिन्यांपूर्वी कथितरीत्या पाकिस्तानच्या सागरी सीमेत तेजाच्या नौकेने घुसखोरी केल्याच्या आरोपावरून त्याला ही अटक झाली होती. नौकेवर सात जण होते. मात्र, पाकिस्तान तटरक्षक दलाने केवळ चार जणांनाच अटक केले. (वृत्तसंस्था)