शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
5
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
6
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
7
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
8
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
9
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
10
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
11
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
12
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
13
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
14
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
15
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
16
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
17
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
18
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
19
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
20
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

काश्मिरसाठी पाकिस्तानने दहशतवाद पोसला!

By admin | Updated: October 28, 2015 22:14 IST

काश्मिरमध्ये बंडखोरी करण्यासाठी १९९०च्या दशकात पाकिस्तानने लष्कर-ए-तैयबासारख्या संघटनांना पाठिंबा व प्रशिक्षण दिले, अशी स्पष्ट कबुली पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांनी दिली आहे

लाहोर : काश्मिरमध्ये बंडखोरी करण्यासाठी १९९०च्या दशकात पाकिस्तानने लष्कर-ए-तैयबासारख्या संघटनांना पाठिंबा व प्रशिक्षण दिले, अशी स्पष्ट कबुली पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांनी दिली आहे.‘दुनिया न्यूज’ या येथील वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत मुशर्रफ म्हणाले, ‘ १९९० च्या दशकात काश्मिरमध्ये स्वातंत्र्यलढ्यास सुरुवात झाली. त्यावेळी लष्कर-ए-तैयबा व ११ किंवा १२ अन्य संघटना स्थापन झाल्या. ते काश्मिरमध्ये जीवाची बाजी लावून लढत होते त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा व प्रशिक्षण दिले.’लष्करचे हाफिज सईद व झकीऊर रेहमान लख्वी यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासंबंधीच्या प्रश्नावर मुशर्रफ उत्तर देत होते. मुशर्रफ म्हणाले, ‘सईद व लख्वी यांच्यासारखे काश्मिरी स्वातंत्र्यसेनानी त्यावेळी आमचे ‘हीरो’ होते. नंतर, धर्मावर आधारित बंडखोरीने दहशतवादाचे स्वरूप धारण केले. आता ते (पाकिस्तानातील बंडखोर) येथे स्वत:च्याच लोकांचे मुडदे पाडत आहेत. त्यांना आवर घालून थांबवायला हवे.’ मग सईद आणि लख्वी यांनाही असाच आवर घालायला हवा का, असा प्रश्न विचारला असता जनरल मुशर्रफ यांनी त्यावर कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. (वृत्तसंस्था)१९७९मध्ये पाकिस्तान धार्मिक बंडखोरीच्या बाजूने होते. धार्मिक बंडखोरीची सुरुवातच पाकिस्तानने केली व त्यातूनच (अफगाणिस्तानात घुसलेल्या) सोविएत फौजांशी दोन हात करण्यासाठी जगभरातून बंडखोर सामिल झाले.जसे हीरो, तसेच लोक असतील : भारतनवी दिल्ली : पाक पुरस्कृत दहशतवादाचे समर्थन करणारे आणि हाफीज सईद, लखवी, ओसामा बिन लादेन यांना हिरो ठरविणारे पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांना भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. जसे यांचे हिरो तसेच लोकही असतील, असा टोला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी लगावला आहे. भारत तिबेट सीमा पोलीस दलाच्या ५४ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना डोवल यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. नागेंद्र स्मृती व्याख्यानमालेत बोलतानाही त्यांनी मुशर्रफांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. अतिरेकी कारवायांत अडकून राहू नका. वेळीच न सुधारल्यास अन्यथा पाक कधीही प्रगती करू शकणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. दक्षिण आशियातील शांततेत भारताची भूमिका हा या व्याख्यानाचा विषय होता. दहशतवादासारखी कृत्ये करणे फायद्याचे असल्याचा पाकचा गैरसमज आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)