शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

काश्मिरसाठी पाकिस्तानने दहशतवाद पोसला!

By admin | Updated: October 28, 2015 22:14 IST

काश्मिरमध्ये बंडखोरी करण्यासाठी १९९०च्या दशकात पाकिस्तानने लष्कर-ए-तैयबासारख्या संघटनांना पाठिंबा व प्रशिक्षण दिले, अशी स्पष्ट कबुली पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांनी दिली आहे

लाहोर : काश्मिरमध्ये बंडखोरी करण्यासाठी १९९०च्या दशकात पाकिस्तानने लष्कर-ए-तैयबासारख्या संघटनांना पाठिंबा व प्रशिक्षण दिले, अशी स्पष्ट कबुली पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांनी दिली आहे.‘दुनिया न्यूज’ या येथील वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत मुशर्रफ म्हणाले, ‘ १९९० च्या दशकात काश्मिरमध्ये स्वातंत्र्यलढ्यास सुरुवात झाली. त्यावेळी लष्कर-ए-तैयबा व ११ किंवा १२ अन्य संघटना स्थापन झाल्या. ते काश्मिरमध्ये जीवाची बाजी लावून लढत होते त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा व प्रशिक्षण दिले.’लष्करचे हाफिज सईद व झकीऊर रेहमान लख्वी यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासंबंधीच्या प्रश्नावर मुशर्रफ उत्तर देत होते. मुशर्रफ म्हणाले, ‘सईद व लख्वी यांच्यासारखे काश्मिरी स्वातंत्र्यसेनानी त्यावेळी आमचे ‘हीरो’ होते. नंतर, धर्मावर आधारित बंडखोरीने दहशतवादाचे स्वरूप धारण केले. आता ते (पाकिस्तानातील बंडखोर) येथे स्वत:च्याच लोकांचे मुडदे पाडत आहेत. त्यांना आवर घालून थांबवायला हवे.’ मग सईद आणि लख्वी यांनाही असाच आवर घालायला हवा का, असा प्रश्न विचारला असता जनरल मुशर्रफ यांनी त्यावर कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. (वृत्तसंस्था)१९७९मध्ये पाकिस्तान धार्मिक बंडखोरीच्या बाजूने होते. धार्मिक बंडखोरीची सुरुवातच पाकिस्तानने केली व त्यातूनच (अफगाणिस्तानात घुसलेल्या) सोविएत फौजांशी दोन हात करण्यासाठी जगभरातून बंडखोर सामिल झाले.जसे हीरो, तसेच लोक असतील : भारतनवी दिल्ली : पाक पुरस्कृत दहशतवादाचे समर्थन करणारे आणि हाफीज सईद, लखवी, ओसामा बिन लादेन यांना हिरो ठरविणारे पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांना भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. जसे यांचे हिरो तसेच लोकही असतील, असा टोला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी लगावला आहे. भारत तिबेट सीमा पोलीस दलाच्या ५४ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना डोवल यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. नागेंद्र स्मृती व्याख्यानमालेत बोलतानाही त्यांनी मुशर्रफांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. अतिरेकी कारवायांत अडकून राहू नका. वेळीच न सुधारल्यास अन्यथा पाक कधीही प्रगती करू शकणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. दक्षिण आशियातील शांततेत भारताची भूमिका हा या व्याख्यानाचा विषय होता. दहशतवादासारखी कृत्ये करणे फायद्याचे असल्याचा पाकचा गैरसमज आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)