शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

भारतासोबत वाटाघाटीसाठी पाक लष्कर तयार

By admin | Updated: May 7, 2014 06:23 IST

पाक लष्करातील एका मोठ्या गटाची भारताशी वाटाघाटी करण्याची इच्छा आहे; पण अशा वाटाघाटी झाल्या तरीही इतर सर्व पर्याय खुले राहावेत असेही या गटाचे म्हणणे आहे.

वॉशिंग्टन- पाकिस्तानी लष्कराने आतापर्यंतची आपली कट्टरवादी भूमिका बदलली असून, पाक लष्करातील एका मोठ्या गटाची भारताशी वाटाघाटी करण्याची इच्छा आहे; पण अशा वाटाघाटी झाल्या तरीही इतर सर्व पर्याय खुले राहावेत, अशी या गटाची इच्छा असून त्यात पारंपरिक युद्धाचाही समावेश आहे.
एका मेजर जनरलने यासंदर्भात आपले मत मांडले असून त्यानुसार, भारताशी वाटाघाटीही करून बघाव्यात, असे म्हटले आहे; पण वाटाघाटी केल्या तरीही इतर सर्व पर्याय खुले असावेत, अशी इच्छा व्यक्त केली असून त्यात पारंपरिक युद्धाचाही समावेश आहे. डेमॉक्रसी : मिलिटरी पॉलिटिक्स इन पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक अकील शाह यांनी ही भूमिका मांडली आहे. पाकिस्तानी लष्कराच्या भारतासंदर्भातील भूमिकेचा ऐतिहासिक अभ्यास असे या पुस्तकाचे वर्णन हॉवर्ड विद्यापीठाने केले आहे. हे पुस्तक अमेरिकेत प्रसिद्ध झाले आहे. ज्या लष्करी अधिकार्‍याने हे मत व्यक्त केले आहे, त्याचे नाव अकील शाहने प्रसिद्ध केलेले नाही. अकील शाह हे प्रिन्स्टन विद्यापीठात पॉलिटिक्सचे प्राध्यापक आहेत. त्यांच्यामते पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेतील हा बदल हेतूपूर्वक असून, आपल्या देशाची घडी नीट बसविण्यासाठी वेळ मिळावा म्हणून हे वाटाघाटींचे नाटक आहे. पाकिस्तानला दहशतवाद्यांकडून असणारे धोके व कमकुवतपणा यामुळे लष्कराने आपली भूमिका बदलली असावी, त्याचबरोबर अनेक अधिकार्‍यांच्या मते पाकिस्तानचे काश्मीर धोरण फसल्यात जमा आहे. काश्मीरमध्ये संयुक्त राष्ट्राच्या ठरावानुसार सार्वमत घ्यावे अशी पाकिस्तानची मागणी होती; पण या धोरणाला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही, असे लक्षात आले आहे. त्यामुळे पाकला काश्मीर धोरणही बदलण्याची इच्छा आहे. त्यामुळेच आता वाटाघाटींना एक संधी द्यावी, अशी एका गटाची इच्छा आहे. काश्मीरबाबत मूळ भूमिका न बदलता हे धोरण राबवता येईल, असे अपेक्षित आहे. हे पुस्तक लिहिताना अकील शाह यांनी चार लष्करप्रमुख व तीन आयएसआय प्रमुख यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. वाटाघाटीतूनच काश्मीरबाबत पाकिस्तानला हवे ते मिळवता येईल, त्याचबरोबर पाकिस्तानची घसरलेली अंतर्गत स्थितीही सावरता येईल, असा लष्कराचा होरा आहे. शत्रूराष्ट्रात छुपे युद्ध चालवणे, दहशतवाद्यांना घुसविणे हे उपायही फारसे लाभदायक ठरत नसल्याची कबुली एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली असल्याचे या पुस्तकात म्हटले आहे. अण्वस्त्र सामर्थ्य व राजकीय वाटाघाटीद्वारे आपल्याला हवे ते मिळवता येईल, असे या अधिकार्‍यांनी म्हटले आहे. पाकिस्तानात दहशतवादी गटांचे साम्राज्य असून, त्यांच्याकडील घातक शस्त्रास्त्रे व त्यांच्या हातात अण्वस्त्रे पडण्याचा धोका यामुळे पाकिस्तानची गणना लवकरच अयशस्वी अण्वस्त्रधारी देश म्हणून होईल, असे या पुस्तकात म्हटले आहे.
-----------
काश्मीरसंदर्भात शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी प्रतीबद्ध - नवाज शरीफ
इस्लामाबाद- पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी नेहमीप्रमाणे शांततेचा राग आळवला असून, काश्मीरसंदर्भातही भारताशी चर्चा करुन शांततेने तोडगा काढण्यास प्रतिबद्ध असल्याचे म्हटले आहे. भारताशी जे वाद आहेत, त्या सर्वावर आम्ही शांततेने चर्चा करु व काश्मीरसह सर्व मुद्यावर तोडगा काढू असे नवाज शरीफ यांनी सांगितले. पाकिस्तानात राजदूतांच्या परिषदेत ते बोलत होते.