शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

२६/११ हल्ल्यातील बोटीचे परीक्षण करण्यास पाक कोर्टाचा नकार

By admin | Updated: January 15, 2016 02:05 IST

मुंबईतील २६/११ हल्ल्यात दहशतवाद्यांनी वापरलेल्या बोटीचे परीक्षण करण्यासाठी आयोग नेमण्याची सरकार पक्षाची मागणी पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने बुधवारी

इस्लामाबाद : मुंबईतील २६/११ हल्ल्यात दहशतवाद्यांनी वापरलेल्या बोटीचे परीक्षण करण्यासाठी आयोग नेमण्याची सरकार पक्षाची मागणी पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली. या हल्ल्यात लष्कर -ए-तोयबाच्या दहा दहशतवाद्यांनी ‘अल-फौज’ बोटीचा वापर करीत मुंबईत प्रवेश केला होता. न्यायालयीन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ६ जानेवारी रोजी न्यायालयाने सरकारी व बचाव पक्षाच्या वकिलांचा अखेरचा युक्तिवाद झाल्यानंतर निकाल राखून ठेवला होता. बुधवारी न्यायालयाने वरील निकाल दिला. रावळपिंडीच्या आदिल तुरुंगात ही सुनावणी झाली. सरकार पक्षाने ‘अल-फौज’ ला या प्रकरणात मुद्देमाल म्हणून समाविष्ट करावे व तिचे परीक्षण करण्यासाठी आयोग नेमावा अशी मागणी केली होती. ही बोट कराची बंदरात पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या ताब्यात असून दहा अतिरेक्यांनी एके -४७ व हातबॉम्ब घेऊन तिच्यातून भारतात प्रवेश केला होता. क्षेत्रीय चौकशी संस्थेच्या म्हणण्यानुसार कथित हल्लेखोरांनी ‘अल-फौज’ सह तीन बोटींचा वापर केला होता. दहशतवाद्यांनी जिथून बोट व इंजिन खरेदी केले ते दुकानही शोधून काढले आहे तसेच चलनाचे रूपांतर करणारी संस्था व संबंधित बँकेचाही शोध लावला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या हल्ल्याची योजना तयार करणाऱ्या लष्करच्या ७ दहशतवाद्यांना त्यांचा म्होरक्या झकीउर रहेमान लखवी याच्यासह अटक केली. त्यांच्या विरोधात दहशतवाद विरोधी न्यायालयात खटला भरला. त्याची सुनावणी सुरू आहे.