शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

आमची सुरक्षा अभेद्य, पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांची भारताला धमकी

By admin | Updated: September 7, 2016 13:24 IST

पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल राहिल शरीफ यांनी आपल्यासमोर कोणाचाही टिकाव लागू शकत नाही असं सांगत अप्रत्यक्षपणे भारताला धमकी दिली आहे

- ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 7 - पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल राहिल शरीफ यांनी आपला देश पहिल्यापासून भक्कम होता आणि आता त्याची ताकद इतकी वाढली आहे की कोणाचाही आमच्यासमोर टिकाव लागू शकत नाही असं सांगत अप्रत्यक्षपणे भारताला धमकीवजा इशारा दिला आहे. 'आपल्या लोकांचं बलिदान वाया जाणार नाही. आमच्या देशाच्या शत्रुंना मी सांगू इच्छितो की आता पाकिस्तानला हरवणं कठीण आहे,' असंही राहिल शरीफ बोलले आहेत.
 
पाकिस्तानच्या डिफेन्स डे निमित्त आयोजित कार्यक्रमात राहिल शरीफ बोलत होते. यावेळी राहिल शरीफ यांनी पाकिस्तानच्या हक्कांसाठी लढताना जीव गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. 'अफगाणिस्तानमध्ये शांतता स्थापन करण्यासाठी पाकिस्तान पुरेपूर प्रयत्न करत असल्याचंही', राहिल शरीफ बोलले आहेत.
 
शरीफ यांनी काश्मीरच्या मुद्यावर मत मांडताना 'काश्मीर म्हणजे पाकिस्ताची रक्तवाहिनी आहे, खो-यातील लोकांना राजकीय आणि नैतिक स्तरावर नेहमीच पाठिंबा देणार', असं सांगितलं आहे. 'दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी कायदा मजबूत करण्याची गरज आहे. पाकिस्तानच्या शत्रुंना मला स्पष्ट सांगायचं आहे की पाकिस्तान पहिल्यापेक्षा जास्त ताकदवान आणि अभेद्य झाला आहे', असा धमकीवजा इशारा राहिल शरीफ यांनी यावेळी दिला. 
 

राहिल शरीफ यांनी पाकिस्तान आणि चीनच्या मैत्रीचं उदाहरण देत एकमेकांबदल आदर आणि समानता तत्वांवर मैत्री आधारित असल्याचं सांगितलं. 'चीन आणि पाकिस्तानदरम्यान उभं राहत असलेलं इकॉनॉमिक कॅरिडोअर या मैत्रीचं उत्तम उदाहरण आहे', असंही ते बोललेत. यावेळी राहिल शरीफ यांनी भारताचं नाव न घेता 'सीमारेषेवरील धोक्यांची कल्पना आम्हाला आहे. मैत्रीसोबत शत्रुत्व निभावणंही आम्हाला चांगलंच जमतं', अशी धमकी दिली आहे.