शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
2
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
3
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
4
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
5
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
6
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
7
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
8
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
9
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
10
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
11
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
12
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
13
पीएम सूर्य घर : मोफत वीज योजनेसाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज? सोपी आहे पद्धत, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
14
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
15
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
16
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
Daily Top 2Weekly Top 5

आमची सुरक्षा अभेद्य, पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांची भारताला धमकी

By admin | Updated: September 7, 2016 13:24 IST

पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल राहिल शरीफ यांनी आपल्यासमोर कोणाचाही टिकाव लागू शकत नाही असं सांगत अप्रत्यक्षपणे भारताला धमकी दिली आहे

- ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 7 - पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल राहिल शरीफ यांनी आपला देश पहिल्यापासून भक्कम होता आणि आता त्याची ताकद इतकी वाढली आहे की कोणाचाही आमच्यासमोर टिकाव लागू शकत नाही असं सांगत अप्रत्यक्षपणे भारताला धमकीवजा इशारा दिला आहे. 'आपल्या लोकांचं बलिदान वाया जाणार नाही. आमच्या देशाच्या शत्रुंना मी सांगू इच्छितो की आता पाकिस्तानला हरवणं कठीण आहे,' असंही राहिल शरीफ बोलले आहेत.
 
पाकिस्तानच्या डिफेन्स डे निमित्त आयोजित कार्यक्रमात राहिल शरीफ बोलत होते. यावेळी राहिल शरीफ यांनी पाकिस्तानच्या हक्कांसाठी लढताना जीव गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. 'अफगाणिस्तानमध्ये शांतता स्थापन करण्यासाठी पाकिस्तान पुरेपूर प्रयत्न करत असल्याचंही', राहिल शरीफ बोलले आहेत.
 
शरीफ यांनी काश्मीरच्या मुद्यावर मत मांडताना 'काश्मीर म्हणजे पाकिस्ताची रक्तवाहिनी आहे, खो-यातील लोकांना राजकीय आणि नैतिक स्तरावर नेहमीच पाठिंबा देणार', असं सांगितलं आहे. 'दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी कायदा मजबूत करण्याची गरज आहे. पाकिस्तानच्या शत्रुंना मला स्पष्ट सांगायचं आहे की पाकिस्तान पहिल्यापेक्षा जास्त ताकदवान आणि अभेद्य झाला आहे', असा धमकीवजा इशारा राहिल शरीफ यांनी यावेळी दिला. 
 

राहिल शरीफ यांनी पाकिस्तान आणि चीनच्या मैत्रीचं उदाहरण देत एकमेकांबदल आदर आणि समानता तत्वांवर मैत्री आधारित असल्याचं सांगितलं. 'चीन आणि पाकिस्तानदरम्यान उभं राहत असलेलं इकॉनॉमिक कॅरिडोअर या मैत्रीचं उत्तम उदाहरण आहे', असंही ते बोललेत. यावेळी राहिल शरीफ यांनी भारताचं नाव न घेता 'सीमारेषेवरील धोक्यांची कल्पना आम्हाला आहे. मैत्रीसोबत शत्रुत्व निभावणंही आम्हाला चांगलंच जमतं', अशी धमकी दिली आहे.